मलिक अंबर
| मलिक अंबर | |
|---|---|
|
| |
| जन्मनाव |
वाको[३] चापू [३] |
| जन्म |
१५४८[४] हरार[४] |
| मृत्यू |
११ मे 1626 (aged 77–78) खुलदाबाद, अहमदनगर सलतनत (सध्याचे खुलताबाद, संभाजीनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत) |
| Allegiance | अहमदनगरचे निजामशहा |
| नातेवाईक |
मुले - १ फतेह खान २ चंगीस खान |
मलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हे मूर्तझा निजामशहा दुसऱ्यांच्या अहिल्यानगर निजामशाहींमध्ये प्रधान (वजीर-ए-आजम) होते. मलिक अंबर यांचा जन्म अंदाजे १५४९ मध्ये एका हबशी परिवारामध्ये झाला. मलिक अंबर हे युद्धशास्त्र आणि प्रशासन यात पारंगत असणारे, कर्तृत्वाने आणि स्वामीनिष्ठ प्रधान होते. त्यांनी मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.
प्रारंभिक जीवन
[संपादन]मलिक अंबरला चेंगिज खान याने विकत घेतले, जो एक माजी हबशी गुलाम होता आणि निजामशाहीत वजीर किंवा मुख्य प्रधान म्हणून काम करत होता.[५]
सुरुवातीचा काळ
[संपादन]मलिक अंबर हा जन्माने इथियोपिया येथील होता.[६] त्याच्या आई-वडिलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकले होते. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.
महसूल व्यवस्था
[संपादन]
दुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना "प्रधान" म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत ५ वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[७] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरूपात न गोळा करता पैशाच्या रूपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली. त्यामुळे मलिक अंबर कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.
कार्य
[संपादन]


एकदा त्यांचे मालक मरण पावले, मलिक अंबरला त्याच्या मालकाच्या पत्नीने मुक्त केले. स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी लग्न केले, आणि काही काळ विजापूरच्या सुलतानाची सेवा केली आणि या काळात त्याला "मलिक" ही पदवी मिळाली. परंतु अंबरने निजामशाही सैन्यात सेवेत प्रवेश करण्यापूर्वी अपुऱ्या पाठिंब्याचे कारण देऊन ही सेवा सोडली.[८] मलिक अंबर हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे १६०० ते १६२६ या कालावधीत वजीर म्हणजेच मुख्य प्रधान होते. या काळात त्यांनी मूर्तझा निजाम शहा II चे सामर्थ्य वाढवले आणि मोठे सैन्य उभे केले. त्यांनी एक घोडदळ उभारले जे अल्पावधीत १५० वरून ७००० पर्यंत वाढले आणि उत्तरेकडून मुघलांचे हल्ले परतवून लावण्यासाठी सुलतानांची नियुक्ती करून अहमदनगर सल्तनतीचे पुनरुज्जीवन केले.[५] १६१० पर्यंत, त्यांच्या सैन्यात १०,००० हबशी आणि ४०,००० दखणी यांचा समावेश झाला.[५] पुढच्या दशकात, मलिक अंबर मुघल सम्राट जहांगीरच्या राज्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांशी लढून पराभूत करण्यात यशस्वी झाला.
मृत्यू व वाद
[संपादन]८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबर यांचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरीबद्दल अनेक वाद आहेत. एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर दुसरी एक कबर घाटी दवाखान्यात आहे, असा उल्लेख मिळतो.
संदर्भ
[संपादन]- ↑ शेख चांद, मलिक अंबर,"एहदे आफरीन; हैदराबाद; 1929
- ↑ Times of India, Plus Supplement, July 1999,
- 1 2 Kenneth X. Robbins; John McLeod (2006). African Elites in India. Mapin. p. 50. ISBN 81-88204-73-0. OCLC 701823920.
- 1 2 "Malik Ambar: The Ethiopian slave who became a kingmaker in India". 2020-02-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-10-28 रोजी पाहिले.
- 1 2 3 चिनमय तुंबे, इंडिया मुव्हिंग: अ हिस्टरी ऑफ मायग्रेशन (२०१९), पृष्ठ २९
- ↑ बॉम्बे प्रेसिडेंसी गॅझेटिअर
- ↑ पोतनीस, सुनीत (१२ मार्च २०१८). "जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन" [Those who came settled..: Administration of Malik Ambar]. लोकसत्ता. १२ मार्च २०१८ रोजी पाहिले.
या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या.
- ↑ चॅटर्जी, इंद्रानी., ईटन, रिचर्ड मॅक्सवेल. (२००६). स्लेव्हरी अँड साउथ एशियन हिस्टरी. ब्लूमिंग्टन: इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस. ISBN 978-0-253-11671-0. OCLC 191950586.CS1 maint: uses authors parameter (link)