विठ्ठल दत्तात्रेय घाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठ्ठल दत्तात्रय घाटे या पानावरून पुनर्निर्देशित)


विठ्ठल दत्तात्रेय घाटे

वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.

वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
काही म्हातारे व एक म्हातारी व्यक्तिचित्रण मौज प्रकाशन
दिवस असे होते आत्मचरित्र मौज प्रकाशन
नाट्यरूप महाराष्ट्र इतिहास मॅकमिलन आणि कंपनी १९२९
पांढरे केस हिरवी मने मौज प्रकाशन
बाजी आणि डॅडी मौज प्रकाशन
मधु-माधव काव्यसंग्रह(सहकवी माधव ज्युलियन) मौज प्रकाशन
मनोगते ललित लेखसंग्रह मौज प्रकाशन

चरित्र[संपादन]

गौरव[संपादन]