"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २२२: ओळ २२२:
* मराठी विकिपीडिया [[दालन:मराठवाडा]]
* मराठी विकिपीडिया [[दालन:मराठवाडा]]
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.

==मराठवाडा या विषयावरची पुस्तके==
* मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)


==संदर्भ==
==संदर्भ==

२२:१६, १ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

  ?मराठवाडा

महाराष्ट्र • भारत
—  विभाग  —
मराठवाडा, भारत
मराठवाडा, भारत
Map

१९° ५२′ ५९.८८″ N, ७५° १९′ ५९.८८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ६४,८११ चौ. किमी
जिल्हे औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली
लोकसंख्या
घनता
साक्षरता
१,५५,८९,२२३ (2001)
• २४१/किमी
६८.९५ %

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्‍यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिक दृष्टीने दारिद्रय रेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता.

इतिहास

स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले.[२] भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. स्वामी रामानंदतीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.

स्वातंत्र्योत्तर काळात इंदिरा काँग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली .

जायकवाडी धरण, पैठण

त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान आहे.

भौगोलिक स्थान

मुख्य शहरे

  • औरंगाबाद : ही मराठवाङयाची राजधानी व प्रमुख औद्योजिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे.
  • उस्मानाबाद : या शहराचे जुने नाव धाराशिव हे आहे या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत या शहराजवळून भोगावती नदी वाहते .
  • जालना
  • नांदेड
  • परभणी
  • बीड
  • लातूर
  • हिंगोली

महत्त्वाची ठिकाणे

नांदेडचा सचखंड गुरुद्वारा

शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथ्री, संत एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, औंढा-नागनाथ, घृष्णेश्वर मंदिर, शीखांचा नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.

नद्या

नांदूर मधमेश्वर कालवा

मराठवाड्यातून गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.

मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बर्‍याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणा नदीस मिळते.

सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे. [३]

प्रशासन

महसूल

मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून औरंगाबाद महसुली विभाग तयार झाला आहे.विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.

न्यायदान

सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते.

अर्थव्यवस्था

शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तांदूळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. औरंगाबाद, लातूर आणि नांदेड शहरांच्या परिसरात औद्योगिकीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

समाजरचना आणि लोकजीवन

शिक्षण

औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,मौलाना आझाद महाविध्यलय आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पीपल्स कॉलेज प्रसिद्ध आहे . इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.[४] सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. उस्मानाबाद येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिले नाट्यशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरु झाले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.[५] प्रदेशातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्‍या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेवून या विद्यापीठाची स्‍थापना करण्‍यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍य त्‍याच्‍या राज्‍यातील कृषि क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाच्‍या नामविस्‍तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करण्‍यात आला आहे. शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्‍या स्‍थापनेने सुरवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्‍न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तंत्र विद्यालये, ३३ संलग्‍न कृषि तंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्‍यांना कृषि विषयक शिक्षण देण्‍यात येते. विद्यापीठामध्‍ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन, कृषि अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्‍नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्‍युत्‍तर तर आचार्य पदवी कार्यक्रम कृषि शाखेच्‍या नऊ विषयात, अन्‍नतंत्रज्ञान शाखेत पाच विषय, कृषि अभियांत्रिकी शाखेतील चार विषयात व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्‍यात येतो. संशोधन – विद्यापीठात राज्‍य शासन अनुदानीत ३४ संशोधन योजनाा, २४ अखिल भारतीय समन्‍वयक संशोधन प्रकल्‍प कार्यरत असून आजपर्यंत सव्‍वाशेपेक्षा जास्‍त्‍ा विविध पिकांचे वाण, पंचवीस पेक्षा जास्‍त कृषि औजारे व यंत्रे विकसीत करुन सहाशेपेक्षा जास्‍त तंत्रज्ञान शिफारसी शेतक-यांसाठी प्रसारीत केल्‍या आहेत. विस्‍तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकयांपर्यंत पोहोचण्‍याचे कार्य विस्‍तार शिक्षण गट (१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषि विस्‍तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्‍यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्‍तार शिक्षण उपक्रम नियमित राबवित असते. दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन), १७ सप्‍टेंबर रोजी रबी पिक मेळावा (मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन) घेण्‍यात येवून शेतक-यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करण्‍यात येते व विद्यापीठाने तयार केलेल्‍या बियाणाचे वाटप केले जाते. क्रांती ज्‍योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्‍त ३ जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळावा दरवर्षी आयोजीत केला जातो. याचा लाभ राज्‍यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषि दिनदर्शिका, विविध विषयावरील पुस्तिका, घडीपत्रीका, शेती भाती मासिक याचे प्रकाशन करण्‍यात येते.

