अर्नाळा किल्ला
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
अर्नाळा किल्ला | |
नाव | अर्नाळा किल्ला |
उंची | मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | अर्नाळा |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]
भौगोलिक स्थान[संपादन]
कसे जाल ?[संपादन]
अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम पश्चिम रेल्वेवरील मुंबईचे उपनगर असलेले विरार रेल्वे स्थानकावर पश्चिमेच्या बाजूला उतरतात. स्टेशनहून एस.टी. अथवा वसई महापालिका परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने ७ ते १० किलोमीटर अंतरावरील आगाशी किंवा अर्नाळा गावात पोचले की. जवळच असलेल्या अर्नाळा बंदरातून छोट्या होडक्यातून अर्नाळा किल्ला ज्या बेटावर आहे तेथे पोहोचता येते. बेटावर समुद्र किनार्यालगतच अर्नाळा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे.
इतिहास[संपादन]
चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग इ.स. १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
छायाचित्रे[संपादन]
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]
अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरूज ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्तीची व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख आहे. या शिलालेखामधील ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!’ या ओळींवरून किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते. २३ मे १७३७ रोजी या कोटाचे काम पूर्ण झाल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी बाजीरावने बाजी तुळाजीची मदत घेतली होती, असा उल्लेख शिलालेखात आहे.
किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी माता यांची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळे आहे. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनार्यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरूज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.
बुरजांची नावे[संपादन]
यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज आणि सुटा बुरूज (नाव नाही). गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत.
गडावरील राहायची सोय[संपादन]
नाही.
गडावरील खाण्याची सोय[संपादन]
नाही.
गडावरील पाण्याची सोय[संपादन]
या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]
पश्चिम रेल्वेवरच्या विरारपासून आगाशी/अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून तेथे जायला एस्.टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्यापर्यंत गेल्यावर होडीनेच किल्ल्यावर जाता येते. ही होडी सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्यावरुन समोरच दिसणार्या अर्नाळा किल्ल्यावर जायला ५-१० मिनिटे लागतात.
याशिवाय वसई गाव येथूनही अर्नाळा गावात जाण्यास बसेस आहेत.
मार्ग[संपादन]
जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "गॅझेट नोटिफिकेशन" (PDF) (इंग्रजी भाषेत). ११ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भ[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]