साम्यवाद

साम्यवाद |
साम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.
ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.
कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादि साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.
भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हियेतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.
भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.