"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →महापरिनिर्वाण: महापरिनिर्वाण खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →बौद्ध धर्माची शिकवण: बौद्ध धम्म, पंचशील, अष्टांग मार्ग, चार आर्य आर्यसत्य खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
भगवान बुद्धांनी ‘[[पाली भाषा|पाली]]’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी [[त्रिशरण]], [[चार आर्यसत्ये]], [[अष्टांग मार्ग]] (मध्यम मार्ग) व [[पंचशील]] सांगितले. |
भगवान बुद्धांनी ‘[[पाली भाषा|पाली]]’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी [[त्रिशरण]], [[चार आर्यसत्ये]], [[अष्टांग मार्ग]] (मध्यम मार्ग) व [[पंचशील]] सांगितले. |
||
== चार आर्यसत्ये == |
|||
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.</br> |
|||
१. '''दु:ख''' :- मानवी जीवन हे दु:खमय आहे. </br>२. '''तृष्णा''' :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.</br> ३. '''दु:ख निरोध''' :-दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.</br> ४. '''प्रतिपद्''' :- दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे. |
|||
महान बौद्ध विद्वान व बोधिसत्व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - '''दु:ख आहे''' आणि शेवटचे प्रतिपद् - '''दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग''' आहे. |
|||
==पंचशील== |
|||
१) '''अहिंसा''' :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. |
|||
२) मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. |
|||
३) मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. |
|||
४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. |
|||
५) मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो. |
|||
या बौद्ध तत्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो. |
|||
== अष्टांग मार्ग == |
|||
महाकारूणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथयेथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. |
|||
=== अष्टांग मार्ग === |
|||
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. |
|||
१) '''सम्यम दृष्टी :-''' निसर्ग नियमा विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.<br> |
|||
२) '''सम्यक संकल्प :- ''' म्हणजे योग्य निर्धार, विचार.<br> |
|||
३) '''सम्यक वाचा :-''' करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.<br> |
|||
४) '''सम्यक कर्मांत :-''' उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.<br> |
|||
५) '''सम्यक आजिविका :-''' वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.<br> |
|||
६) '''सम्यक व्यायाम :-''' वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.<br> |
|||
७) '''सम्यक स्मृती :-''' तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.<br> |
|||
८) '''सम्यक समाधी :-''' कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. |
|||
== दहा पारमिता == |
|||
दहा पारमीता ह्या शिल मार्ग होय. |
|||
१) '''शिल :-''' शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.<br> |
|||
२) '''दान :-''' स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.<br> |
|||
३) '''उपेक्षा :-''' निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.<br> |
|||
४) '''नैष्क्रिम्य :- ''' ऐहिक सुखाचा त्याग करणे.<br> |
|||
५) '''वीर्य :-''' हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.<br> |
|||
६) '''शांति :-''' शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.<br> |
|||
७) '''सत्य :-''' सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.<br> |
|||
८) '''अधिष्ठान :-''' ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.<br> |
|||
९) '''करुणा :-''' सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.<br> |
|||
१०) '''मैञी :-''' मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रुविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.<br> |
|||
== तथागत बुद्धांची शिकवण == |
|||
१) मूर्खांची संगती करु नका.<br> |
|||
२) विद्वानांची संगती करा.<br> |
|||
३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.<br> |
|||
४) अनुकूल देशात निवास करा.<br> |
|||
५) चांगली कामे करा.<br> |
|||
६) चित्तास स्थिर ठेवा.<br> |
|||
७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.<br> |
|||
८) विद्वान व्हा.<br> |
|||
९) संयमी राहा.<br> |
|||
१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.<br> |
|||
११) मातापित्याची सेवा करा.<br> |
|||
१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.<br> |
|||
१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.<br> |
|||
१४) दानधर्म करा.<br> |
|||
१५) धम्माचरण करा.<br> |
|||
१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.<br> |
|||
१७) निर्दोष कर्मे करा.<br> |
|||
१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.<br> |
|||
१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.<br> |
|||
२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.<br> |
|||
२१) गौरवाची भावना जोपासा.<br> |
|||
२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.<br> |
|||
२३) क्षमाशील असा.<br> |
|||
२४) संतुष्ट असा.<br> |
|||
२५) कृतज्ञ असा. लीन असा.<br> |
|||
२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.<br> |
|||
२७) मधुर भाषी, मितभाषी असा.<br> |
|||
२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.<br> |
|||
२९) ब्रम्हचारी राहा.<br> |
|||
३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.<br> |
|||
३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.<br> |
|||
३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.<br> |
|||
३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)<br> |
|||
३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा. |
|||
==संप्रदाय== |
==संप्रदाय== |
१३:१३, ३१ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
बौद्ध धर्म (बुद्ध धम्म) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. भगवान बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) व जगात पसरला.
बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्म असून तो जगातला पहिला विश्वधर्म ही आहे. आज जगात बौद्ध धर्माचे १८० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत २५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. चीन देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. जगातील १८ देशांत बौद्ध धर्म हा बहुसंख्य आहे.
बौद्ध धर्म
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात बौद्ध धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपीटकाच्यास्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व गुफा (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि विशेषत: धार्मिक बाजूवर बौद्ध धर्माची खोलवर व न पूसणारी अशी छाप पडलेली आहे.
तथागत गौतम बुद्ध
तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होय. बुद्ध हे तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मुळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. राहूल नावाचा त्यांना पुत्ररत्न ही झाले.
बौद्ध मतानुयायी लोक यांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
आज सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बुद्ध अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी आहे. अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायीत्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.
तथागत बुद्ध हे केवळ सर्वात श्रेष्ठ भारतीयच नसून ते संपूर्ण जगातही पहिल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत. इंग्लडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापिठाने मागील १० हजार वर्षामधील अशा टॉप १०० जगातील विश्वमानवांची यादी तयार केली ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापिठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांचे ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’
शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
ज्ञानप्राप्ती
गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्याबिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.
धम्मचक्र प्रवर्तन
ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वत: ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
महापरिनिर्वाण
इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.
बौद्ध धर्माची शिकवण
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितले.
चार आर्यसत्ये
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
१. दु:ख :- मानवी जीवन हे दु:खमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.
३. दु:ख निरोध :-दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
४. प्रतिपद् :- दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.
महान बौद्ध विद्वान व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - दु:ख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.
पंचशील
१) अहिंसा :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. २) मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. ३) मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. ४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो. ५) मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
या बौद्ध तत्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.
अष्टांग मार्ग
महाकारूणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथयेथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.
अष्टांग मार्ग
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.
१) सम्यम दृष्टी :- निसर्ग नियमा विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
२) सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
३) सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
४) सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
५) सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
६) सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
७) सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
८) सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
दहा पारमिता
दहा पारमीता ह्या शिल मार्ग होय.
१) शिल :- शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
२) दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
३) उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
४) नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
५) वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
६) शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
७) सत्य :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
८) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
९) करुणा :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
१०) मैञी :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रुविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.
तथागत बुद्धांची शिकवण
१) मूर्खांची संगती करु नका.
२) विद्वानांची संगती करा.
३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
४) अनुकूल देशात निवास करा.
५) चांगली कामे करा.
६) चित्तास स्थिर ठेवा.
७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
८) विद्वान व्हा.
९) संयमी राहा.
१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
११) मातापित्याची सेवा करा.
१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
१४) दानधर्म करा.
१५) धम्माचरण करा.
१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
१७) निर्दोष कर्मे करा.
१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
२१) गौरवाची भावना जोपासा.
२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
२३) क्षमाशील असा.
२४) संतुष्ट असा.
२५) कृतज्ञ असा. लीन असा.
२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
२९) ब्रम्हचारी राहा.
३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.
