मेघालय
मेघालय | |
![]() | |
देश | ![]() |
स्थापना | २१ जानेवारी १९७२ |
राजधानी | शिलाँग |
सर्वात मोठे शहर | शिलाँग |
जिल्हे | ११ |
क्षेत्रफळ | २२,४२९ चौ. किमी (८,६६० चौ. मैल) (२२ वा) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
२९,६४,००७ (२३वा) - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) - उच्च न्यायालय |
तथागत रॉय कॉनराड संगमा मेघालय विधानसभा (६०) मेघालय उच्च न्यायालय |
राज्यभाषा | इंग्लिश, खासी, गारो |
आय.एस.ओ. कोड | IN-ML |
संकेतस्थळ: http://meghalaya.gov.in/ |

मेघालय हे भारत देशाचे एक राज्य आहे. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर व पूर्वेस आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. शिलाँग ही मेघालयची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९७२ साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. २०११ साली, मेघालयची लोकसंख्या सुमारे ३० लाख होती. तिथे उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ आहे. बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय रहिवासी असलेल्या केवळ तीन राज्यांपैकी मेघालय असून इंग्रजी ही येथील राजभाषा आहे. येथे प्रामुख्याने खासी व गारो वंशाचे लोक आढळतात.
भूगोल
[संपादन]मेघालय भारतामधील सर्वाधिक वर्षाव होणारे राज्य असून येथे दरवर्षी सरासरी १२,००० मिलीमीटर (४७० इंच) इतका पाऊस पडतो. येथील चेरापुंजी हे गाव जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान मानले जाते. मेघालयची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून असून येथील ८० टक्के जनता शेतीवर गुजराण करते. याभागात जगातील सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या गावाचे नाव मौसिनराम असून, तत्पूर्वी चेरापुंजीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असे.
- आता चेरापुंजी जवळील मौसिनराम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी सरासरी बारा हजार मिलिमीटर पाऊस पडतो. सतत पडणारा पाऊस हे या गावाचे वैशिष्ट्य आहे येथील वातावरणात 99 टक्के अधिक आद्रता असते. मेघालयातील दुसरे आकर्षण म्हणजे येथील नैसर्गिक तयार झालेल्या गुहा होत. येथील टेकड्यांच्या पायथ्याशी असलेली मावसमाई गुहा प्रसिद्ध आहे. अतिशय विलोभनीय आणि सुंदर ही गुहा आहे. येथील डोंगराळ भागामुळे मेघालयमध्ये पायाभुत सुविधा पूर्णपणे विकसित होऊ शकल्या नाहीत. ज्यामुळे ह्या राज्याची अर्थव्यवस्था उर्वरित भारताच्या तुलनेत मागासलेली राहिली आहे. मेघालयमधील चेरापुंजी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. चेरापुंजी म्हटले की, मोठे धबधबे डोंगरावर उतरलेले ढग धुके आणि पाऊस हेच निसर्गरम्य दृश्य डोळ्यासमोर येते. सर्वात जास्त पाऊस देशामध्ये या ठिकाणी पडतो. चेरापुंजीचे स्थानिक भाषेतील नाव सोहरा असे आहे. येथे ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी शहरास 'चूरा' असे म्हणले, अन् मग त्याला 'चेरापुंजी' असे नाव प्राप्त झाले. या ठिकाणी सर्वात जास्ती पाऊस पडण्याचे कारण, म्हणजे बंगालचा उपसागरा कडून जवळजवळ ४०० किलोमीटर दूरवरून वाहून येणारे बाष्प असलेले ढग उंच असणाऱ्या खासी टेकड्यांना धडकतात. ते ढग चेरापूंजी जवळ एकत्र येतात. परिणामी वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते बाष्प असलेले ढग उंच जातात आणि मग उंचावरील तापमान थंड असल्याने त्याचे रूपांतर पावसात होते. म्हणून चेरापूंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. चेरापुंजी येथे सरासरी ११७८ सेंटीमीटर म्हणजेच 464 इंच आणि मौसिनराम येथे सरासरी 1188 म्हणजेच ४६८ इंच इतका पाऊस पडतो. भारतामध्ये मोसमी पाऊस रचनेशी निगडित असल्याने त्याला प्रतिरोधपर्जन्य म्हणून संबोधले जाते. डोंगर व पर्वतरांगांनी मोसमी वारे आणि ढग अडविले गेल्या शिवाय ते बरसत नाहीत. चेरापुंजी व मौसिनराम भागातील खासी डोंगररांगाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ब्लॅन फोर्ट या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 14 जून, 1876 रोजी चेरापुंजी येथे 24 तासात 40 इंच म्हणजेच 100 सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे, प्रथम निदर्शनास आणून दिले. त्यांनी एकंदरीतच या भागात भरपूर पाऊस पडल्याची कारणमीमांसा केली. चेरापुंजी हे का.. छोटा पठाराच्या दक्षिणेकडील कड्यावर वसले असून, तेथून दक्षिणेकडे अरुंद आणि खोल दरी आहे. या दरीचा रुंद होत जाणारा भाग बांगलादेशच्या सिलेट जिल्ह्यातील मैदानात विलीन होतो. दरीच्या दोन्ही बाजू 500 ते 600 मीटर उंचीच्या कड्यांनी व्यापलेल्या आहेत. ही रचना एखाद्या नरसाळ्या प्रमाणे असून त्याची रुंद बाजू म्हणजेच बांगलादेशचा मैदानी प्रदेश आणि चिंचोळा नळीसारखा भाग म्हणजे चेरापुंजीच्या दिशेने चढत जाणारी दरी होय.
- बंगालच्या उपसागरातून मोसमी पावसाचे उबदार आणि भरपूर बाष्प सामावलेले वारे बांगलादेशच्या मैदानी प्रदेशात आत शिरतात आणि रुंद दरीत शिरल्यावर सभोवतालच्या उंच कड्यांमध्ये अडकून पडतात. रात्रीच्यावेळी डोंगर माथ्यावरील अधिक थंड हवा उबदार दरीच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे दरीतील उपदार बाष्पयुक्त ढग वर उचलले जातात. त्याचे तापमान कमी होऊ लागते आणि बाष्प धारण क्षमता कमी होऊन पाऊस पडू लागतो. या संदर्भातील गणित असे सांगते की, भरपूर बाष्प असलेल्या मोसमी वाऱ्यांचा वेग ताशी 40 किलोमीटर व अधिक असेल तर चेरापुंजीच्या खासी डोंगररांगेत 24 तासात 45 सेंटिमीटर पाऊस होऊ शकतो. येथील रचनेमुळे डोंगर आणि दरीच्या वाऱ्यांच्या तत्त्वांचा ही परिणाम होत असल्याने हा पाऊस बहुदा पहाटे आणि सकाळी मोठ्या प्रमाणात पडतो. आणखी एक कारण असे आहे की, मोसमी वाऱ्याच्या काळात पूर्वेकडून आणि उत्तरेकडून ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यातील या प्रदेशाकडे वाहत येणारे वारे चेरापुंजीजवळ एकमेकांना भिडतात. आणि डोंगर शिखरांच्या उंचीमुळे ही हवा वर वर उचलली जाते. मुसळधार पाऊस पडण्याची क्रिया पहाटे पूर्णत्वास जाते. वैशिष्टपूर्ण भूरचना चेरापूंजी आणि मौसिनरामचे तेथील स्थान आणि भरपूर बाष्पयुक्त ढगांची हालचाल, यामुळे येथे सर्वाधिक पाऊस पडतो. शिलाँगपासून चेरापुंजी सुमारे २तासाच्या अंतरावर आहे. याठिकाणी ७ सिस्टर फॉल्स जेथे एकच दरीत साथ धबधबे कोसळतात. येथील मोठ्या मोठ्या दऱ्या संपूर्णपणे धुक्याने न्हाऊन निघतात.
बाह्य दुवे
[संपादन]
- अधिकृत संकेतस्थळ
- मेघालय पर्यटन Archived 2018-05-20 at the Wayback Machine.
- मेघालय राज्यातील पर्यटन स्थळे [permanent dead link]
![]() |
आसाम | ![]() | ||
![]() |
![]() |
आसाम | ||
![]() ![]() | ||||
![]() | ||||
![]() |