"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:
| align="left" | '''दिनांक / महिना
| align="left" | '''दिनांक / महिना
| align="left" | '''इसवी सन'''
| align="left" | '''इसवी सन'''
|वय वर्षे
|'''वय वर्षे'''
| align="left" | '''घटना'''
| align="left" | '''घटना'''
|-
|-
ओळ १४: ओळ १४:
| align="left" | १४ एप्रिल
| align="left" | १४ एप्रिल
| align="left" | १८९१
| align="left" | १८९१
|
|
| align="left" | [[मध्यप्रदेश]]ातील '[[महू]]' गावी जन्म.
| align="left" | [[मध्यप्रदेश]]ातील '[[महू]]' गावी जन्म.
|-
|-
ओळ २१: ओळ २१:
| align="left" | १८९६
| align="left" | १८९६
|५
|५
| align="left" | आई, भिमाईचे निधन
| align="left" | आई, [[भामाबाई रामजी सकपाळ|भिमाईचे]] निधन
|-
|-
| align="left" | ३
| align="left" | ३
ओळ २७: ओळ २७:
| align="left" | १९००
| align="left" | १९००
|९
|९
| align="left" | सातार्‍याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रवेश.
| align="left" | [[सातारा|साताऱ्याच्या]] सरकारी शाळेत (आजचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) १ल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश.
|-
|-
| align="left" | ४.
| align="left" | ४.
ओळ ४५: ओळ ४५:
| align="left" | १९०६
| align="left" | १९०६
|
|
| align="left" | ९ वर्षीय [[रमाई भीमराव आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी विवाह.
| align="left" | ९ वर्षीय [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी विवाह.
|-
|-
| align="left" | ६.
| align="left" | ६.
ओळ ५७: ओळ ५७:
| align="left" | १९०८
| align="left" | १९०८
|
|
| align="left" | एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश
| align="left" | एलफिन्स्टन महाविद्यालयात ([[मुंबई विद्यापीठ]]) प्रवेश
|-
|-
| align="left" |
| align="left" |
ओळ ६३: ओळ ६३:
| align="left" | १९०८
| align="left" | १९०८
|
|
| align="left" | ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत
| align="left" | ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माकडे]] पहिल्यांदा आकर्षीत
|-
|-
| align="left" | ८.
| align="left" | ८.
ओळ १४१: ओळ १४१:
| align="left" | १९१७
| align="left" | १९१७
|
|
| align="left" | लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
| align="left" | बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
|-
|-
| align="left" | १६.
| align="left" | १६.

१२:१०, ११ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब अांबेडकर (१८९१-१९५६) यांचा जीवनक्रम खालीलप्रमाणे आहे.[१]

जीवनक्रम

अ.क्र. दिनांक / महिना इसवी सन वय वर्षे घटना
१४ एप्रिल १८९१ मध्यप्रदेशातील 'महू' गावी जन्म.
१८९६ आई, भिमाईचे निधन
७ नोव्हेंबर १९०० साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) १ल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश.
४. नोव्हेंबर १९०४ इयत्ता ४ थी उतीर्ण.
डिसेंबर १९०४ एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
५. एप्रिल १९०६ ९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह.
६. १९०७ ७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" हे पुस्तक भेट.
७. ३ जानेवारी १९०८ एलफिन्स्टन महाविद्यालयात (मुंबई विद्यापीठ) प्रवेश
१९०८ ‘‘भगवान बुद्धांचे चरित्र’’ हे पुस्तक वाचून बौद्ध धर्माकडे पहिल्यांदा आकर्षीत
८. ८ एप्रिल १९०८ रमाबाईंशी विवाह.
९. १२ डिसेंबर १९१२ मुलगा यशवंत यांचा जन्म झाला.
१०. जानेवारी १९१३ बी.ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. (पर्शियन आणि इंग्रजी हे विषय)
२ फेब्रुवारी १९१३ वडील रामजी आंबेडकर यांचे निधन
११. एप्रिल १९१३ बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांची निवड केली
२० जुलै १९१३ न्यूयार्क शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश
१९१४ अमेरीकेत लाला लजपतराय यांचेशी भेट
१२. २ जून १९१५ “प्राचीन भारतीय व्यापार” हा प्रबंध लिहून एम.ए. ची पदवी मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र व राज्यशास्त्र हे अन्य विषय
१३. जून १९१६ “नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया –अ हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनॅलिटिकल स्टडी “ हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठ ने स्वीकारून पीएच.डी. पदवी प्रदान केली. लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना.
