"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
182.59.49.175 (चर्चा)यांची आवृत्ती 1410177 परतवली. खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
== कार्य == |
== कार्य == |
||
[[दादाभाई नौरोजी]] यांची सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी [[युरोप|युरोपात]] युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: |
[[दादाभाई नौरोजी]] यांची सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी [[युरोप|युरोपात]] युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. [[विनायक दामोदर सावरकर|सावरकरांचे]] '[[१८५७ चा स्वांतत्र्य लढा]]' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली. |
||
== मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा == |
== मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा == |
११:४०, ३० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
मादाम भिकाईजी रुस्तम कामा (रोमन लिपी: Bhikaiji Rustom Cama ;) (२४ सप्टेंबर, इ.स. १८६१; मुंबई, ब्रिटिश भारत - १९ ऑगस्ट, इ.स. १९३६; मुंबई, ब्रिटिश भारत) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.
सुरुवात
मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तक कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
कार्य
दादाभाई नौरोजी यांची सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा
जर्मनीत श्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंद्-मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्ड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -
“ | माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्या या परिषदेतील सदस्यांना माझे हे आव्हान आहे. स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आपणास आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा. | ” |
अखेरचे दिवस
मादाम कामांनी श्टुटगार्ड येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण इ.स. १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली[१] आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. १९ ऑगस्ट, इ.स. १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ राष्ट्रतेजाने तळपता मादाम कामा मार्ग. १३ फेब्रुवारी २००७. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |