"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २८: ओळ २८:
==८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन==
==८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन==
[[८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] [[घुमान (पंजाब)]] येथे ३ ते ५ एप्रिल [[इ.स. २०१५]] दरम्यान होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - [https://sadanandmore.wordpress.com/ डॉ. सदानंद मोरे] आहेत . या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी - http://www.sahityasammelanghuman.org/
[[८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] [[घुमान (पंजाब)]] येथे ३ ते ५ एप्रिल [[इ.स. २०१५]] दरम्यान होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - [https://sadanandmore.wordpress.com/ डॉ. सदानंद मोरे] आहेत . या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी - http://www.sahityasammelanghuman.org/

या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या सार्‍या पार्ष्वभूमीवर साहित्य संमेलन या सर्वांचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून देतात, त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवतात. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती देतात. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती मिळते.

आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा ्समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड)


==[[मराठी साहित्य संमेलने]]==
==[[मराठी साहित्य संमेलने]]==

०४:१२, ९ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.

इतिहास

१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[१]

साहित्य संमेलनांचे अध्यक्ष

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष या तीन लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन दलित लेखक आणि यू.म. पठाण हे मुसलमान लेखक अध्यक्ष झालेले आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेचे निमंत्रित सदस्य

अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा तर्फे भरवले जाणारे ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात २५, २६, २७ डिसेंबर २०१० या तारखांना झाले. .दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन या नियोजित ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम झाले. मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) ही या ८४ व्या साहित्य संमेलनाची यजमान संस्था होती व उत्तम कांबळे हे या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. [२]

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान होणार झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केलेले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते.

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३ ते ५ जानेवारी इ.स. २०१४ दरम्यान झाले. हे आचार्य विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडने आयोजित केलेले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक फ. मुं. शिंदे होते.

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिल इ.स. २०१५ दरम्यान होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे आहेत . या संमेलनाच्या अधिक माहितीसाठी - http://www.sahityasammelanghuman.org/

या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या सार्‍या पार्ष्वभूमीवर साहित्य संमेलन या सर्वांचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून देतात, त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवतात. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती देतात. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची स्वतंत्र प्रकरणांमधून माहिती मिळते.

आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा ्समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड)

मराठी साहित्य संमेलने

वर्ष - स्थान - अध्यक्ष १८७८ - पुणे - महादेव गोविंद रानडे

१८८४ - १८७९ - नाही

१८८५ - पुणे - कृष्णशास्त्री राजवाडे

१९०४ - १८८६ - नाही

१९०५ - सातारा - रघुनाथ पांडुरंग करंदीकर

१९०६ - पुणे - गोविंद वामन कानिटकर

१९०७ - पुणे - विष्णु मोरेश्वर महाजनी

१९०८ - पुणे - चिं.वि. वैद्य

१९०९ - बडोदा - कान्होबा रणछोडदास कीर्तिकर

१९११ - १९१० - नाही

१९१२ - अकोला - ह.ना. आपटे [३]

१९१४ - १९१३ - नाही

१९१५ - मुंबई - गंगाधरराव पटवर्धन

१९१६ - नाही

१९१७ - इंदूर - गणेश जनार्दन आगाशे

१९२० - १९१८ - नाही

१९२१ - बडोदा - न.चिं. केळकर

१९२५ - १९२२ - नाही

१९२६ - मुंबई - माधव विनायक किबे

१९२७ - पुणे - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

१९२८ - ग्वाल्हेर - माधव श्रीहरी अणे

१९२९ - बेळगांव - शिवराम महादेव परांजपे

१९३० - मडगांव (गोवा) - वामन मल्हार जोशी

१९३१ - हैदराबाद - श्रीधर व्यंकटेश केतकर

१९३२ - कोल्हापूर - सयाजीराव गायकवाड

१९३३ - नागपुर - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

१९३४ - बडोदा - नारायण गोविंद चाफेकर

१९३५ - इंदूर - भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

१९३६ - जळगांव - माधव त्र्यंबक पटवर्धन

१९३७ - नाही

१९३८ - मुंबई - विनायक दामोदर सावरकर [४]