९ मे १९१९ प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार मध्ये कास्ट इन इंडिया हा वैचारिक प्रबंध वाचला
१४. ऑक्टोबर १९१६ अर्थशास्त्रच्या अभ्यासासाठी “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्स” या संस्थेत प्रवेश मिळाला.
११ नोव्हेंबर १९१६ कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये प्रवेश.
१५. जून १९१७ बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली, लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र) या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परत.
१६. सप्टेंबर १९१७ बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले.
१७. १९१८ साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
१८. १० नोव्हेंबर १९१८ मुंबईतील सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).
१६ जानेवारी इ.स. १९१९ महार’ या टोपण नावाने दि टाईम्स ऑफ इंडिया मध्ये लिखाण
१९. ३१ जानेवारी इ.स. १९२० साप्ताहिक मूकनायक सुरू केले
२०. मार्च २१ इ.स.१९२० माणगाव, कोल्हापूर संस्थान येथे शाहू महाराज अध्यक्षपदी असलेल्या अस्पृश्य परिषदेत भाषण
२१. मे इ.स.१९२० शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित राहिले.
५ जुलै इ.स. १९२० प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च शिक्षणासाठी लंडनला प्रयाण.
इ.स. १९२० बर्टाड रसेल यांनी “प्रिन्सिपल ऑफ सोशल रिकन्स्ट्रकशन” या विषयांवर चर्चेसाठी निमंत्रित केले.
एप्रिल १९२१ “भारतातील जिम्मेदार सरकारचे उत्तरदायित्व” या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
२२. जून इ.स.१९२१ लंडन विद्यापीठाने त्यांना “प्रॉव्हिन्सीअल डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया” या प्रबंधाला एम.एस्सी. (अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली.
एप्रिल इ.स. १९२२ उच्च शिक्षणासाठी जर्मनीतील बॉन विद्यापीठामध्ये गेले.
२८ जून इ.स. १९२२ ग्रेज इन विद्यापीठाने बार-ॲट-लॉ (बॅरिस्टर ॲट लॉ) पदवी प्रदान केली.
२३. ऑक्टोंबर इ.स.१९२२ लंडन विद्यापीठात “दी प्रोब्लेम ऑफ रुपी” हा डी.एससी प्रबंध सादर केला .
२४. एप्रिल इ.स.१९२३ जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन पूर्ण केले व भारतात परतले.
२५. ऑगस्ट ४ इ.स.१९२३ बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस. के.बोले यांनी मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
नोव्हेंबर इ.स. १९२३ लंडन विद्यापीठाने डी.एससी. प्रदान केली.
२६. जुलै २० इ.स.१९२४ मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली, घोषवाक्य – शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
४ जानेवारी इ.स. १९२५ उच्च शाळांत शिकणार्‍या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूरमध्ये वसतिगृह सुरु केले.
१५ डिसेंबर इ.स. १९२५ हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
डिसेंबर इ.स. १९२५
२७. जानेवारी इ.स.१९२७ मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलवर नियुक्ती केली.
१ जानेवारी इ.स. १९२७ भिमा कोरेगांवच्या विजय स्तंभाला भेट दिली. महार सैनिकांना वंदन केले.
मार्च १९२७ डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना केली.
२८. १९-२० मार्च इ.स.१९२७ डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळे महाड सत्याग्रह केला. दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन केले.
३ एप्रिल इ.स.१९२७ डॉ. आंबेडकरांनी पाक्षिक ‘बहिष्कृत भारत’ सुरु केले. याचे संपादक स्वत: बाबासाहेब होते.
२९. एप्रिल ३ इ.स.१९२७ बहिष्कृत भारत नावाचे मराठी पाक्षिक सुरू केले. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली.
३ मे इ.स. १९२७ कल्याण जवळील बदलापुर गावांत आयोजित शिवाजी जयंती समारोह त्यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.
८ जून इ.स.१९२७ डॉ. आंबेडकरांच्या ‘इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश इंडिया’ या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान केली.
