"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३: ओळ ३३:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील [[रामजी मालोजी सकपाळ]] यांनी [[पुणे|पुण्यातील]] पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिले. तेथेच १९९१ साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील [[रामजी मालोजी सकपाळ]] यांनी [[पुणे|पुण्यातील]] पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिले. तेथेच १९९१ साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.


पुढे [[अस्पृश्यता]] निर्मूलन कार्य, [[भारतीय संविधान]] निर्मिती व [[नवबौद्ध चळवळ|सामुदायिक बौद्ध धम्म दीक्षा]] व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|शीर्षक=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|website=www.mahanews.gov.in|access-date=2018-05-23}}</ref><ref name=":3" />
==पुढे==
पुढे [[अस्पृश्यता]] निर्मूलन कार्य, [[भारतीय संविधान]] निर्मिती व सामुदायिक [[बौद्ध धम्म]] दीक्षा व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|शीर्षक=https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=|website=www.mahanews.gov.in|access-date=2018-05-23}}</ref><ref name=":3" />


आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरसुद्धा त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख सन १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. त्या निवासस्थानामध्ये रामजी सकपाळ आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मपाल यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत यांनी दिल्लीत २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे [[व्ही.पी. सिंग]] सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते संघशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी कमिटीची बैठक घेतली. तेथे निश्चित करण्यात आले, की स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री [[सुंदरलाल पटवा]] यांना आमंत्रित केले जावे. याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ई.डी. निमगडे यांनी तयार केले व जयंती उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबईला गेले शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]चे घनश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ ला महूला आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० व्या स्वर्णजयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि मंत्री भेरूलाल पाटीदार व भन्ते धर्मशील होते.<ref name="patrika">{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/indore-news/madhya-pradesh-former-chief-minister-sunderlal-patwa-passed-away-1474586/|शीर्षक=Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा|work=www.patrika.com|access-date=2018-05-23|language=hi-IN}}</ref><ref name="लोकार्पण"/><ref name=":3" />
आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. [[महापरिनिर्वाण दिन|आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरसुद्धा]] त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. [[भंडारा जिल्हा|भंडारा]] जिल्ह्यातील [[भिक्खू|भदंत]] धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख सन १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. त्या निवासस्थानामध्ये रामजी सकपाळ आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मशील यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत धर्मशील यांनी [[दिल्ली]]त २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे [[व्ही.पी. सिंग]] सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते धर्मशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी कमिटीची बैठक घेतली. तेथे निश्चित करण्यात आले, की स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री [[सुंदरलाल पटवा]] यांना आमंत्रित केले जावे. याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ई.डी. निमगडे यांनी तयार केले व जयंती उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबईला गेले शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]चे घनश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ ला महूला आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० व्या स्वर्णजयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि मंत्री भेरूलाल पाटीदार व भन्ते धर्मशील होते.<ref name="patrika">{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/indore-news/madhya-pradesh-former-chief-minister-sunderlal-patwa-passed-away-1474586/|शीर्षक=Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा|work=www.patrika.com|access-date=2018-05-23|language=hi-IN}}</ref><ref name="लोकार्पण"/><ref name=":3" />


निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले.. पुढे २००३ मध्ये आंबेडकरांच्या सन्मानार्थ 'महू'ला डॉ. आंबेडकर नगर असे नाव दिले गेले. .<ref name=":3" >{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/|शीर्षक=Aurangabad ePaper: Read Aurangabad Local Marathi Newspaper Online|संकेतस्थळ=m.epaperdivyamarathi.bhaskar.com|अॅक्सेसदिनांक=2019-04-27}}</ref><ref name="लोकार्पण"/><ref name=":3" />
निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. पुढे २००३ मध्ये आंबेडकरांच्या सन्मानार्थ 'महू'ला ''डॉ. आंबेडकर नगर'' असे नाव दिले गेले.<ref name=":3" >{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/|शीर्षक=Aurangabad ePaper: Read Aurangabad Local Marathi Newspaper Online|संकेतस्थळ=m.epaperdivyamarathi.bhaskar.com|अॅक्सेसदिनांक=2019-04-27}}</ref><ref name="लोकार्पण"/><ref name=":3" />


==रचना==
==रचना==

००:०१, १० मे २०१९ ची आवृत्ती

भीम जन्मभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक स्मारक
ठिकाण डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदूर जिल्हा मध्य प्रदेश, भारत
बांधकाम सुरुवात १४ एप्रिल १९९१
पूर्ण १४ एप्रिल २००८
एकूण मजले दोन
क्षेत्रफळ २२ हजार चौरस फूट
बांधकाम
व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, डॉ. आंबेडकर नगर-महू
वास्तुविशारद ई.डी. निमगडे

