"व्यंकटेश दिगंबर माडगूळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:


व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे हे धाकटे बंधू होत.
व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार [[ग.दि. माडगूळकर]] यांचे हे धाकटे बंधू होत.

व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते.


आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.
आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.
ओळ ४१: ओळ ४३:
'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.


व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाटयेही गाजली.
व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.


== प्रकाशित साहित्य ==
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ९८: ओळ १००:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
व्यंकटेश माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यांत 'गावाकडील गोष्टी', 'काळी आई' ह्यांसारखे कथासंग्रह, 'बनगरवाडी' ही कादंबरी आणि 'सती' ही नाट्यकृती ह्यांचा अंतर्भाव होतो.
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९८३ - 'सत्तांतर' साठी
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] १९८३ - 'सत्तांतर' साठी
* [[जनस्थान पुरस्कार]]
* [[जनस्थान पुरस्कार]]

२१:१३, २७ मार्च २०१६ ची आवृत्ती

व्यंकटेश माडगूळकर
जन्म नाव व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
जन्म जुलै ६, १९२७
मृत्यू ऑगस्ट २८, २००१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन
साहित्य प्रकार कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबरी.
कार्यकाळ (६ जुलै १९२७ – २००१)
विषय निसर्ग, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती बनगरवाडी
वडील दिगंबर माडगूळकर
अपत्ये ज्ञानदा नाईक, मोहन
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जुलै ६, १९२७ - ऑगस्ट २८, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद हॊता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.

व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत.

व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते.

आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.

व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.

'पुढच पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.

व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.

प्रकाशित साहित्य

  • अशी माणसं अशी साहसं
  • उंबरठा
  • ओझं
  • करुणाष्टक (कादंबरी)
  • काळी आई (कथासंग्रह)
  • कुनाचा कुनाला मेळ नाही (लोकनाट्य)
  • कोवळे दिवस (कादंबरी)
  • गावाकडच्या गोष्टी (कथासंग्रह)
  • गोष्टी घराकडील
  • चरित्ररंग
  • चित्रे आणि चरित्रे
  • जंगलातील दिवस
  • जनावनातली रेखाटणें
  • जांभळीचे दिवस (कथासंग्रह)
  • डोहातील सावल्या
  • तू वेडा कुंभार (नाटक)
  • नागझिरा
  • पति गेले गं काठेवाडी (नाटक)
  • परवचा
  • पांढरी मेंढरे, हिरवी कुरणे (प्रवासवर्णन)
  • पांढर्‍यावर काळे
  • पारितोषिक
  • पुढचं पाऊल
  • प्रवास एक लेखकाचा
  • माणदेशी माणसं (कथासंग्रह)
  • मी आणि माझा बाप
  • बनगरवाडी (कादंबरी)
  • बाजार
  • बिकट वाट वहिवाट
  • बिनबियांचे झाड (लोकनाट्य)
  • वाघाच्या मागावर
  • वारी
  • वावटळ (कादंबरी)
  • वाळूचा किल्ला
  • व्यंकटेश माडगूळकर यांची कथा : माणदेशी व्यक्ती व गावाकडचे किस्से, आत्मवृत्तपर व त्याचबरोबर स्वत:च्या लेखनावरील, निसर्गपर व जनावरांसंबंधीच्या, शिकारीच्या, शेतकर्‍याच्या, भुताखेताच्या, तमासगिरांच्या, स्त्रीजीवनावर, शहरी समस्येच्या - अशा सर्व धर्तीच्या निवडक २५ कथांचा संग्रह (संपादक - अरविंद गोखले)
  • सती (नाटक)
  • सत्तांतर (कादंबरी)
  • सरवा
  • सीताराम एकनाथ (कथासंग्रह)
  • सुमीता
  • हस्ताचा पाऊस (कथासंग्रह)

पटकथा

  • जशास तसे (कथा- १९५१)
  • पुढचं पाऊल (कथा-१९५०)
  • रंगपंचमी (पटकथा, संवाद-१९६१)
  • वंशाचा दिवा (कथा-१९५०)
  • सांगत्ये ऐका (पटकथा-संवाद-१९५९)


गौरव

पुरस्कार

व्यंकटेश माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यांत 'गावाकडील गोष्टी', 'काळी आई' ह्यांसारखे कथासंग्रह, 'बनगरवाडी' ही कादंबरी आणि 'सती' ही नाट्यकृती ह्यांचा अंतर्भाव होतो.

बाह्य दुवे