तिसरे रघूजी भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १८०३ ते १८५३ हा सुमारे ५० वर्षांचा काळ नागपूरच्या भोसले घराण्यासाठी महत्त्वाचा आहे. याच काळात सार्वभौम असलेल्या नागपूर राज्याने इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले. भोसल्यांना आपल्या राज्याचा बराचसा प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. सरतेशेवटी इ.स. १८५३ मध्ये नागपूरचे राज्य इंग्रजी राजवटीने खालसा केले.

इतिहास[संपादन]

इ.स. १८०३ मध्ये,दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे दरम्यान,राजे रघुजी द्वितीय यांना, मराठ्यांच्या पराजयामुळे वऱ्हाड, ओडिशा इत्यादी प्रांत इंग्रजांना सोडून द्यावे लागले.परंतु त्यांनी नागपूरचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले.सन १८१६ मध्ये, त्यांच्या मृत्यु नंतर,इंग्रजांनी या राज्यासाठी राजकारण केले.