आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंबेडकर महिला कल्याण पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जातीअनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय विचारधेच्या अंतर्गत मागासलेल्या लोकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात मुख्य प्रवाहात समर्पित केले. राजस्थान सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील प्रेरणा घेऊन १४ एप्रिल २००५ रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी, राज्यातील सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सुधारणा आणि न्याय या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी खालील पुरस्कारांची सुरुवात केली होती[१]:-

पात्रतेच्या अटी[संपादन]

खालिलप्रमाणे पात्र ठरणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो: -

  • महिला राजस्थाना मूळ रहिवासी असावी / संस्था ही राजस्थानची मूळ नोंदणीकृत संस्था असावी.
  • जिल्हा कलेक्टरचे उत्तम चरित्र आणि उत्तम प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र पत्र प्राप्त असावे.
  • संस्था / महिला कमीतकमी ४ वर्षापासून नोंदणीकृत असावी आणि अनुसूचित जाती / जमातींच्या सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असावी.
  • महिला उत्थान क्षेत्रातील भारत सरकार / राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा दुर्लक्षित वर्गांपर्यंत पोहोचवण्यात उल्लेखनीय भूमिका / योगदान राहिलेले असावे.
  • संस्था / महिलेद्वारा समाजाकडून आर्थिक सहाय्य घेऊन किंवा स्वतः च्या स्रोतापासून वंचित वर्गासाठी कार्य केलेले असावे.

पुरस्काराचे स्वरूप[संपादन]

पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्‍यक्ती किंवा संस्‍थेला ५०,००० (पन्नास हजार) रुपये व प्रशस्ती पत्रक देऊन सम्‍मानित करण्यात येते.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]