चंदन - वंदन
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
चंदन-वंदन | |
नाव | चंदन-वंदन |
उंची | ३८०० फूट |
प्रकार | गिरदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | सातारा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | किकली, ता.वाई |
डोंगररांग | सातारा |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
निर्माण करता :- दुसरा भोजराजा.
निर्माण काळ :- इ.स. ११७८ ते ११९२.
चंदन - वंदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जोडकिल्ला आहे.
अनुक्रमणिका
भौगोलिक स्थान[संपादन]
सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत किल्ले चंदन वंदन वसलेले आहे. चंदन पेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो तसे इनामपञांमध्ये नमुद आहे.
कसे जाल ?[संपादन]
पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. चंदन वंदन किल्ल्याचे विहंगम दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.
इतिहास[संपादन]
कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावां विषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ ला जिंकून स्वराजाची मुहुर्त मेड रोवली हे पुढे येत आहे. अफझलखान वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमन केले. व गडाची पुर्वीची नावे शुरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन नामाकरण केले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.
छायाचित्रे[संपादन]
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]
अ) चंदनगडावरिल वास्तू :- १) महादेव मंदिर :- चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंग असलेले महादेव मंदिर आहे. असे मानले जाते की छ.शिवाजी महाराजांनी या मंदिराची निर्ंमिती केले. २) दगडी मिनार :- गडावर प्रवेश करतानाच राजा भोजने उभारलेल्या दोन दगडी मिनारी आपले स्वागत करताना दिसते. ३) दगडी चौथारा :- चंदनगडाच्या मध्यभागी एक पाया पर्यंत बा़ंधलेला चौथारा आढळतो. ४) गडाच्या नैऋत्य बाजूस दारूगोळा कोठार आढळते. ५) गडाच्या वायव्येस एक बुरूज असून शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी आढळते ज्याच्यावर एका बाजूला मारूतीची प्रतिमा कोरलेली आहे. ब) वंदनगडावरिल वास्तू :- १) प्रवेशव्दार :- वंदनगडावर मराठा स्थापत्य शैलीतील एक प्रवेशव्दार आहे. त्यावर किर्तीचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेली आढळते. २) दुसरे प्रवेशव्दार :- पहिल्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशव्दार लागते. सध्यास्थित ते मातीत मुजले आहे. ३) भोजकालिन प्रवेशव्दार :- हे व्दार पन्हाळावरिल प्रवेशव्दाराच्या धर्तिवर बांधण्यात आले आहे.याच्यावर एक शिलालेख फारशी भाषेत तर दुसरा मोडी लिपीत आहे. यात यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळतो. या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरूंग आहे. तुळाजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवले असावे. ४) खंदक :- गडाच्या पुर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाईंनी हा बनवून घेवून तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली होती. ४) पाच तलाव:- वंदनगडावर पाय-यायुक्त असे पाच तळी होती. यापैकी एक मुजला असून चार तळी सुस्थितीत आहेत. ५) महादेव मंदिर :- गडाच्या पुर्वेस बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्पर वजा मंदिर आहे. ६) काळूबाई मंदिर :- गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर आहे. ७) समाधी :- गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. ८) दारूगोळा कोठार :- तिन दालन असलेले हे कोठार गडाच्या मध्यभागी आहे. ९) राजवाडा :- गडावर पुरातन राजवाडा आण़ि त्याचे अवशेष पहावयास मिळतात. १०) बाले किल्ला :- गडावर एक टेकडी असून तीला बालेकिल्ला म्हणतात. यावर एका बुरूजाचे तसेच इमारतीचे अवशेष आहेत.तिथे जाण्यासाठी पुर्वी पाय-या होत्या. ११) पडकी घरे :- गडाच्या पुर्वेस तसेच वायव्य दिशेस शेकडो पडक्या घरांचे अवशेष आढळतात. १२) गडाच्या दक्षिणेस एक चोर वाट आहे. १३) चुन्याचे घाणे :- वंदनगडावर चुन्याची पुर्वेस एक आणि दक्षिणेस एक प्रमाणे चाके नसलेले घाणे आहेत.
=गडावरील राहायची सोय[संपादन]
वंदनगडावर सुमारे ३० ते ४० लोकांना राहता येते एवढी वास्तू आहे.
गडावरील खाण्याची सोय[संपादन]
गडावर खाण्याची सोय नाही.
गडावरील पाण्याची सोय[संपादन]
चंदनगडावर एक विहिर असून त्यातील पाणी जुलै ते फेब्रुवारी पर्यंत तर वंदनगडावर सध्या ४ तळी असून पैकी तीन तळ्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
अरबवाडी मधून १ ते दीड तासात जाता येते. किकली मार्गे ४५ मिनिटात जाता येते.
मार्ग[संपादन]
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]
संदर्भ[संपादन]
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा[संपादन]