"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:


==रचना==
==रचना==
बाबासाहेबांचा हा पुतळा चौथऱ्यापासून साडे बारा फूट उंच असून मुनष्याच्या चार पट लाईट साईज आकाराचा आहे. पंचधातुने निर्मित पुतळ्याचे वजन दीड टन आहे. तो मॅन्युमेंट मेमोरियल 'भव्य स्मारक शिल्प' नावाने ओळखला जातो. बाबासाहेबांच्या एका हातात [[भारताचे संविधान]] असून दुसऱ्या हाताचे एक बोट [[भारतीय संसद]]ेकडे अंगुलिनिर्देश करताना दर्शविले आहे. या भावमुद्रेवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर


== हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा==

१५:४५, ६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा दिल्लीच्या भारतीय संसद भवनासमोर इ.स. १९६७ मध्ये उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूचा पुतळा आहे. हा पुतळा १५ फुट उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारताचे संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.[१] बाबासाहेबांचा संसद भवन परिसरात उभारला गेलेला दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी जवाहरलाल नेहरूंचे वडिल मोतीलाल नेहरू यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आलेला आहे.

निर्मिती

हा डॉ. आंबेडकर पुतळा मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने तो भेट दिला होता. बाबासाहेबांचा पुतळा बनवण्यासाठी वाघ यांना माईसाहेब आंबेडकरांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तयार झाला.

ब्रह्मेश वाघ यांनी मुंबईतील कूपरेड मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा पुतळा सर्वप्रथम इ.स. १९५९ साली तयार केलेला आहे.

अनावरण

२ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे अनावरण झालेले आहे.[२] ‘ज्ञानार्जन चीलू ठेवा, सत्याचा शोध व ते आचरणात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करा, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीयांना संदेश आहे’ असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात काढले. राष्ट्रपती पुढे म्हणाले, ‘लोकशाही पद्धतीवर डॉ. आंबेडकरांची नितांत श्रद्धा होती. रक्तपात होऊ न देता समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडविता येणे शक्य आहे, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हा विश्वास अनाठायी नव्हता, हे भारतातील अनेक स्थित्यंतरावरून सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय ऐक्यावर त्यांचा भर होता. भारतात जोपर्यंत हिंदू, मुस्लिम, सिंधी, तमिळी असे भेदभाव राहतील तोपर्यंत भारताती प्रगती होणार नाही, असे त्यांचे विचार होते.’

रचना

बाबासाहेबांचा हा पुतळा चौथऱ्यापासून साडे बारा फूट उंच असून मुनष्याच्या चार पट लाईट साईज आकाराचा आहे. पंचधातुने निर्मित पुतळ्याचे वजन दीड टन आहे. तो मॅन्युमेंट मेमोरियल 'भव्य स्मारक शिल्प' नावाने ओळखला जातो. बाबासाहेबांच्या एका हातात भारताचे संविधान असून दुसऱ्या हाताचे एक बोट भारतीय संसदेकडे अंगुलिनिर्देश करताना दर्शविले आहे. या भावमुद्रेवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित
  2. ^ http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp