वामन रामराव कांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वा.रा. कांत
जन्म नाव वामन रामराव कांत
टोपणनाव रसाळ वामन, अभिजित, आणि कांत
जन्म ऑक्टोबर ६, १९१३
नांदेड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर ८, १९९१
मुंबई ,महाराष्ट्र,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, समीक्षा , अनुवाद, नाट्यलेखन
अपत्ये ३ मुले २ मुली

वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६, १९१३ - सप्टेंबर ८, १९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.

जीवन[संपादन]

वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.

नोकरी व्यवसाय[संपादन]

  1. 'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
  2. निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
  3. निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
  4. भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
  5. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)

गाजलेल्या कविता/गाणी[संपादन]

  • आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको
  • त्या तरुतळी विसरले गीत
  • बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
  • राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्‍न माझे ?
  • सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा

काव्यसंग्रह(एकूण १० )[संपादन]

  • 'दोनुली'
  • ’पहाटतारा’
  • ’बगळ्यांची माळ’
  • 'मरणगंध' (नाट्यकाव्य)
  • 'मावळते शब्द'
  • 'रुद्रवीणा'
  • 'वाजली विजेची टाळी'
  • 'वेलांटी'
  • ’शततारका’ (१९५०)
  • ’सहज लिहिता लिहिता’

चरित्र[संपादन]

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.


पुरस्कार[संपादन]

  1. १९६२-६३ 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  2. १९७७-७८ 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  3. १९७९-८० ' दोनुली' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
  4. १९८९-९० 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार

सन्मान[संपादन]

  1. १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  2. १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  3. १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
पहाटतारा कवितासंग्रह विचाराविहार मंडळ प्रकाशन, नांदेड १९३०
फटत्कार कवितासंग्रह विचाराविहार मंडळ प्रकाशन,नांदेड १९३३
रुद्रवीणा कवितासंग्रह प्रतिभा प्रकाशन , औरंगाबाद १९४७
शततारका कवितासंग्रह धृव प्रकाशन, परभणी १९५०
वेलांटी कवितासंग्रह मौज प्रकाशन, मुंबई १९६२
वाजली विजेची टाळी कवितासंग्रह मौज प्रकाशन, मुंबई १९६५
मरणगंध नाट्यकाव्य काँटिनेंटल प्रकाशन, मुंबई १९७६
दोनुली काव्यसंग्रह मौज प्रकाशन, मुंबई १९७९
मावळते शब्द काव्यसंग्रह मौज प्रकाशन, मुंबई १९८८

बाह्य दुवे[संपादन]