ऋग्वेद
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद · यजुर्वेद | |
| सामवेद · अथर्ववेद | |
| वेद-विभाग | |
| संहिता · ब्राह्मणे | |
| आरण्यके · उपनिषदे | |
| उपनिषदे | |
| ऐतरेय · बृहदारण्यक | |
| ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
| केन · मुंडक | |
| मांडुक्य ·प्रश्न | |
| श्वेतश्वतर ·नारायण | |
| कठ | |
| वेदांग | |
| शिक्षा · चंड | |
| व्याकरण · निरुक्त | |
| ज्योतिष · कल्प | |
| इतिहास | |
| रामायण · महाभारत | |
| इतर ग्रंथ | |
| स्मृती · पुराणे | |
| भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
| पंचतंत्र · तंत्र | |
| स्तोत्रे ·सूक्ते | |
| मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
| शिक्षापत्री · वचनामृत | |
ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. तसेच ऋग्वेद संस्कृत वाङमयातील पहिला ग्रंथ आहे असेही मानले जाते. ऋग्वेद रचनेचा काल सुमारे इ.स.पू.५००० च्या सुमारासचा असावा असा लोकमान्य टिळक यांनी मांडलेला अंदाज आहे. ऋग्वेदाची मांडणी व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली. ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हे ऋग्वेदाचे पहिले सूक्त आहे.
पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटा घन म्हणण्याची पद्धत सुरु झाली. ऋग्वेद हा स्तूतीपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १० मंडलात पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे.
रचना [संपादन]
ऋच धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे. यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तूतीपर कविता असा होतो. अशा १०|२० ऋचांचे एक पद म्हणजे एक सूक्त. अशा १०|२० सूक्तांचे एक अनुवाक व अनेक अनुवाकांचे एक मंडल. अशी दहा मंडले ऋग्वेदात आहेत.
शाखा [संपादन]
ऋग्वेदाच्या शाकल, बाष्कल, मांडूकेय, आश्वलायन व शांखअयन अशा पांच प्रमुख शाखा होत्या परंतु त्या लुप्त होऊन आता शाकल हीच शाखा आहे. ऋग्वेदात एकूण १०२५ सूक्ते आहेत. पहिल्या व दहाव्या मंडलात सारखीच म्हणजे १९१ सूक्ते आहेत. ऋग्वेदात एकूण अक्षरांची संख्या ४३२००० आहे.
ऋग्वेद: आर्यांच्या नीतीकल्पना व तत्त्वज्ञान [संपादन]
देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडले आहेत. १) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्युनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो. २) सृष्टीच्या उत्पत्तीचे सुक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे. तो उत्पादक म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसुक्तात म्हटले आहे की, देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे. हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे म्हटले आहे. ३) पापी,दृष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दु:खमय अशा निवासथानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक,यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात. ४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे. ५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा काही अर्थ काही ठिकाणी आहे.
आर्य हे मूर्तिपूजक होते की नाही याविषयी विद्वानात तीव्र मतभेद आहेत. मॅक्समूलर विल्सन मॅकडोनाल्ड यांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतात श्री वेंकटेश्वर दास वृंदावन भट्टाचार्य वैदिक आर्यामधे मूर्तिपूजा प्रचलित असावी, असे म्हणतात. वेदांमध्ये देवाअंच्या मानवी रुपाचे वर्णन आढळत असले तरी वैदिक आर्य त्यांच्या मूर्तीची पूजा करीत होते, असे ध्वनीत करणारी वचने मूळीच सापडत नाहीत.
ऋग्वेद मंडलानुसार कवी
| प्रथम मण्डल | अनेक ऋषि |
| द्वितीय मण्डल | गृत्समय |
| तृतीय मण्डल | विश्वासमित्र |
| चतुर्थ मण्डल | वामदेव |
| पंचम मण्डल | अत्रि |
| षष्ठम् मण्डल | भारद्वाज |
| सप्तम मण्डल | वसिष्ठ |
| अष्ठम मण्डल | कण्व व अंगिरा |
| नवम् मण्डल (पवमान मण्डल) | अनेक ऋषि |
| दशम मण्डल | अनेक ऋषि |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| वेद | |
|---|---|
| ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |