गणेश त्र्यंबक देशपांडे
Jump to navigation
Jump to search
गणेश त्र्यंबक देशपांडे |
---|
डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे (ऑगस्ट १४, १९१० - १९८९) हे मराठी व संस्कृत लेखक होते. याचबरोबर ते साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकारही होते.[१]
अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे ऑगस्ट १४, १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले.
प्रकाशित साहित्य[संपादन]
- भारतीय साहित्यशास्त्र
- इंडॉलॉजिकल पेपर्स (विदर्भ संशोधन मंडळ १९७१)
- अभिनवगुप्त (साहित्य अकादमी प्रकाशन, १९८९)
पुरस्कार[संपादन]
- साहित्य अकादमी पुरस्कार, १९५९ - 'भारतीय साहित्यशास्त्र'
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "डॉ. ग. त्र्यं. देशपांडे जन्मशताब्दी; शुक्रवारपासून व्याख्यानमाला". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे[संपादन]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |