Jump to content

"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५४४ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
विकिपीडियाच्या मानकांनुसार नाही
No edit summary
विकिपीडियाच्या मानकांनुसार नाही
ओळ ६०:
 
== 'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक ==
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे [[साप्ताहिक]] (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, इ.स. १९६० मध्ये ‘[[मार्मिक (साप्ताहिक)|मार्मिक]]’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या हस्ते झाले. या समारंभास [[अनंत काणेकर|प्रा. अनंत काणेकरही]] उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. [[संयुक्त महाराष्ट्र]] स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने [[मुंबई|मुंबईत]] मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. [[इ.स. १९६०]] पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. थेट बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण यांच्याकडून ‘मार्मिक रेषां’चे धडे घेण्याच्या अद्वितीय संधीला ‘कॉमन मॅन’ने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या दोन दिग्गजांच्या तोंडून ‘व्यंगचित्र कसे काढावे’ याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणाऱ्या डीव्हीडी ‘अखिल भारतीय व्यंगचित्रकार साहित्य संमेलना’त विक्रीस ठेवल्या असून गेल्या सहा दिवसांत या डीव्हीडींच्या प्रत्येकी एक हजार प्रती खपल्या आहेत. सांगली- शिवसेनाप्रमुख, प्रसिद्ध व्यंगचित्रकार, "मार्मिक‘ आणि "सामना‘चे संपादक म्हणून महाराष्ट्रात दबदबा असणारे बाळासाहेब ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘ या पाक्षिकाचे संपादक होते. ते मुलांसाठी खास व्यंगचित्रे रेखाटायचे.{{citation needed}}
 
== शिवसेनेची स्थापना ==
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - [[व्यंग]] केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही? काही नाव सुचतंय का संघटनेसाठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालू आहे..पण संघटनेला नाव…” “मी सांगतो नाव….....[[शिवसेना]].........यानंतर बाळासाहेबांनी [[जून १९]], [[इ.स. १९६६]] रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[भारत|भारतात]] मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी [[शिवसेना|शिवसेनेच्या]] माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला [[मेळावा]] [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९६६]] रोजी [[शिवाजी पार्क|शिवतीर्थ]]<nowiki> मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाही..{{</nowiki>
 
== ''सामना'' ==
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. [[केशव सीताराम ठाकरे|प्रबोधनकार ठाकरे]] व [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘[[सामना (वृत्तपत्र)|सामना]]’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील [[संपादक]] बाळ ठाकरे यांच्या [[अग्रलेख|अग्रलेखांची]] वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे.कालांतराने सामना हे वृतपत्र सृष्टीतील मुख्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले .
 
== शिवसेना - भाजप युती ==
अनामिक सदस्य