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. (महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War-MHOW हे नाव होते. पुढे त्याच महू नावाने ते गाव ओळखले जाऊ लागले.)[१] महूत झालेल्या भीमराव आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील आंबेडकरवादी लोकांनी त्या गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे. यासाठी राज्य शासनाकडून देखील काही सहकार्य त्यांना झाले. या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल १९९१ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. १४ एप्रिल २००८ रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांचे हस्ते लोकार्पण केले गेले.[२] प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एके काळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी १७ वर्ष प्रयत्न करावे लागले, त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील २० वर्षे लागली. एकूण ३७ वर्षांच्या प्रयत्नांनंतर २२ हजार चौरस फूट जागेत जन्मभूमीवर दोन मजली विहार तयार झाले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ई.डी. निमगडे यांची आहे.[३][४]

मध्य प्रदेशातील भोपाळ येथून २१६ किमी अंतरावर व इंदूर येथून २० किलोमीटर अंतरावर महू आहे. महूची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. त्याच कारणासाठी २०१६ साली १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.[५][६] २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महूला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.[७] पंचतीर्थ म्हणून भारत सरकारद्वारे विकसित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा पाच स्थळांपैकी हे एक स्थळ आहे.

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिले. तेथेच १९९१ साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.

पुढे अस्पृश्यता निर्मूलन कार्य, भारतीय संविधान निर्मिती व सामुदायिक बौद्ध धम्म दीक्षा व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते.[८][४]

आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरसुद्धा त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख सन १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. त्या निवासस्थानामध्ये रामजी सकपाळ आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मशील यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत धर्मशील यांनी दिल्लीत २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे व्ही.पी. सिंग सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते धर्मशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी कमिटीची बैठक घेतली. तेथे निश्चित करण्यात आले, की स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना आमंत्रित केले जावे. याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ई.डी. निमगडे यांनी तयार केले व जयंती उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबईला गेले शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे घनश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ ला महूला आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० व्या स्वर्णजयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर अटलबिहारी वाजपेयी आणि मंत्री भेरूलाल पाटीदार व भन्ते धर्मशील होते.[२][३][४]

निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. पुढे २००३ मध्ये आंबेडकरांच्या सन्मानार्थ 'महू'ला डॉ. आंबेडकर नगर असे नाव दिले गेले.[४][३][४]

रचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या रमाईंच्या पुतळ्यांना अभिवादन करताना

भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे आहे. दोन मजली विहारात बाबासाहेबांचे एकूण तीन पूर्णाकृती ब्राँझचे पुतळे आहेत. पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे. तळमजल्यावर रमाईसोबत दुसरा पुतळा आहे. वरच्या मजल्यावर तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब धम्मदीक्षा घेतानाचाही पूर्णाकृती पुतळा आहे. प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती भीम जन्मभूमि अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे अशोकचक्र कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन व एक शीर्षभागावर असे तीन पंचशील ध्वज (बौद्ध ध्वज) लावलेले आहेत. शिवाय तळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे म्यूरल्स, वरच्या भागात चित्रप्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या 'अस्थी' ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात.[४]

स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.[४]

कार्यक्रम

मध्य प्रदेश सरकार दरवर्षी आंबेडकर जयंतीला महूमध्ये 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.[९]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ www.dgde.gov.in (इंग्रजी भाषेत) http://www.dgde.gov.in/content/bharat-ratna-dr-b-r-ambedkar-smarak-mhow-cantonment. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b www.patrika.com (हिंदी भाषेत) https://m.patrika.com/indore-news/madhya-pradesh-former-chief-minister-sunderlal-patwa-passed-away-1474586/. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b c फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2015-01-01 https://www.forwardpress.in/2015/01/mahu-me-banega-ambedkar-smark/. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b c d e f g m.epaperdivyamarathi.bhaskar.com http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/14042019/0/8/. 2019-04-27 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ www.narendramodi.in https://www.narendramodi.in/hi/pm-modi-visits-the-birth-place-of-dr-bhimrao-ambedkar-440346. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ NDTVIndia https://khabar.ndtv.com/news/india/mhow-dr-amdedkars-125th-anniversary-pm-narendra-modi-speech-1395476. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ News18 India https://hindi.news18.com/news/madhya-pradesh/indore-president-ramnath-kovind-talks-about-bhimrao-ambedkar-at-mhow-1342561.html. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ www.mahanews.gov.in https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ m.hindi.webdunia.com http://m.hindi.webdunia.com/national-hindi-news/ambedkar-jayanti-mhow-madhya-pradesh-birthplace-118041300094_1.html. 2018-05-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे