"श्रीपाद रघुनाथ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
'''श्रीपाद रघुनाथ जोशी''' (जन्म: कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२०; मृत्यू : २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे [[मराठा|मराठी]] लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. [[कृ.पां. कुलकर्णी]] यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.
'''श्रीपाद रघुनाथ जोशी''' (जन्म: कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२०; मृत्यू : २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे [[मराठा|मराठी]] लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. [[कृ.पां. कुलकर्णी]] यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.


जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला.
जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात [[येरवडा तुरुंंग]]ात कारावास भोगावा लागला.


जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी एक महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होते, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतर केले.
जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी एक महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होते, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतर केले.
ओळ ११: ओळ ११:
* अबलांचे आसू (?)
* अबलांचे आसू (?)
* आनंदी गोपाळ
* आनंदी गोपाळ
* उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक.
* उलगाउलग (१९८३)
* ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन
* ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन
* गांधीजी : एक्झलक (१९६२)
* गांधीजी : एक झलक (१९६२)
* ग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)
* ग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)
* चिनारच्या छायेत (१९६२)
* चिनारच्या छायेत (१९६२)
ओळ २९: ओळ २९:
* मी भूमिपुत्र (१९६६)
* मी भूमिपुत्र (१९६६)
* मुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)
* मुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)
* र्वींद्रनाथा आणि महाराष्ट्र (१९६१)
* रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र (१९६१)
* वाळवंटातील चंद्रकोर (१९७७)
* वाळवंटातील चंद्रकोर (१९७७)
* विचारयात्रा (१९९२)
* विचारयात्रा (१९९२)

२२:२४, २६ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

श्रीपाद रघुनाथ जोशी (जन्म: कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२०; मृत्यू : २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.

जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला.

जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी एक महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होते, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतर केले.

श्रीपाद रघुनाथ जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अखेरचं पर्व (२०००)
  • अनंंता काय रे केलंस हे? (१९६२)
  • अबलांचे आसू (?)
  • आनंदी गोपाळ
  • उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक.
  • ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन
  • गांधीजी : एक झलक (१९६२)
  • ग्रामीण विकासाची वाटचाल (१९६२)
  • चिनारच्या छायेत (१९६२)
  • चीनचे आक्रमण व गांधीवाद (१९६३)
  • जिब्रानच्या नीतिकथा
  • जीेवनसुगंध (१९७७)
  • तांबडी माती हिरवे नाड (१९६४)
  • तुरुंगातले दिवस (१९८५)
  • देवाशपथ खरं सांगेन
  • पाथेय
  • भारत भ्रमण (?)
  • मंटोच्या कथा
  • महात्मा, माय बापू (१९६८)
  • महाराष्ट्राचे समाज सुधारक (१९६९)
  • मी भूमिपुत्र (१९६६)
  • मुस्लिम सण आणि संस्कार (१९६२)
  • रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र (१९६१)
  • वाळवंटातील चंद्रकोर (१९७७)
  • विचारयात्रा (१९९२)
  • विविध भारती (१९६४)
  • श्रीमानस (१९९०)
  • स्थावर

श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश

  • मराठी हिंदुस्तानी कोश (१९४०) : मुख्य संपादक वामनराव चोरघडे : वास्तविक चोरघडे यांनी फक्त मराठी शब्द निवडले होते आणि त्यांना हिंदुस्तानी प्रतिशब्द देण्याचे काम श्रीपाद जोशी आणि माधवराव सावंत यांनी केले होते. या कोशाची किंमत दोन रुपये होती.
  • मराठी हिन्दुस्तानी कोश (सुधारित, १९५२) : पहिल्या कोशावर तुरुंगात बसल्याबसल्या श्रीपाद जोशींनी हा नवा सुधारित कोश तयार केला. जोशी तुरुंगातून १९४४ मध्ये सुटले पण कोश त्यान्ण्तर ८ वर्षांनी वर्ध्याच्या हिंदुस्तानी प्रचार समितीने प्रकाशित केला. या कोशात मराठी आणि हिंदुस्तानी या दोनही भाषांतील शब्दांचे व्याकरण दिले होते. मात्र मूळ मराठी शब्द कोणत्या भाषेतून आला त्याचे माहिती नव्हती. हिंदी भाषकांना मराठी उच्चार कळावेत म्हणून च, छ, ज आणि झ खाली जरूर तेव्हा नुक्ते दिले होते. या कोशात १४,००० शब्द होते; कोशाची किंमत साडेचार रुपये होती.
  • विद्यार्थी हिंदी-मराठी कोश (पृष्ठसंख्या २१२, किंमत २ रुपये) : शब्दसंख्या १२,०००; प्रकाशनवर्ष इ.स. १९५०. प्रकाशक - वोरा आणि कंपनी, मुंबई.
  • हिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई वोरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..
  • अभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदीप्रतिशब्द दिले होते, तर दुसर्‍या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिली होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्द्दंचा चांगलाच भरणाहोता. शिवाय हिंदी-मराठी वाक्‌प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या. पहिल्या दोन आवृत्त्या व्हीनस प्रकाशनने काढल्या. (१९५८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ४१६, किंमत ५ रुपये. १९६८ची आवृत्ती, पृष्ठसंख्या ६१६, किंमत ८ रुपये). त्यानंतर पुण्याच्या शुभदा प्रकाशनने अनुक्रमे १९८७, १९९०, १९९४ व १९९६ साली कोशाची तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी आवृत्ती काढली.
  • उर्दू-मराठी शब्दकोश (प्रकाशन १९६८)
  • बृहत्‌ हिंदी-मराठी शब्दकोश (मार्च १९६५) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
  • बृहत्‌ मराठी-हिंदी शब्दकोश (डिसेंबर १९७१) : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही.
  • उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला असला तरी कोशावर त्यांचे नाव संकलन-संपादक म्हणून छापले आहे. या कोशाच्या कामाशी कसलाही संबंध नसलेले, अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान असलेले आणि मराठीचे अजिबात ज्ञान नसलेले एक तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये दुरुस्त न करता येईल इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणारर्‍याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, पुण्याच्या हिंदु-ब्राह्मण असलेल्या काय उर्दू येणार असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला. या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींना सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.
  • उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश (नितिन प्रकाशन, १९९७) : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला. कोशाची दुसरी आवृत्ती २००१ साली निघाली.