इम्फाल
इंफाळ ইম্ফল |
|
भारतामधील शहर | |
इंफाळ विमानतळ |
|
देश | ![]() |
राज्य | मणिपूर |
जिल्हा | पश्चिम इम्फाल, पूर्व इम्फाल |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५७९ फूट (७८६ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,६८,२४३ |
- महानगर | ४,१८,७३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
इंफाळ (मणिपुरी: ইম্ফল) ही भारत देशाच्या मणिपूर राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. इम्फाल शहर साधारण मणिपूरच्या मध्य भागात इम्फाल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली २.६८ लाख लोकसंख्या असलेले इम्फाल ईशान्य भारतामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.
१२व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अस्तित्वात असलेल्या मणिपूरच्या राजतंत्राचे केंद्र इम्फालमधील कांगला राजवाडा येथेच होते. सध्या कांगला प्रासाद पडझड झालेल्या अवस्थेत आहे. दुसऱ्या महायुद्धामधील इम्फालची लढाई ८ मार्च ते ३ जुलै १९४४ दरम्यान येथेच लढली गेली. ह्या लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याने जपानवर सपशेल विजय मिळवला.
राष्ट्रीय महामार्ग ३९ (गोलाघाट-बर्मा सीमा), राष्ट्रीय महामार्ग ५३ (इम्फाल-सिलचर) व राष्ट्रीय महामार्ग १५० (कोहिमा-ऐझॉल)) हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग इम्फालमधून जातात. इम्फाल विमानतळ हा मणिपूर राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ असून तो गुवाहाटी व अगरतला खालोखाल ईशान्य भारतमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.