"भार्गवराम विठ्ठल वरेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९१: ओळ ९१:
|}
|}


==कादंबर्‍या==
==कादंबर्‍या/दीर्घकथा==
* तिच्या नवर्‍याचो माहेर
* धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.
* धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.)
* पुन्हा गोकुळ
* प्रजापति लंडन


==अनुवादित कादंबर्‍या==
==अनुवादित कादंबर्‍या==

२२:२६, १० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
जन्म नाव भार्गवराम विठ्ठल वरेरकर
टोपणनाव मामा वरेरकर
जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३
चिपळूण, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर २३, इ.स. १९६४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी

भार्गवराम विठ्ठल वरेरकर (एप्रिल २७, इ.स. १८८३ - सप्टेंबर २३, इ.स. १९६४) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते.

जीवन

वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवणरत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.

वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोणार्‍या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिल. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणार्‍या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा .अभ्यास केला.

वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबर्‍या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.

बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबर्‍यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंसती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत..

इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.

नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!

कारकीर्द

नाट्यलेखन

नाटक लेखन वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
कुंजविहारी इ.स. १९०८ मराठी लेखन
हाच मुलाचा बाप इ.स. १९१७ मराठी लेखन
संन्याशाचा संसार इ.स. १९२० मराठी लेखन
तुरुंगाच्या दारात इ.स. १९२३ मराठी लेखन
करीन ती पूर्व इ.स. १९२७ मराठी लेखन
सत्तेचे गुलाम इ.स. १९३२ मराठी लेखन
सोन्याचा कळस इ.स. १९३२ मराठी लेखन
सारस्वत इ.स. १९४१ मराठी लेखन
जिवाशिवाची भेट इ.स. १९५० मराठी लेखन
भूमिकन्या सीता इ.स. १९५० मराठी लेखन
अ-पूर्व बंगाल १९५३ मराठी लेखन
सं. वरवर्णिनी अथवा सती सावित्री इ.स. ? मराठी लेखन
करग्रहण इ.स. ? मराठी लेखन
जागती ज्योत इ.स. ? मराठी लेखन
मैलाचा दगड इ.स. ? मराठी लेखन
मराठी लेखन
मराठी लेखन
मराठी लेखन

कादंबर्‍या/दीर्घकथा

  • तिच्या नवर्‍याचो माहेर
  • धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.)
  • पुन्हा गोकुळ
  • प्रजापति लंडन

अनुवादित कादंबर्‍या


गौरव

अधिक वाचन

बाह्य दुवे