"दादोजी कोंडदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
{{पुनर्लेखन}}
{{पुनर्लेखन}}


'''दादोजी कोंडदेव''' (जन्म १५७७ ? मृत्यू १६४९) इ.स. [[१६३७]] (वयाचे ६०वे वर्ष) ते [[१६४९]]. वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यूपावेपर्यंत म्हणजे साधारण १२ वर्षे ते शिवाजीकडे होते.{{संदर्भ हवा}} त्याअधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती..<ref name="पांडुरंग">अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ</ref>. .दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय केवळ १९ वर्षे होते.{{संदर्भ हवा}}
'''दादोजी कोंडदेव''' (जन्म १५७७, मृत्यू १६४९) हे इ.स.१६३६पासून वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यूपावेपर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे(१६४०-१६३६=१३) ते शिवाजीकडे होते.{{संदर्भ हवा}} त्याअधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती..<ref name="पांडुरंग">अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ</ref>. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय केवळ १९ वर्षे(१६४९-१६३०=१९) होते.{{संदर्भ हवा}}


बहुसंख्य इतिहासकार दादोजी कोंडदेवांना छत्रपती [[शिवाजी]] महाराज यांचे पिता [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर मानतात, [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही. ते [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर नव्हतेच आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक स्वतंत्र हुद्देदार असून प्रथम हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे <ref>[http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]</ref>
बहुसंख्य इतिहासकार दादोजी कोंडदेवांना, छत्रपती [[शिवाजी]] महाराज यांचे पिता [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर मानतात, [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही. ते [[शहाजीराजे भोसले|शहाजी भोसले]] यांचे चाकर नव्हतेच तर, आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक स्वतंत्र हुद्देदार असून प्रथम हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे <ref>[http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली]</ref>


==सुरुवातीचे दिवस ==
==सुरुवातीचे दिवस ==
ओळ ३८: ओळ ३८:
==वाद गुरूचा==
==वाद गुरूचा==


प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानल्या जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही महाराजांच्या इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा जोतिबा फुले यांना त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांचे पत्र- महात्मा फुले समग्र वाङ्ममय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी, दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याचे तथाकथित चुकीचे उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}
प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.[[बखर|बखरी]] ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानल्या जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही महाराजांच्या इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे [[ब्राह्मणेतर चळवळ]] <ref>http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा जोतिबा फुले यांना त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांचे पत्र- महात्मा फुले समग्र वाङ्ममय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.</ref> आणि [[संभाजी ब्रिगेड]] इत्यादी संस्थानी, दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याचे (त्यांच्या मते चुकीचे) उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते.{{संदर्भ हवा}}


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१५:१८, ११ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

दादोजी कोंडदेव (जन्म १५७७, मृत्यू १६४९) हे इ.स.१६३६पासून वयाचे बहात्तरावे वर्षी मृत्यूपावेपर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे(१६४०-१६३६=१३) ते शिवाजीकडे होते.[ संदर्भ हवा ] त्याअधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद घेऊन चाकरी केली होती..[१]. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय केवळ १९ वर्षे(१६४९-१६३०=१९) होते.[ संदर्भ हवा ]

बहुसंख्य इतिहासकार दादोजी कोंडदेवांना, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजी भोसले यांचे चाकर मानतात, शहाजी भोसले यांचेकडे नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेखात आढळत नाही. ते शहाजी भोसले यांचे चाकर नव्हतेच तर, आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील तो एक आदिलशहाने नेमलेला एक स्वतंत्र हुद्देदार असून प्रथम हवालदार आणि नंतर सुभेदार झाला असा नवीनतम प्रतिवाद आहे [२]

सुरुवातीचे दिवस

इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंड भागातील Marathi देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठण तालुका शिरूर येथील होते.[३] यांचे मूळ आडनाव गोजिवडे असे होते.पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते.दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते.छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटिलकी मिळविली होती. या गावांचा कुळकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. आदिलशाहीमार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते.[४]

त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम सहसा नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशेब ठेवण्याचे असे. काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागे. [ संदर्भ हवा ]

नवीन प्रतिवादानुसार दादोजी गोचिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.[५] दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामत: दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते.

सुभेदारीची कारकीर्द

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.

चाकणपासून शिरवळ, इंदपूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली.

निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती.

सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली, .सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, .शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला.

गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात.[१].निवाडे देताना तो निष्पक्ष आणि न्यायी होता. जरब बसवताना त्याने एका कुलकर्णीस मृत्यूदंडही घडविल्याचे उल्लेख आहेत.

शहाजी राजांचे कुटुंब आणि बाल शिवाजीराजे आणि दादोजींची स्वामिनिष्ठा

इ.स. १६३६मधे जिजाबाई आणि शिवाजी शिवनेरी किल्ल्यावर होते. शहाजीने मोगलांशी केलेल्या तहामुळे शिवनेरी मोगलांच्याकडे गेला म्हणून, १९३७ च्या शहाजीने जिजाबाई आणि शिवाजी यांना पुण्यात पाठविले व स्वतः कर्नाटकात बंगलोर येथे प्रस्थान केले. दादोजी कोंडदेवाने जिजाबा आणि शिवाजी राजे यांच्याकरिता पुण्यात बांधलेल्या लालमहाल वाड्याची देखरेख केली. १६४०-१६४१ च्या सुमारास जिजाबा आणि शिवाजी हे दोघे दादोजींच्या सोबत शहाजीराजांच्या भेटीस बंगलोरास गेल्याचे उल्लेख आढळतात.[ संदर्भ हवा ]

दादोजी कोंडदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधवण्याची तजवीज केल्याचे व शिवाजी माहाराजांचे नाव देण्याकरिता शिवापूर नावाची पेठ वसविल्याचे उल्लेख आढळतात. शहाजी राजे त्यांचे पुणे वतन व शहाजीराजेंच्या कुटुंबाशी ते एकनिष्ठ होते व त्यांच्या स्वामिनिष्ठ सेवेबद्दल शहाजी व शिवाजी महाराजांनी आदरपूर्ण उल्लेख केल्याचे ऐतिहासिक दस्तऐवज आढळतात. परंतु प्रमाण ऐतिहासिक कागदपत्रांत दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याचे स्पष्ट उल्लेख नाहीत. असे असले तरी अनुषंगिक पुराव्यांवरून ते शिवाजीचे शिक्षक होते हे सिद्ध होते.

ऐतिहासिक साधनातील उल्लेख

वाद गुरूचा

प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते.बखरी ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानल्या जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेले उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही महाराजांच्या इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे ब्राह्मणेतर चळवळ [६] आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थानी, दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू असल्याचे (त्यांच्या मते चुकीचे) उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ a b अखिल भारतीय मराठी विकास परिषदेच्या अनियतकालिकातील पांडुरंग बलकवडे यांचा लेख "गुरूचा वाद कशाला"मधील संदर्भ
  2. ^ दादाजीपंती उगीचच बल घाविले- अ‍ॅड.अनंत दारवटक, साप्ताहिक लोकप्रभा आंतरजाल आवृत्ती दिनांक ३० जाने.२०११ रोजी जशी दिसली
  3. ^ "Daund - Info". Pune Diary. 2006-11-25 रोजी पाहिले.
  4. ^ प्रा.यदुनाथ सरकार यांचे शिवाजी महाराज व शिवयुग या पुस्तकात लेखन प्रा.रा.ज्ञा. गायकवाड, प्रा.वा.शं.सूर्यवंशी, प्रा.विलास पाटील यांनी दिलेले संदर्भ (शिवयुगाचे निर्माते-पानक्रमांक ४० ते ४३) चे पुन:प्रकाशन. (जसे अखिल भारतीय मराठा विकास परिषदेच्या अनियतकालिकात पान क्र. ४२वर आढळले तसे
  5. ^ http://www.loksatta.com/lokprabha/20110204/pratikriya.htm
  6. ^ http://pravinraje.files.wordpress.com/2011/01/2_2.jpg महात्मा जोतिबा फुले यांना त्यांचे मामा नारायणराव परमानंद यांचे पत्र- महात्मा फुले समग्र वाङ्ममय पृ. ४२४-४२५ संकेतस्थळावर दिनांक ३० जानेवारी २०११ भाप्रवे ८.३० रात्रौ जसे दिसले.

नोंदी