सरदार किबे
सरदार किबे |
---|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
वजीर-उद्-दौला रावबहादुर सरदार माधवराव विनायकराव किबे (जन्म: इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : ), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे एक विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते.
अनुक्रमणिका
शिक्षण[संपादन]
सरदार किबे यांचे प्राथमिक शिक्षण इंदूरला त्यांच्या घरीच झाले. नंतर ते इंदूरच्याच डॅली कॉलेजमध्ये दाखल झाले. त्या कॉलेजमधून १८९४साली मॅट्रिकची परीक्षा दिल्यावर ते अलाहाबादच्या म्यूर कॉलेजातून इ.स. १८९९मध्ये पदवीधर व १९०१ मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले.
विवाह[संपादन]
त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील कमलाबाईशी झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या.
मानसन्मान[संपादन]
- सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद करून घेण्यात आले.
- सरदार किबे यांना लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स ची फेलोशिप प्रदान करण्यात आली.
- किबे यांची मध्यप्रांतात हिंदुस्थान सरकारच्या गव्हर्नर जनरलचे साहाय्यक मंत्री म्हणून नेमणूक झाली.
- त्यांना इंदूर संस्थानात मानद दंडाधिकारी करण्यात आले.
- देवास संस्थान(धाकटी पाती)चे ते इ.स.१९११मध्ये दिवाण झाले.
- यथावकाश ते इंदूरचे महाराज तिसरे तुकोजीराव होळकर यांचे खास चिटणीस (हुज़ूर सेक्रेटरी), नंतर अबकारी मंत्री आणि निवृत्तीच्या वेळी उपपंतप्रधान झाले.
- मुंबई इलाख्यातील सरदार, इनामदार आणि वतनदार यांच्या संमेलनाचे अध्यक्षपद किबे यांनी भूषविले होते..
- सरदार किबे बनारसच्या हिंदी साहित्य परिषदेचे आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते.
- ते मध्य भारत हिंदी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.
- त्यांनी १९१५ साली इंदूरमध्ये मराठी साहित्य सभा ही संस्था स्थापन केली आणि तिच्यातर्फे आमंत्रण देऊन १९१७मध्ये इंदूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले.
- मुंबईत १९२६ साली भरलेल्या १२व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियामक मंडळाचे आणि हिस्टॉरिकल रेकोर्ड्ससाठीच्या सरकारी कमिशनचे सदस्य.
- इ.स. १९३१मध्ये सरदार किबे यांनी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर यांच्या बोलावण्यावरून लंडनला जाऊन त्यांच्याबरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली होती.
- १९३१मध्येच सरदार किबे यांनी सर लेस्ली विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये भरलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या बैठकीत भाषण केले होते.
- १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
- देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी ब्रिटिश सरकारने, सरदार किबे यांना रावबहादुरया उपाधीने सन्मानित केले.
दानशूरता[संपादन]
सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.
बांधकामे[संपादन]
- उज्जैनला क्षिप्रा नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा रावबहादुर माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.
- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबे कदाचित रावबहादुर किब्यांचे पूर्वज असावेत.
लेखन[संपादन]
- लीग ऑफ नेशन्स (इंग्रजी ग्रंथ)
- हिंदुस्थानातील संस्थाने (इंग्रजी ग्रंथ)
- करन्सी पॉलिसी ऑफ इंडियन स्टेट्स (इंग्रजी ग्रंथ)
- अनेक प्रतिष्ठित मराठी, हिंदी आणि इंग्रजी नियतकालिकांमध्ये नियमित लेखन.
बाह्य दुवे[संपादन]
http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन)