रामायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामायणातील एक दृश्य
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


रामायण हिंदूंचा पवित्रग्रंथांमध्ये मोडतो. या महाकाव्याची रचना वाल्मिकी ऋषींनी केली. रामायण हा तत्पुरुष समास असून तो (राम+अयण=रामायण) "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. अयन हा वाट किंवा मार्ग या अर्थाने (सीताशोधनाकरिताची) रामाची वाट या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते.रामायणाच्या २४००० श्लोक[ संदर्भ हवा ] ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा म्हणजे अयोध्यॆचा राजपुत्र राम, पत्नी सीता तसेच सीतॆचा अपहरणकर्ता रावणाच्या याच्या संहाराची कथा. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेले हे काव्य रामाच्या मुलांनी लव-कुश यांनी प्रचारित केले.

संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.पू ५वे शतक ते इ.पू १ले शतक निर्धारित केला गेला आहे.

रामायणाचा नंतरच्या संस्कृत काव्यांच्या छंदरचनाशैलीवर गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतीकथा, तात्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम , सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान व कथॆचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञॆचा हिस्सा बनले आहेत.

रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्य कृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये १६व्या शतकातील हिंदी कवी तुलसीदास, १३व्या शतकातील तामिळ कवी कंब, २०व्या शतकातील कन्नड कवी कुवेंपु (श्री रामायणदर्शनम) आदी प्रमुख होत.

रामायणाचा प्रसार आठव्या शतकापासूनच्या भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधिल इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियॊ) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनामलाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक माध्यंमांवरही पडला.



अनुक्रमणिका

[संपादन] रामायणातील कांडे

रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यातील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे. [१] वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारतदक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्या मिळाल्या आहेत. यात रामाच्या जन्मापासून अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सात कांडांत विभाजित केले आहे.

लंकेचे युद्ध सन १६४९-५३ मधील चित्र



  • अरण्य कांड – वनवासातील रामाचे जीवन, सीतॆचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.





  • उत्तर कांडरामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.


शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे. [२]

[संपादन] रामायणातील पात्रे

[संपादन] कथासार

[संपादन] रामायणातील नीतीपाठ

वाल्मिकी त्यांच्या रामायणात रामरूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतीपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगूर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतित करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मिकी रामायणचा अभिप्राय आहे. [३]

नारद मुनी संक्षेप रामायण रूपातील वाल्मिकीरामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे -
१. गुणवान - नीतिवंत
२. वीर्यवान- शूर
३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार
४. कृतज्ञ ,
५. सत्यवाक्य – सत्यवचनी
६. धृडवृत – आत्मविश्वासी,
७. चरित्रवान – चारित्र्य चांगले असणारा,
८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा
९. विद्वान
१०. समर्थ
११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा
१२. आत्मवंत – धैर्यस्थ,
१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला ,
१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला ,
१५. अनसूयक – असूया नसलेला,
१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगॆ' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा.


रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्यॆ ) रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.


[संपादन] रामायणाचा काळ

रावणाचे सैन्य झोपलेल्या बिभिषणास युद्धासाठी जागे करताना (चित्रकाळः १७वे शतक)

परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसर्‍या युगात - त्रेतायुगात घडली. रचयिते वाल्मिकी हे ही या महाकाव्यातील सक्रिय पात्र होते.

रामायणाची भाषा पाणिनिय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे.

रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - राम, सीता, दशरथ, जनक, वसिष्ठ, विश्वामित्र वाल्मिकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथात व वेदांत आढळतात. [४] [५] रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव ब्रह्मा, विष्णु वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या.

सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे. [६] बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोर्‍यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचीती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे.

रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे कल्पनादत्त वर्णन आढळते. मध्य व दक्षिण भारताचे वर्णन वास्तवापासून बरेच दूर आहे. श्रीलंका बेटातील स्थळांच्या वर्णनात अस्पष्टतता आहे. [७] इतिहासकार ऎच.डी.संकालिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकात असल्याचे प्रतिपादले आहे. [८] तर इतिहासकार ऎ.एल.बाषम हे रामकाळ इ.पू. ७ वा ८ व्या शतकाचा असल्याचे मानतात.[९]

रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते. [१०]

[संपादन] विभिन्न भाषांतरे/रूपांतरे

रामायणाच्या कथॆचा आशियाच्या अनेक संस्कृतींमध्ये प्रसार झाला आहे. रावण आणि त्याची बहिण. जावा बेटावरच्या एका नृत्यात

.

अनेक जानपद कथांमध्ये रामायणाच्या कथॆचे विविध रूपांतरे दिसतात. उत्तर भारतातील रामायणकथा दक्षिण भारत व आग्नेय आशिया मधील प्रचलित रूपांतरांपेक्षा भिन्न आहे. रामायणाचा कथासंप्रदाय थायलंड, कंबोडिया, मलेशिया, लाओस, व्हिएतनामइंडोनेशिया देशांमध्ये प्रचलित आहे.

मलेशियातील काही रूपांतरांत लक्ष्मणास रामापेक्षा महत्व दिले आहे. या रूपातंरात राम दुय्यम व दुर्बल भूमिकेत आहे.

[संपादन] भारतीय रूपांतरे

भारतात विविध काळात लिहिलेली रामायणे परस्परांपासून भिन्न आहेत. १८व्या शतकात मराठी भाषेत श्रीधरपंतांनी रामायण रचले. १४-१५व्या शतकात कुमार वाल्मिकी यांनी कानडीत तॊरवॆ रामायण नावाने रूपांतर केले. कानडीत कुवेंपु यांनी श्री रामायण दर्शनम व रंगनाथ शर्मा यांनी "कन्नड वाल्मीकि रामायण" नावाने रामायणे लिहिली.

१२व्या शतकातील तमिळ कवी कंब यांनी "रामावतारम्" अथवा कंबरामायण ग्रंथ रचिला. हिंदी भाषॆचे प्रसिद्ध रामायण १५७६ सालात तुलसीदास यांनी श्री रामचरित मानस नावाने रचले. गुजराती कवी प्रेमानंद यांनी १७ व्या शतकात बंगाली कवी कृत्तिवास यांनी १४व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी १६व्या शतकात, तेलगु कवी रंगनाथ यांनी रामायणे लिहिली. रामायणाच्या काही उप-रूपांतरांत रावण अहिरावण - महिरावण रूपात येतो.

केरळच्या "मापिळ्ळॆ रामायण" या रामायण रूपात रामायण लोकगीतांमध्ये गुंफण्यात आले आहे. [११]

रामायणाची मुसलमान प्रत ही आहे. या रूपांतरात रामायणाचा नायक एक मुस्लिम सुल्तान आहे. रामाचे नाव यात "लामन" असे बदलले आहे; इतर पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.

हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत. तेथे सुग्रीवन गुहॆ (सुग्रीवाची गुहा) नावाची गुहा आहे. हे स्थळ सुंदरकांडातील किष्किंधॆय वर्णनातील स्थळ असल्याचे मानन्यात येते. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजारी राम मंदिर आहे.

[संपादन] आग्नेय आशियातील रूपांतरे

आग्नेय आशियातील रामायणाचे चित्र

आशियाच्या अनेक संस्कृतींवर रामायणाचा प्रभाव पडला आहे. काही देशांच्या राष्ट्रीय महाकाव्यांसाठी रामायण प्रेरणास्थान आहे. [चीन]]चे महाकाव्य "पश्चिमदत्त पयण" याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे "सुन् वुकांग्" पात्र हनुमानाच्या पात्रावर आधारित आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशातील सुमारे नवव्या शतकातील रुपांतर "काकाविन् रामायण" नावाने ओळखले जाते.यात संस्कृत रामायणाच्या तुलनेत अनेक ठिकाणी भेद आहे. लाओस देशाचे काव्य "फ्रा लक फ्रा लाम" हे ही रामायणाचे रूपांतर; या नावातील "लक" आणि "लाम" नावे म्हणजे लक्ष्मणरामाच्या नावांचे लाओ रूपांतर. यात रामाचे जीवन बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित केले आहे. मलेशियाच्या "हिकायत् सॆरि राम" काव्यात रावणास ब्रह्माच्या वराऐवजी अल्लाचा वर प्राप्त झाल्याचे दाखविले आहे. [१२]

