सदानंद देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सदानंद देशमुख
जन्म नाव सदानंद नामदेवराव देशमुख
जन्म ३० जुलै १९५९
अमडापूर
वडील नामदेवराव
आई पार्वती
पत्नी वनिता
अपत्ये संदीप, अभिजित

डॉ. सदानंद नामदेव देशमुख (जन्म :- ३० जुलै १९५९) हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ]. ह्या कादंबरीवरून बारोमास नावाचा हिंदी चित्रपट बनला आहे.[ संदर्भ हवा ]

डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. मराठी विषयात त्यांनी एम.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन या सर्वांचा समावेश होतो. त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला आहे. ‘बारोमास’ ही ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांचीही व्यथा मांडणारी कादंबरी आहे. सामाजिक, आर्थिक , राजकीय, कृषिविषयक वास्तवाच्या चोथऱ्यावर उभी असलेली ही कादंबरी, तिला तिच्या श्रेष्ठत्वामुळे साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. शेतकऱ्यांचे जीवन, त्यांच्या समस्या, दारिद्ऱ्य, अज्ञान, शोषण हा कादंबरीचा विषय आहे.[ संदर्भ हवा ] त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत.[ संदर्भ हवा ]

डॉ. सदानंद देशमुख हे चंद्रपूर येथे भरलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]

लेखक सदानंद देशमुख यांचे प्रकाशित साहित्य[ संदर्भ हवा ][संपादन]

  • अंधारवड (कथासंग्रह)
  • अमृतफळ (कादंबरी).
  • उठावण (कथासंग्रह)
  • खुंदळघास (कथासंग्रह)
  • गाभूळगाभा (कथासंग्रह)
  • गावकळा (कवितासंग्रह)
  • चारीमेरा (कादंबरी)
  • जमीनजुमला
  • तहान (कादंबरी)
  • बारोमास (कादंबरी)
  • भुईरिंगणी (ललितगद्य)
  • महालूट (कथासंग्रह)
  • मेळवण (कथासंग्रह)
  • बळ घेऊन भुईचं
  • रगडा (कथासंग्रह)
  • लचांड (कथासंग्रह)

पुरस्कार[संपादन]