"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 220.227.219.136 (चर्चा) यांनी केलेले बदल J यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५४: ओळ ५४:
}}
}}


'''तुकाराम भाऊराव साठे''' ऊर्फ '''अण्णा भाऊ साठे''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] - [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले {{संदर्भ हवा}}. अण्णा भाऊंनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत]] लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, [[अमर शेख]] व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते
'''तुकाराम भाऊराव साठे''' ऊर्फ '''अण्णा भाऊ साठे''' ([[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] - [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले {{संदर्भ हवा}}. अण्णा भाऊंनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत]] लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, [[अमर शेख]] व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते.


बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मैना, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.


== जीवन ==
== जीवन ==
ओळ ९१: ओळ ९१:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक [[वि.स. खांडेकर]] यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
* १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक [[वि.स. खांडेकर]] यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
* अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक संमेलने हहोतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात.




ओळ ३५१: ओळ ३५२:


==साहित्य संमेलने==
==साहित्य संमेलने==

[[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] आणि अशाच विविध नावाची अनेक साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरत असतात. याशिवाय अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवही भरवले जातात. असाच एक महोत्सव पुणे महानगरपालिकेने २७-२-२०१३ला आयोजित केला होता.
[[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] आणि अशाच विविध नावाची अनेक साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरत असतात. याशिवाय अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवही भरवले जातात. असाच एक महोत्सव पुणे महानगरपालिकेने २७-२-२०१३ला आयोजित केला होता.



११:५८, ६ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

अण्णा भाऊ साठे
चित्र:10121 MahaS.jpg
जन्म तुकाराम
ऑगस्ट १, इ.स. १९२०
मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय


तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [ संदर्भ हवा ]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते.

बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.

जीवन

ऑगस्ट १, इ.स. १९२० रोजी सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मांग कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.

अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली.

क्रांतिकारक लेखक-कवी

अण्णा भाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या दलित-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला.

अण्णा भाऊंसारखा लेखक प्रारंभी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रांमधूनच वार्ताहर, कथाकार, गीतकार म्हणून लेखन करू लागला. कम्युनिस्ट पक्षाच्या व विचारांशी संबंधित स.ह.मोडकांच्या लोकसाहित्य प्रकाशनाने व वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशनानेच प्रथम अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या, कथासंग्रह, नवे तमाशे आदी नाट्यसंग्रह प्रकाशित करून जनमानसात नेण्याचे भरीव काम केले आहे. अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकास ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे यांनी विस्तृत प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला आहे. अण्णा भाऊंच्या ‘इमानदार’ नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यातही कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’(इप्टा) या संस्थेचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते कॉ. बलराज साहनी यांनी पुढाकार घेतला व त्या नाटकात अभिनेते ए.के. हंगल यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. नंतर अण्णा भाऊंना ‘इप्टा’चे अखिल भारतीय अध्यक्षपदही मिळाले. ज्यात भारतभरातील सुप्रसिद्ध लेखक-कलावंत, विचारवंत त्यांच्यासोबत कार्यरत होते. अण्णा भाऊंच्या ‘फकिरा’ कादंबरीवरील चित्रपट निर्मितीसही ‘इप्टा’च्या कलावंतांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्य

अण्णा भाऊ साठे हे लावण्या, शाहिरी काव्ये, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी तमाशा या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापऱ्या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘माझी मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्यात अविस्मरणीय असेल.

अण्णा भाऊंच्या कादंबऱ्या

‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे.

अण्णा भाऊंच्या कथा

अण्णा भाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले.

  • ‘उपकाराची फेड’ या कथेत भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ-कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण पाहायला मिळते.
  • ‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे.
  • ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात.
  • ‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत अण्णा भाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे, मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगरच्या ज्या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे आणि त्यांचा जीवनसंघर्ष आढळतो.
  • ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात
  • ‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे.
  • ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे.
  • ‘मरीआईचा गाडा’ या कथेत अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.
  • ‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे.
  • ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचे चित्रण आढळते.

पुरस्कार

  • १९६१ साली, अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले होते.
  • अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक संमेलने हहोतात आणि अनेक पुरस्कारही दिले जातात.


कारकीर्द

कादंबरीवर आधारित चित्रपट

अनुक्रमांक कादंबरी चित्रपट संस्था
वैजयंता वैजयंता १९६१ रेखा फिल्म्स
आवडी टिळा लावते मी रक्ताचा १९६९ चित्र ज्योत
माकडीचा माळ डोंगरची मैना १९६९ विलास चित्र
चिखलातील कमळ मुरली मल्हारी रायाची १९६९ रसिक चित्र
वारणेचा वाघ वारणेचा वाघ १९७० नवदीप चित्र
अलगूज अशी ही साताऱ्याची तऱ्हा १९७४ श्रीपाद चित्र
फकिरा फकिरा चित्रनिकेतन

