"सखाराम हरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Added link.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''सखाराम हरी देशपांडे''' ([[इ.स. १९२४|१९२४]] - [[जुलै २९]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
'''सखाराम हरी देशपांडे''' (जन्म : शिरवळ, इ.स. १९२४; मृत्यू : २९ जुलै २०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.


== जीवन ==
== जीवन ==
देशपांड्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[शिरवळ]] येथे [[इ.स. १९२४|१९२४]] साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. [[पुणे|पुण्यातील]] नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर [[सर_परशुरामभाऊ_महाविद्यालय|परशुरामभाऊ महाविद्यालयातून]] त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच प्राध्यापकाची नोकरी करून [[इ.स. १९८४|१९८४]] साली ते निवृत्त झाले.
देशपांड्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[शिरवळ]] येथे [[इ.स. १९२४|१९२४]] साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. [[पुणे|पुण्यातील]] नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर [[सर_परशुरामभाऊ_महाविद्यालय|परशुरामभाऊ महाविद्यालयातून]] त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठातून]] [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रात]] त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच प्राध्यापकाची नोकरी करून [[इ.स. १९८४|१९८४]] साली ते निवृत्त झाले.

अर्थशास्त्रातून एम. ए. व पुढे डॉक्टरेट मिळवणारे स. ह. देशपांडे हे प्राध्यापक होते. राष्ट्रवाद हा त्यांच्या अभ्यासाचा विषय तसेच हिंदुत्वाच्या संकल्पनेची व्यापक फेरमांडणी करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. कृषी अर्थशास्त्र हाही त्यांच्या अध्यायनाचा आणि अध्यापनाचा आणखी एक विषय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे स. ह. पुढे संघाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे संघातून बाहेर पडले. दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या 'हिंदू संस्कृतीतील आशय कोणता? सावरकर प्रणीत हिंदुत्वविचारांच्या पारमार्थिकांनी केलेला पराभव, मुस्लिम प्रश्न या लेखातून सावरकर ते भाजप हे पुस्तक साकारले. याशिवाय संघातले दिवस आणि इतर लेख, 'किबुट्झ नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग' पॉलिटिक्स, सोसायटी आणि इकॉनॉमी, शारद्वत ही व्यक्तिचित्रे आदी पुस्तके त्यांनी लिहिली. समाज प्रबोधन या पत्रिकेचे संपादनही त्यांनी चार वर्ष केले.
तसेच भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे प्रमुखपद काही काळ भूषविले. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. 'ग्रामायन पुणे' या संस्थेचे ते एक संस्थापक होते. आपले कार्यक्षेत्र सखाराम हरी देशपांडे यांनी केवळ लेखन वाचनापुरते मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. मिरज मधील दलितांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देऊन सहकारी शेतीचा प्रयोग राबवला. याशिवाय त्यांनी मराठी विश्वकोशात कृषीविषयक लेखन केले. त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेत 'आर्थिक विकासाच्या पायऱ्या,' आर्थिक प्रगतीचे रहस्य भारतीय शेती, 'सोव्हिएत शेती' 'अमेरिका आर्थिक इतिहास 'शारदूत' मधून व्यक्तींची चरित्रे आणि चार सामाजिक चळ्वळीवरील अभ्यासपूर्ण निबंध असे विविधांगी लिखाण केले. अशा या प्रतिभासंपन्न लेखक, मर्मज्ञ रसिक, बुद्धिवादी विचारवंतांचे २९ जुलै २०१० रोजी निधन झाले.


== साहित्यिक कारकिर्द ==
== साहित्यिक कारकिर्द ==

२१:०५, १७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

सखाराम हरी देशपांडे

सखाराम हरी देशपांडे (जन्म : शिरवळ, इ.स. १९२४; मृत्यू : २९ जुलै २०१०]]) हे मराठी लेखक होते.

जीवन

देशपांड्यांचा जन्म महाराष्ट्रात शिरवळ येथे १९२४ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच प्राध्यापकाची नोकरी करून १९८४ साली ते निवृत्त झाले.

अर्थशास्त्रातून एम. ए. व पुढे डॉक्टरेट मिळवणारे स. ह. देशपांडे हे प्राध्यापक होते. राष्ट्रवाद हा त्यांच्या अभ्यासाचा विषय तसेच हिंदुत्वाच्या संकल्पनेची व्यापक फेरमांडणी करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. कृषी अर्थशास्त्र हाही त्यांच्या अध्यायनाचा आणि अध्यापनाचा आणखी एक विषय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे स. ह. पुढे संघाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे संघातून बाहेर पडले. दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या 'हिंदू संस्कृतीतील आशय कोणता? सावरकर प्रणीत हिंदुत्वविचारांच्या पारमार्थिकांनी केलेला पराभव, मुस्लिम प्रश्न या लेखातून सावरकर ते भाजप हे पुस्तक साकारले. याशिवाय संघातले दिवस आणि इतर लेख, 'किबुट्झ नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग' पॉलिटिक्स, सोसायटी आणि इकॉनॉमी, शारद्वत ही व्यक्तिचित्रे आदी पुस्तके त्यांनी लिहिली. समाज प्रबोधन या पत्रिकेचे संपादनही त्यांनी चार वर्ष केले. तसेच भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे प्रमुखपद काही काळ भूषविले. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. 'ग्रामायन पुणे' या संस्थेचे ते एक संस्थापक होते. आपले कार्यक्षेत्र सखाराम हरी देशपांडे यांनी केवळ लेखन वाचनापुरते मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. मिरज मधील दलितांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देऊन सहकारी शेतीचा प्रयोग राबवला. याशिवाय त्यांनी मराठी विश्वकोशात कृषीविषयक लेखन केले. त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेत 'आर्थिक विकासाच्या पायऱ्या,' आर्थिक प्रगतीचे रहस्य भारतीय शेती, 'सोव्हिएत शेती' 'अमेरिका आर्थिक इतिहास 'शारदूत' मधून व्यक्तींची चरित्रे आणि चार सामाजिक चळ्वळीवरील अभ्यासपूर्ण निबंध असे विविधांगी लिखाण केले. अशा या प्रतिभासंपन्न लेखक, मर्मज्ञ रसिक, बुद्धिवादी विचारवंतांचे २९ जुलै २०१० रोजी निधन झाले.

साहित्यिक कारकिर्द

राष्ट्रवादहिंदुत्व हे देशपांड्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. त्यावर त्यांनी पुस्तकेही लिहिली.

प्रकाशित साहित्य

  • काही आर्थिक काही सामाजिक
  • संमतविचार आणि नवी भारतविद्या
  • हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व
  • हिंदुत्वाची फेरमांडणी
  • संघातले दिवस
  • हिंदू वैदिक विवाह पद्धत
  • भारताचा राष्ट्रवाद
  • दुभंग
  • व्यक्ती आणि प्रकृती
  • अमृतसिद्धी भाग १ पु. ल. समग्रदर्शन, अमृतसिद्धी भाग २ पु. ल. समग्रदर्शन