१९३९ - अहमदनगर - दत्तो वामन पोतदार

१९४० - रत्‍नागिरी - ना.सी. फडके

१९४१ - सोलापूर - वि.स. खांडेकर

१९४२ - नाशिक - प्रल्हाद केशव अत्रे

१९४३ - सांगली - श्री.म. माटे

१९४४ - धुळे - भा.वि वरेरकर

१९४५ - नाही

१९४६ - बेळगाव - ग.त्र्यं. माडखोलकर

१९४७ - हैदराबाद - न.र. फाटक

१९४८ - नाही

१९४९ - पुणे - शंकर दत्तात्रय जावडेकर

१९५० - मुंबई - यशवंत दिनकर पेंढारकर

१९५१ - कारवार - अनंत काकबा प्रियोलकर

१९५२ - अमळनेर - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

१९५३ - अहमदाबाद - विठ्ठल दत्तात्रय घाटे

१९५४ - दिल्ली - लक्ष्मणशास्त्री बालाजी जोशी

१९५५ - पंढरपूर - शंकर दामोदर पेंडसे

१९५६ - नाही

१९५७ - औरंगाबाद - अनंत आत्माराम काणेकर

१९५८ - मालवण - आत्माराम रावजी देशपांडे

१९५९ - मिरज - श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

१९६० - ठाणे - रामचंद्र श्रीपाद जोग

१९६१ - ग्वाल्हेर - कुसुमावती देशपांडे

१९६२ - सातारा - नरहर विष्णू गाडगीळ

१९६३ - नाही

१९६४ - मडगांव (गोवा) - विष्णू वामन शिरवाडकर

१९६५ - हैदराबाद - वामन लक्ष्मण कुलकर्णी

१९६६ - नाही

१९६७ - भोपाळ - विष्णू भिकाजी कोलते

१९६८ - नाही

१९६९ - [[वर्धा ]] - पु.शि. रेगे

१९७२ - १९७० - नाही

१९७३ - यवतमाळ - ग.दि. माडगूळकर

१९७४ - इचलकरंजी - पु.ल. देशपांडे

१९७५ - कराड - दुर्गा भागवत

१९७६ - नाही

१९७७ - पुणे - पु.भा. भावे

१९७८ - नाही

१९७९ - चंद्रपूर - वामन कृष्ण चोरघडे

१९८० - बार्शी - गंगाधर बाळकृष्ण सरदार

१९८१ फेब्रुवारी - अकोला - गोपाळ नीळकंठ दांडेकर

१९८१ डिसेंबर - रायपूर - गंगाधर गोपाळ गाडगीळ

१९८३ - अंबेजोगाई - व्यंकटेश माडगूळकर

१९८४ - जळगांव - शंकर रामचंद्र खरात

१९८५ - नांदेड - शंकर बाबाजी पाटील

१९८६ - मुंबई - विश्राम बेडेकर

१९८७ - नाही

१९८८ - ठाणे - वसंत कानेटकर

१९८९ - अमरावती - केशव जगन्नाथ पुरोहित

१९९० जानेवारी- पुणे - यू.म. पठाण

१९९० डिसेंबर - रत्‍नागिरी - मधु मंगेश कर्णिक

१९९२ - कोल्हापूर - रमेश मंत्री

१९९३ - सातारा - विद्याधर गोखले

१९९४ - पणजी - राम बाळकृष्ण शेवाळकर

१९९५ - परभणी - नारायण गंगाराम सुर्वे

१९९६ - आळंदी - शांता शेळके

१९९७ - अहमदनगर - नागनाथ इनामदार

१९९८ - परळी वैजनाथ - द.मा. मिरासदार

१९९९ - मुंबई - वसंत बापट

२००० - बेळगांव - यशवंत दिनकर फडके

२००१ - इंदूर - विजया राजाध्यक्ष

२००२ - पुणे - राजेंद्र बनहट्टी

२००३ - कराड - सुभाष भेंडे

२००४ - औरंगाबाद - रोहित जाधव

२००५ - नाशिक - केशव तानाजी मेश्राम

२००६ - सोलापूर - मारुती चितमपल्ली

२००७ - नागपुर - अरुण साधू

२००८ - सांगली - मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर

२००९ - महाबळेश्वर - आनंद रतन यादव

२०१० - पुणे - दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी

२०११ - ठाणे - उत्तम कांबळे

२०१२ - चंद्रपूर - वसंत आबाजी डहाके [५]

२०१३ - चिपळूण - नागनाथ कोतापल्ले [६]

२०१४ - सासवड - फ.मुं शिंदे [८]

२०१५ - घुमान (पंजाब) [९]

संदर्भ

  1. ^ http://www.masapaonline.org/node/1
  2. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6076870.cms. It is a snapshot of the page as it appeared on 28 Aug 2010 23:49:10 GMT.

बाह्य दुवे

खालील ओळींत संदर्भाशिवाय असणारे दुवे येथून कालांतराने काढावेत.