नामांकित शिक्षण संस्था

  • सरस्वती भुवन शिक्षण संस्था
  • योगेश्वरी शिक्षण संस्था
  • मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
  • भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ
  • नूतन शिक्षण संस्था
  • नवविकास मंडळ शिक्षण संस्था

संस्कृती

साहित्य आणि साहित्यिक

अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र
  • मराठवाड्यातील डॉक्टर यू.म.पठाण यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे.कै.नरहर कुरुंदकरमराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते.नाथराव नेरळकरयांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली.लक्ष्मीकांत तांबोळी, फ.मुं. शिंदे यांनी काव्य तर नरेंद्र नाईक यांनी काव्य व कांदबरी लेखन केले.त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रिरीयतेच्या उत्तुंग शिखरावर आहे.दैनिक मराठवाडाचे संपादक कै.अनंत भालेरावदैनिक प्रजावाणी, नांदेडचे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.डॉ.लक्ष्मण देशपांडे यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ.वा.ल.कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
  • ’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
  • ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे):हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक : नरेंद्र नाईक
  • ’नाटयधर्मी मराठवाडा ’ - लेखक : त्र्यंबक महाजन.
  • ’मराठवाडी माणसं’ - लेखक : यू. म. पठाण
  • ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : यू.म. पठाण
  • ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : यू.म. पठाण
  • ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकांत महामुनी

वृत्तपत्रे

  • दै. मराठवाडा
  • दै. लोकमत
  • दै. सकाळ
  • दै. दिव्य मराठी

संकीर्ण

मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति

राजकारण
गोविंदभाई श्रॉफ
  • डी. के.देशमुख

मराठवाडा शिक्षक मतदार संघ

१९७४ साली मराठवाड्याला स्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.

  • डी. के.देशमुख
  • राजाभाऊ उदगीरकर
  • पी.जी.दस्तुरकर
  • प.म.पाटील
  • वसंतराव काळे
  • विक्रम काळे
समाजकारण आणि ग्रामीण विकास
  • पाचलेगावकर महाराज: संस्थापक मुक्तेश्वर दल, हिंदू राष्ट्र सेना. सामाजिक कार्यकर्ते, हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे नेते.
  • लक्ष्मण गायकवाड
  • मच्छिंद्र गोजमे
  • ना.य. डोळे
  • स्वातंत्र्यसैनिक भगवंतराव नाईक, [[हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इंदिरा बचाव आंदोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच, कंधार प.स.चे पहिले सदस्य]]
  • विठ्ठलराव देशपांडे
  • प्रा. मधुकर मुंडे
  • विजयआण्णा बोराडे
व्यावसायिक
  • नंदकुमार धूत
  • जवाहरलाल दर्डा
  • मच्छिन्द्र चाटे
  • रणजित देशमुख
  • बद्रीनारायण बारवाले
मराठवाड्यातील साहित्यिक
मराठवाड्यातील कलावंत

धार्मिक संस्कृतिपालक

  • महंत शिवाजी महाराज नारायणगड 
  • संदीपान महाराज शिंदे हासेगावकर 
  • केशव महाराज उखळीकर परळी 
  • ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव(माउलीचे)
  • चैतन्य महाराज देगलूरकर देगलूर 
  • माधव बुआ शास्त्री अंबाजोगाई 
  • योगीराज महाराज पैठणकर 
  • प्रकाश महाराज बोधले, डिकसळ
  • मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे.

खेळाडू

पत्रकार

श्री. अनंत भालेराव

श्री. स.मा. गर्गे

श्री. प्रशांत दीक्षित

हेसुद्धा पाहा

मराठवाडा या विषयावरची पुस्तके

  • मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)

संदर्भ

  1. ^ [१], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.
  2. ^ http://marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_content&view=article&id=10390. ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr. १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास.
  5. ^ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ.

प्लॅनिंग कमिशन रिपोर्ट

बाह्य दुवे

[२][मृत दुवा] संकेतस्थळ]

महाराष्ट्र
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