स्वतंत्र पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वतंत्र पक्ष
स्थापना ऑगस्ट, १९५९
राजकीय तत्त्वे उदारमतवाद

स्वतंत्र पक्ष हा चक्रवर्ती राजगोपालचारी आणि एन.जी. रंगा व इतर राजकरण्यांनी स्थापन केलेला उदारमतवादी पक्ष होता.[१] या पक्षाचा नेहरुंच्या समाजवादी धोरणांना व लायसन्स राजला विरोध होता. [२]

स्वतंत्र पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत ६.८% मते आणि तिसऱ्या लोकसभेत १८ जागा मिळवू शकला. बिहार, राजस्थान, गुजरात आणि ओरीसा या राज्यात तो मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. या पक्षाने चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत ८.७% मते आणि ४४ जागा मिळवल्या. पण इ.स. १९७१ मधील निवडणूकीत ३% मते व ८ जागाच मिळवू शकला.[३] राजाजींच्या निधनानंतर पक्ष लगेचच अस्तास गेला व शेवटी चरण सिंगांच्या भारतीय क्रांती दलात विलीन झाला.

महत्त्वाचे नेते आणि निगडित व्यक्ती[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ राजमोहन गांधी. "C. Rajgopalchari and the birth of the Swatantra Party" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "The 21 Principles of the Swatantra Party (1959)" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले.[ ]
  3. ^ Chandra, Bipan & others (2000). India after Independence 1947-2000, New Delhi:Penguin Books, ISBN 0-14-027825-7, p.214

बाह्य दुवे[संपादन]