३०. ऑगस्ट ४ इ.स. १९२७ महाड नगरपालिकेने इ.स.१९२४ साली स्वतःच पास केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
३१. सप्टेंबर इ.स.१९२७ समाज समता संघ स्थापन केला.
३२. ऑगस्ट इ.स.१९२८ बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला एक मागण्याचा खलिता सादर केला व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
३३. ३ मार्च इ.स. १९३० नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
३४. १७ ते २१ नोव्हेंबर इ.स.१९३० लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर केला.
३५ ऑगस्ट १४ इ.स.१९३१ मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
३६. २० ऑगस्ट इ.स.१९३२ भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला. ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
३७. २४ सप्टेंबर इ.स.१९३२ पुणे करारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली.
३८. इ.स.१९३४ परळ येथून दादरला राजगृह येथे राहण्यास गेले, कारण पुस्तकांसाठी जागा अपुरी पडत होती.
३९. मे २६ इ.स.१९३५ रमाई यांचे निधन
४०. जून १ इ.स.१९३५ डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या प्राचार्य पदी नेमणूक.
४१ ऑक्टोबर १३ इ.स.१९३५ येवला, येथे धर्मांतराची घोषणा
४२ ऑगस्ट इ.स.१९३६ “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.
४३ मार्च १८ इ.स.१९३७ मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या,दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल अस्पृशांच्या बाजूने दिला.
४४ डिसेंबर इ.स.१९४० थॉट्स आॅन पाकिस्तान हे पुस्तक प्रसिद्ध
४५ जुलै १८ इ.स.१९४२ आॅल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची नागपूर येथे स्थापना.
४६ जुलै २० इ.स.१९४२ व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडलावर मजूर खात्याच्या मंत्री म्हणून नेमणूक.
४७ जून इ.स.१९४५ “व्हॉट काँग्रेस ॲन्ड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल” या ग्रंथाचे प्रकाशन
४८ जून २० इ.स.१९४५ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत दी पीपल्स एजुकेशन सोसायटी तर्फे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
४९ ऑक्टोबर इ.स.१९४६ “हू वेअर दी शुद्राज” या ग्रंथाचे प्रकाशन. डॉ.आंबेडकर बंगालमधून घटनासमितीवर निवडून गेले.
५० ऑगस्ट २९ इ.स.१९४७ स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी नियुक्ती
५१ फेब्रुवारी इ.स.१९४८ घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
५२ एप्रिल १५ इ.स.१९४८ डॉ.शारदा कबीर यांच्याशी नवी दिल्ली येथे विवाह.
५३ नोव्हेंबर ४ इ.स.१९४८ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
५४ सप्टेंबर १ इ.स.१९५० मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बसवण्यात आली.
५५ फेब्रुवारी ५ इ.स.१९५१ भारतीय संसदेपुढे हिंदू कोड बील मांडले.
५६ जुलै इ.स.१९५१ भारतीय बुद्ध जनसंघ या संस्थेची स्थापना
५७ सप्टेंबर २७ इ.स.१९५१ मंत्रीमंडळातील पदाचा राजीनामा, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
५८ जून ५ इ.स.१९५२ कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ(एल एल डी) ही पदवी प्रदान केली.
५९ जानेवारी १२ इ.स.१९५३ हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर(डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
६० डिसेंबर इ.स.१९५४ ब्रम्हदेशातील रंगून येथे भरलेल्या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत सहभाग.
६१ मे इ.स.१९५६ बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना. प्रबुद्ध भारत हे साप्ताहिक सुरू केले
६२ जून इ.स.१९५६ पीपल्स एजुकेशन सोसायटीने मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले.
६३ ऑक्टोबर १४ इ.स.१९५६ नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या कडून बौद्ध धम्म दीक्षा;बौद्ध धम्म स्विकार केला.
६४ ऑक्टोबर १५ इ.स.१९५६ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
६५ नोव्हेंबर इ.स.१९५६ नेपाल येथील काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध परिषदेत भाग घेतला.तेथे बुद्ध व कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले.
६६ डिसेंबर ६ इ.स.१९५६ नवी दिल्ली येथे अलीपूर रोड निवास्थानी डॉ.आंबेडकरांचे महापरिनिर्वाण

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "महामानवाचा जीवनपट !". Loksatta. 2018-04-14. 2018-05-10 रोजी पाहिले.