थायलंडचे काव्य "रामकियॆन" रामायणावर आधारित आहे. यात सीता रावणमंदोदरी यांची कन्या असे दाखविले आहे. ज्योतिषी विभीषण जेव्हा सीतॆची कुंडली पाहून जेव्हा अपशकुन वर्तवितो तेव्हा रावण तिला पाण्यात फेकून देतो, नंतर ती जनकास प्राप्त होते. थाई रामायणात मारूती हे महत्वाचे पात्र आहे. काव्याची कथा बँकॉकनजीकच्या "वात फ्रा कयॆव" देवस्थानाजवळ घडल्याचे काव्य सांगते.

इतर आग्नेय आशियाई रूपांतरांत बालीचे "रामकवच", फिलिपिन्सचे "मरडिय लावण", कंबोडियाचे "रीम्कर" आणि म्यानमारचे "याम जात्दव" प्रमुख होत.

[संपादन] वर्तमानात रामायण

राम रावण युद्ध

कानडीतील कुवेंपु यांचे रामायण रामायण दर्शनम व तेलगु कवी विश्वनाथ सत्यनारायण यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस ज्ञानपीठ पुरस्कार लाभले आहेत. अशोक बँकर यांनी इंग्रजीत रामायणाधारित सहा मालिका कादंबर्‍या लिहिल्या आहेत.

कांचीपुरमच्या गेटी रेल्वे थियेटर कंपनीने द्राविड स्वाभिमानाची पुनर्स्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनःरचना केली. यात रावण विद्वान , राजनीतिज्ञ, सीता त्याची धर्मपत्नी , राम एक नीतिनियम धाब्यावर टाकणारा लंपट राजकुमार असे दाखविले आहे. रामायणाची ही आवृत्ती पारंपारिक आवृत्तीपेक्षा उलटी असून द्राविड चळवळीस बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

[संपादन] हे ही पाहा

[संपादन] पुढील वाचनासाठी

  • Milner Rabb, Kate, National Epics, 1896 - See eText Project Gutenburg
  • Raghunathan, N. (Trans), Srimad Valmiki Ramayanam, Vighneswara Publishing House, Madras (1981)
  • A different Song - Article from "The Hindu" August 12, 2005 - [१]
  • Dr. Gauri Mahulikar Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations, Ramayan Institute EFFECTOFRAMAYANAONVARIOUSCULTURESANDCIVILISATIONS.pdf -
  • Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India Princeton University Press, 1999 ISBN 0-691-01485-X
  • S. S. N. Murthy, A note on the Ramayana, Jawaharlal Nehru University, New Delhi [२]

[संपादन] संदर्भ

  1. Robert P. Goldman, The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India, pp 5
  2. Raghunathan, N. (trans.), Srimad Valmiki Ramayana
  3. रघुनाथन्, ऎन्. (अनुवाद), श्रीमद् वाल्मीकि रामायणम्
  4. In the Vedas Sita means furrow relating to a goddess of agricuture. - S.S.S.N. Murty, A note on the Ramayana
  5. Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 24
  6. Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 15-16
  7. Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 28
  8. See Sankalia, H.D., Ramayana: Myth or Reality, New Delhi, 1963
  9. Basham, A.L., The Wonder that was India, London, 1956, pp303
  10. Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India p. 14
  11. See A different song, The Hindu, Aug 12, 2005
  12. See Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations

वैयक्‍तिक साधने