विराट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द्यूतामधे पराभूत झाल्यावर पांडवांना बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट लागू झाली होती. त्या अटीनुसार एक वर्षाच्या अज्ञातवासाचा काळ पांडवांनी व द्रौपदीने विराट राजाच्या राजवाड्यात व्यतित केला.

कंक असे नाव धारण करून राहाणाऱ्या युधिष्ठिरासमवेत राजा विराट द्युत खेळत असे.

विराट राजाच्या पत्नीचे व राणीचे नाव सुदेष्णा असे होते. या दोघांना उत्तरउत्तरा अशी दोन अपत्ये होती. यापैकी उत्तरेचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्याशी झाला होता.

विराट राजाचा मेहुणा व सेनापती कीचक याचा वध भिमाने केला होता.