आंबोळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


आंबोळगड
नाव आंबोळगड
उंची {{{उंची}}}
प्रकार गिरिदुर्ग भुईकोट किल्ला
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग {{{डोंगररांग}}}
सध्याची अवस्था अतिशय जिर्ण
स्थापना {{{स्थापना}}}


आंबोळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. "मुसाकाजी" या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला. इ.स. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठवली गेली.

कसे जाल ?[संपादन]

रत्‍नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.

इतिहास[संपादन]

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष. आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहीर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. दोन मोठे समुद्र किनारे असल्याने रिसाॅर्ट हाॅटेले आहेत, वाॅटर स्पोर्ट्‌स सुरू होत आहेत..

गडावरील राहायची व खाण्याची सोय[संपादन]

गडालगत भरपूर हाॅटेले, रिसाॅर्ट्‌स आदी निवासाची व रेस्टॉरंटे, घरगुती जेवण आदीची सोय आहे.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]