दौलताबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


दौलताबाद
Aurangabad - Daulatabad Fort (95).JPG
दौलताबाद किल्ला
नाव दौलताबाद
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण औरंगाबाद, महाराष्ट्र
जवळचे गाव औरंगाबाद, दौलताबाद
डोंगररांग औरंगाबाद
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


दौलताबादहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथेच हा एक किल्ला आहे. १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.

अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. इ.स.१५४५-१५५२ च्या दरम्यान् सन्त एकनाथ महाराज आपले गुरु सन्त जनार्दन स्वामी यान्च्या जवळ वास्तव्यास होते.

१३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्ली च्या सुलतानाने आपली राजधानी देवागीरीवर स्थलांतरित केली व देवगिरीचे नामांतरण दौलताबाद झाले

छायाचित्रे [संपादन]

संदर्भ [संपादन]

हेसुद्धा पाहा [संपादन]