संप्रदाय
बौद्ध साहित्य
त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपिटकाची तीन पिटके (भाग) आहेत. [अ] विनयपिटक, [आ] सुत्तपिटक आणि [इ] अभिधम्मपिटक. त्रिपीटकात एकूण १७ ग्रंथ आहेत. बुद्ध चरित्र, मिलिंदप्रश्न, धम्मपद, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , थेरगाथा, अपदान, दान, पेतवत्थु विमानवत्थु इत्यादी बौद्ध धर्मातील इतर ग्रंथ आहेत.
मराठी पुस्तके
- धम्मपदं (नवसंहिता) : आचार्य विनोबा भावे
- धर्म व धर्मपंथ (प्र.न. जोशी)
- बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (चिं.वि.जोशी)
- बौद्ध विचारधारा (संपादक- महेश देवकर, लता देवकर, प्रदीप गोखले : पुणे विद्यापीठ प्रकाशन)
- मराठी बौद्ध
इंग्रजी पुस्तके
- Gautama the Buddha : his Life and His Teaching (Vipashyana Research Institute)
बौद्ध धर्माची तत्वे
प्रज्ञा शिल करूणा
बौद्ध देश
सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले 25 देश
बौद्ध लोकसंख्येचे हे आंकडे सन 2010-11 मधील आहेत.
~ 7.50 कोटी (85%)[३][४]
~ 6.66 कोटी (5.5%)[५]
~ 6.50 कोटी (95%)[६]
/ म्यान्मार ~ 5.01 कोटी (90%)[७]
- साचा:देश माहिती दक्षिण कोरीया ~ 2.50 कोटी (54%)
- साचा:देश माहिती तायवान ~ 2.22 कोटी (93%)[८][९]
- साचा:देश माहिती उत्तर कोरीया ~ 1.77 कोटी (73%)
- श्रीलंका
~ 1.60 कोटी (71%)[१०]
~ 1.50 कोटी (97%)[११]
~ 80 लाख (3.4%)
- साचा:देश माहिती हांगकांग ~ 65 लाख (93%)
- मलेशिया
~ 63 लाख (22%)
- साचा:देश माहिती नेपाल ~ 62 लाख (21%)
- लाओस
~ 62 लाख (98%)[१२]
~ 61 लाख (02%)
- साचा:देश माहिती सिंगापुर ~ 37 लाख (67%)
- मंगोलिया
~ 30 लाख (98%)
- साचा:देश माहिती फ़िलीपीन्स ~ 28 लाख (3.1%)
- रशिया
~ 20 लाख (1.4%)
~ 15 लाख (01%)
~ 12 लाख (3.5%)
- साचा:देश माहिती ब्राजील ~ 11 लाख (0.5%)
- फ्रांस
~ 10 लाख (1.5%)
जगामध्ये आज जवळजवळ 1 अब्ज 80 कोटी बौद्ध धर्मीय अनुयायी आहेत. बौद्ध लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येत २५% आहे. सन 2020 मध्ये जगातील बौद्ध लोकसंख्या ही 2 अब्जांवर जाईल.
चित्रदालन
-
बिहारमधील महाबोधी मंदिर येथे गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली.
-
गौतम बुद्ध.
- ^ http://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/
- ^ http://www.infoplease.com/ipa/A0855613.html
- ^ http://m.vietnambiketours.com/?url=http://www%2evietnambiketours%2ecom%2fvietnam%2dreligion%2ehtml
- ^ http://siu.no/index.php/eng/Media/SIU/Highlight-countries/Vietnam-Asia
- ^ http://www.ucanews.com/story-archive/?post_name=/2005/06/17/buddhists-reject-religious-census&post_id=4158
- ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Thailand
- ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Freedom_of_religion_in_Myanmar
- ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Demographics_of_Taiwan
- ^ http://www.indexmundi.com/taiwan/demographics_profile.html
- ^ https://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Sri_Lanka
- ^ http://en.m.wikipedia.org/wiki/Religion_in_Cambodia
- ^ http://www.liquisearch.com/list_of_religious_populations/by_proportion/buddhists