"मंगेश पाडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७९: ओळ १७९:


==मंगेशकरांचे काव्यवाचन==
==मंगेशकरांचे काव्यवाचन==
साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा. . बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. पाडगावकरांना मात्र आमंत्रणांची कधीही ददात पडली नाही.
साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. पाडगावकरांना मात्र आमंत्रणांची कधीही ददात पडली नाही.


काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय विरळा. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.
काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय विरळा. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.
ओळ १८६: ओळ १८६:


इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.
इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.

==प्रत्येकाची वेगळी शैली==
बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असं नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेक्जण गळेपर्यंत.

==पैसे मोजून काव्यश्रवण==
बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारुन जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.


== गौरव ==
== गौरव ==

१३:११, १८ मे २०१६ ची आवृत्ती

मंगेश पाडगांवकर
जन्म नाव मंगेश केशव पाडगांवकर
जन्म मार्च १०, इ.स. १९२९
वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू डिसेंबर ३०, इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व मराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
साहित्य प्रकार कविता
वडील केशव पाडगांवकर
पत्नी यशोदा पाडगांवकर
अपत्ये पुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी
पुरस्कार महाराष्ट्र भूषणपुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जीवन

मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीसंस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

प्रकाशित साहित्य

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती
अफाटराव इ.स. २०००
आता खेळा नाचा इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
आनंदऋतू कवितासंग्रह इ.स. २००४
आनंदाचे डोही कवितासंग्रह
उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९९७ २०००, २००३, २००५
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००२, २००६
काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२
गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४
गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३
जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
ज्युलिअस सीझर (नाटक) नाटक इ.स. २००२ २००६
झुले बाई झुला इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९५ २००४
धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५० २००२
नवा दिवस इ.स. १९९३ १९९७, २००१
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५४ १९५८, १९९६
फुलपाखरू निळं निळं इ.स. २०००
बबलगम इ.स. १९६७
बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३
भोलानाथ कवितासंग्रह इ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३
मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००६
मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००६
राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००० २००३
रोमिओ आणि ज्युलिएट
(विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)
नाटक इ.स. २००३
वाढदिवसाची भेट इ.स. २०००
वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४
वादळ ( नाटक) नाटक इ.स. २००१
विदूषक इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३
वेड कोकरू कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
शब्द कवितासंग्रह
शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६० २००३
शोध कवितेचा कवितासंग्रह
सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००
सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००५
सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००४
क्षणिका कवितासंग्रह

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : www.marathi.pro

पापड कविता

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार्‍या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता

१. रिमझिम पावसात जाऊ गं,
गुण गुण गाणे गाऊ गं,
थेंब टपोरे आले गं,
सगळे गोकुळ न्हाले गं,
थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||

२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान;
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान.
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;
एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||

३. या मेघांनो आभाळ भरा
या धरतीवर अभिषेक करा
विहंगाचे मधुगान हरपले
या मातीचे श्वास करपले ||
वाहु दे सुखाचा पुन्हा झरा
सुकून गेल्या वनांवनांवर
सचिंत झाल्या मनांमनांवर
करुणेची संतत धार धरा ||


एखाद्या नव्याकोर्‍या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.

मंगेशकरांचे काव्यवाचन

साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. पाडगावकरांना मात्र आमंत्रणांची कधीही ददात पडली नाही.

काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय विरळा. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.

वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.

इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.

प्रत्येकाची वेगळी शैली

बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असं नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेक्जण गळेपर्यंत.

पैसे मोजून काव्यश्रवण

बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारुन जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.

गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. (इंग्रजी भाषेत) http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=91838. ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे