राजाबाई क्लॉक टॉवर

राजाबाई टॉवर मुंबईतील एक इमारत आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक स्वर्गीय प्रेमचंद रायचंद यांनी दिलेल्या निधीतून ही वास्तू उभारली आहे. हा निधी देताना त्यांनी त्यांची आई राजाबाई यांच्या नावेच ही वास्तू उभारली जावी अशी अट घातली होती. म्हणून ही वास्तू ‘राजाबाई टॉवर’ या नावाने ओळखली जाते. १ मार्च, इ.स. १८६९ रोजी या वास्तूची पायाभरणी झाली आणि नोव्हेंबर इ.स. १८७९ मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्या काळी याच्या बांधकामाचा खर्च दोन लाख रुपये झाला होता. राजाबाई टॉवर स्तंभ इमारतीचा वास्तुविशारद सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हा होता.
स्वरूप
[संपादन]राजाबाई टॉवरच्या बांधकामात वेनेटियन आणि गॉथिक या वास्तुकलेचा मिलाफ आहे असे बांधकामाच्या पद्धतीवरून दिसून येते. बांधकामासाठी कुर्ला येथील खाणीतील फिक्या पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर केला आहे. वास्तूच्या खिडक्यांसाठी रंगीत काचांचा (स्टेन्ड ग्लास) वापर केला आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग
[संपादन]बृहन्मुंबई महानगरपालिकेने कर्मवीर भाऊराव पाटीलयांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबई येथील चर्चगेट परिसरातील मुंबई उच्च न्यायालय व राजाबाई क्लॉक टॉवर येथे त्यांची स्मृती लोकांमध्ये जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकांना स्फूर्ती मिळावी म्हणून एका रस्त्याचे कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग असे नामकरण केलेले आहे.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,१७ डिसेंबर २०२४