प्रकाशित साहित्य

कादंबऱ्या

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
अग्निदिव्य विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
अलगूज
अहंकार विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
आग विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
आघात
आवडी
केवड्याचे कणीस
कुरूप विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
गुलाम चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
१० चंदन चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
११ चिखलातील कमळ चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
१२ चित्रा विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१३ जिवंत काडतूस
१४ ठासलेल्या बंदुका
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ तास विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
१७ धुंद रानफुलाचा
१८ पाझर
१९ फकिरा
२० फुलपाखरू विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२१ मंगला चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२२ मथुरा चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२३ माकडीचा माळ
२४ मास्तर चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२५ मूर्ती चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
२६ रत्ना विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२७ रानगंगा
२८ रानबोका विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
२९ रूपा विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३० वारणेचा वाघ
३१ वारणेच्या खोऱ्यात विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३२ वैजयंता
३३ वैर
३४ संघर्ष विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
३५ सैरसोबत

कथासंग्रह

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
आबी दुसरी आवृत्ती
कृष्णाकाठच्या कथा
खुळंवाडी
गजाआड पाचवी आवृत्ती
गुऱ्हाळ
चिरानगरची भुतं प्रथम आवृत्ती
नवती
निखारा
पिसाळलेला माणूस
फरारी
१० बरबाद्या कंजारी प्रथम आवृत्ती विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
११ भानामती
१२ लाडी दुसरी आवृत्ती

नाटके

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
इनामदार प्रथम आवृत्ती, मे १९५८ चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर -२
पेंग्याचं लगीन
सुलतान

शाहिरी

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
शाहीर दुसरी आवृत्ती १९८५ मनोविकास प्रकाशन, मुंबई

तमाशा

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
अकलेची गोष्ट चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर
कलंत्री
खापऱ्या चोर
दुष्काळात तेरावा
देशभक्त घोटाळे विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे
निवडणुकीतील घोटाळे
पुढारी मिळाला
पेंग्याचं लगीन
बिलंदर बुडवे
१० बेकायदेशीर
११ माझी मुंबई
१२ मूक मिरवणूक्
१३ लोकमंत्र्यांचा दोरा
१४ शेटजीचं इलेक्शन

प्रवासवर्णने

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
माझा रशियाचा प्रवास सुरेश एजन्सीज ,पुणे

प्रसिद्ध पोवाडे

अनुक्रमांक नाव आवृत्ती प्रकाशन संस्था
नानकीन नगरापुढे
स्टलिनग्राडचा पोवाडा
बर्लिनचा पोवाडा
बंगालची हाक
पंजाब-दिल्लीचा दंगा
तेलंगणाचा संग्राम
महाराष्ट्राची परंपरा
अंमळनेरचे अमर हुतात्मे
मुंबईचा कामगार
१० काळ्या बाजाराचा पोवाडा

साहित्य संमेलने

अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आणि अशाच विविध नावाची अनेक साहित्य संमेलने महाराष्ट्रात भरत असतात. याशिवाय अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवही भरवले जातात. असाच एक महोत्सव पुणे महानगरपालिकेने २७-२-२०१३ला आयोजित केला होता.

स्मारक

महाराष्ट्रात अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक संस्था आहेत. त्यांच्या नावाने साहित्य संमेलने होतात. त्यांची अनेक स्मारके आहेत. त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. असे असले तरी तरी त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील बिबवेवाडी येथे बांधले जात असलेले नाट्यगृह गेल्या आठ वर्षांत १९कोटी खर्चूनही आजतागायत (डिसेंबर २०१२) अपूर्ण आहे.

अधिक वाचन

  • लोकशाहीर अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्‌मय - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
  • अण्णा भाऊ साठे (लोकवाङ्‌मय) - लेखक बाबुराव गुरव, प्रकाशक: लोकवाङ्‌मय गृह प्रा. लि.
  • अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या : प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह
  • पुणे विद्यापीठाची क्रांतिदूत नावाची स्मरणिका(श्रीमती विमल ढलपे), २४-२५ फेब्रुवारी २००७ या दिवशी भरलेल्या ८व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाली होती. तिच्यातील ३१-३६ या पानांवर "क्रांतीचे गीत गाणारे लेखक : अण्णा भाऊ साठे" हा शोधनिबंध होता.
  • तोच शोधनिबंध ’बोधिसत्त्व वंदना’ साप्ताहिकाच्या साहित्यरत्‍न विशेषांकात (संपादक : अरुण दशरथ दळवी) ऑगस्ट २००७मध्ये पुनर्मुद्रित झाला होता.
  • हाच लेख पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने काढलेल्या ’लोकशाही अण्णा भाऊ साठे गौरवांकात’ ३१ जुलै २००७ रोजी प्रकाशित केला गेला. हा अंक अध्यासनाचे अध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण यांनी संपादित केला होता.
  • ’अण्णा भाऊ साठे यात्रा’ या नावाचा, अण्णा भाऊ साठे यांच्या रशियाच्या प्रवासावर आधारलेला लेख ’प्रजा साहित्त’ नावाच्या तेलुगू नियतकालिकात ऑगस्ट २०१०मध्ये प्रकाशित झाला होता. नियतकालिकाचे संपादक : डॉ.दिविकुमार.
  • मे २०१० या महिन्यात कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्‍या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.
  • कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जाति‍अंताचा लढा’ हा लेख आला होता.