मराठी भाषा
| marāṭhī | |
|---|---|
| मराठी | |
| भाषिक देश | भारत, मॉरिशस व इस्रायल |
| भाषिक प्रदेश | महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू |
| बोलीभाषा | कोकणी, अहिराणी, माणदेशी, मालवणी, वर्हाडी |
| लिपी | देवनागरी, मोडी लिपी (प्राचीन) |
| भाषिक लोकसंख्या | ७,००,००,००० (प्रथमभाषा) २,००,००,००० (द्वितीयभाषा) |
| भाषिक लोकसंख्येनुसार क्रमांक |
१५ |
| भाषाकुलदृष्ट्या वर्गीकरण |
इंडो-युरोपीय इंडो-इराणीय |
| अधिकृत दर्जा | |
| प्रशासकीय वापर | भारत राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
| भाषा संकेत | |
| ISO 639-1 | mr |
| ISO 639-2 | mar |
| ISO 639-3 | mar |
मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी[१] व भारतातील चौथी भाषा आहे.[२] मराठी बोलणार्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे.[३] मराठी भाषेची निर्मिती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.
अनुक्रमणिका |
मराठीभाषी प्रदेश
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[४] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[५]
भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदावाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैदराबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तमिळनाडू)
राजभाषा
भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व व कोणत्याही कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते.४२वा अहवाल- जुलै २००३-०४ pp. para 11.3</ref>, दादरा व नगर हवेली[६] या केंदशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[७], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[८], उस्मानिया विद्यापीठ (आंध्र प्रदेश)[९], गुलबर्गा विद्यापीठ[१०], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[११] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[१२] येथेही मराठीच्या उच्च शिक्षणासाठीचे विभाग आहेत.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६०[१३] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३०[संदर्भ द्या] पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.
सर्वांत जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ.स. ७३९) येथे आहे. श्रवणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वांत प्राचीन समजला जाणारा मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.
श्री गंगाराये सुत्ताले करवियले ।
असे त्या शिलालेखातील मराठी लेखन आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठीतील पहिला शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. विशेष म्हणजे त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेलाअसावा. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. तो आता मागे पडला असून तो मान कुडलला मिळाला आहे. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला. त्यामुळे मराठीतील आद्य शिलालेखाचा मान आता कुडलकडे आला आहे[१४]. ९४० संवत्सरात कोणी पंडिताने मंदिराला भेट दिली अशा आशय त्यात आहे.
मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५००शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाल
हा काल इ.स. १२०० पूर्व, म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काल होय. या काळात विवेकसिंधु या साहित्याव्यतिरिक्त नाव घेण्यासारखी कोणतीही साहित्यकृती पाहण्यास शिल्लक राहू शकली नाही. या काळातील मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात.
यादवकाल
हा काल इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळाता वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. सांकेतिक लिपी ची सुरुवातही याच काळात झाली असावी असे मानले जाते.
बहामनी काल
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांचे स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांचा काळ सुरू झाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांचे आगमन झाले. अशा धामधुमीच्या काळातही साहित्याची भर मराठी भाषेत पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
शिवकाल
हा काल इ.स. १६०० ते इ.स. १७०० असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मर्राठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी या कवींनीही भाषेत भर घातली.
पेशवे काल
हा काल इ.स. १७०० ते इ.स. १८१८ असा आहे. याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडवप्रताप या काव्याद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झाले. याच काळात वाङ्मय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, वामन पंडित, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काल इ.स. १७१८ ते आजतागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याचा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली. छपाईची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी चिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.
१९५० ते १९८०
| विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. |
साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. साठीच्या मध्यान्ही विजय तेंडुलकरांचा सूर्य सांस्कृतिक आकाशात तळपू लागला होता; ‘शांतता’ने नवनाट्यविश्व व्यापलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. अक्षरश: शेकडो उत्साही, नव-सर्जनशील तरुण आपापले (बंडखोर) मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पँथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अॅकॅडमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक धर्मपीठ आणि श्री. पु. भागवत हे त्या व्हॅटिकनचे पोप. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु. ल. देशपांड्यांवर. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’चा.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हेसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री. ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग. वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. इचलकरांजीचे पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.[१५]
मराठी साहित्य
प्रमुख लेख मराठी साहित्य येथे आहे.
मराठी मुळाक्षरांचे उच्चार
| Labial | Dental | Alveolar | Retroflex | Alveopalatal | Velar | Glottal | |
|---|---|---|---|---|---|---|---|
| Voiceless stops |
p pʰ |
t̪ t̪ʰ |
ʈ ʈʰ |
cɕ cɕʰ |
k kʰ |
||
| Voiced stops |
b bʰ |
d̪ d̪ʰ |
ɖ ɖʰ |
ɟʝ ɟʝʰ |
ɡ ɡʰ |
||
| Voiceless fricatives |
s | ɕ | h | ||||
| Nasals | m mʰ |
n̪ n̪ʰ |
ɳ ɳʰ |
ɲ | ŋ | ||
| Liquids | ʋ ʋʰ |
l ɾ lʰ ɾʰ |
ɭ ɽ | j |
| Front | Central | Back | |
|---|---|---|---|
| High | iː i |
uː u |
|
| Mid | eː | ə | oː |
| Low | aː |
संगणकावर मराठी
| देवनागरी युनिकोड | 0 | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | A | B | C | D | E | F | |
| U+090x | ऀ | ँ | ं | ः | ऄ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ऋ | ऌ | ऍ | ऎ | ए | |
| U+091x | ऐ | ऑ | ऒ | ओ | औ | क | ख | ग | घ | ङ | च | छ | ज | झ | ञ | ट | |
| U+092x | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | ध | न | ऩ | प | फ | ब | भ | म | य | |
| U+093x | र | ऱ | ल | ळ | ऴ | व | श | ष | स | ह | ़ | ऽ | ा | ि | |||
| U+094x | ी | ु | ू | ृ | ॄ | ॅ | ॆ | े | ै | ॉ | ॊ | ो | ौ | ् | ॎ | ||
| U+095x | ॐ | ॑ | ॒ | ॓ | ॔ | ॕ | क़ | ख़ | ग़ | ज़ | ड़ | ढ़ | फ़ | य़ | |||
| U+096x | ॠ | ॡ | ॢ | ॣ | । | ॥ | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | |
| U+097x | ॱ | ॲ | ॹ | ॺ | ॻ | ॼ | ॽ | ॾ | ॿ |
| ↓ ☸ → | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | A | B | C | D | E | F |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| u+A8Ex | ꣠ | ꣡ | ꣢ | ꣣ | ꣤ | ꣥ | ꣦ | ꣧ | ꣨ | ꣩ | ꣪ | ꣫ | ꣬ | ꣭ | ꣮ | ꣯ |
| u+A8Fx | ꣰ | ꣱ | ꣲ | ꣳ | ꣴ | ꣵ | ꣶ | ꣷ | ꣸ | ꣹ | ꣺ | ꣻ |
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
- मराठी भाषा अभ्यास परिषद
- राज्य मराठी विकास संस्था
- मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- भाषा संचालनालय
- मराठी साहित्य महामंडळ
- विदर्भ साहित्य संघ
- महाराष्ट्र साहित्य परिषद
हेसुद्धा पहा
मराठी संकेतस्थळे
- विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे
या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
मायबोली.कॉम , १६ सप्टेंबर गणेश चतुर्थी इ.स. १९९६ .मराठीतला पहिला ब्लॉगसमूह मायबोली.कॉम या संकेतस्थळावर रंगीबेरंगी या नावाने डिसेंबर २००३ मधे सुरू झाला [१६](आपले संकेतस्थळ मराठीतील पहिले असल्याचा अधिकृतरित्या दावा त्या संकेतस्थळाने केल्याचे आढळत नाही.[१७]
संदर्भ
- मराठी भाषेचा इतिहास
- मराठी भाषेबद्दल माहिती
- नितिन सावंत यांनी बनवलेले मराठी भाषा की-बोर्ड(कळपट) सॉफ्टवेर
- ↑ एन्कार्टा- १ कोटीपेक्षा जास्त बोलणारे असलेल्या भाषा
- ↑ भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार
- ↑ भाषाइंडिया.कॉम- मराठी
- ↑ एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल
- ↑ इंडियनलँग्वेजेस.कॉम- मराठी
- ↑ दादरा व नगर हवेली प्रशासनाचे माहितीपत्रक
- ↑ गोवा विद्यापीठ- मराठी विभाग
- ↑ महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा
- ↑ उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद
- ↑ गुलबर्गा विद्यापीठ
- ↑ देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर
- ↑ जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली
- ↑ १९६० मधे महाराष्ट्राचे एकभाषिक राज्य स्थापन झाले - मराठीमाती
- ↑ Sakal news 18th April 08 http://www.esakal.com/esakal/04182008/Specialnews3001EC8B53.htm
- ↑ Google च्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34417:2009-12-24-16-51-58&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 ची कॅश आहे. 29 Dec 2009 08:22:53 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा फोटो आहे.
- ↑ [१]
- ↑ महाजालावरील मराठीचा इतिहास-१-नरेन्द्र गोळे
| जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्या २० भाषा
|
|||||||
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |