केंजळगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंजळगड
नाव केंजळगड
उंची ४२६९ फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव कोरले, वाई, रायरेश्वर
डोंगररांग महादेव
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. एका बाजूला धोम येथे कृष्णा नदीवर धरण आहे, तर दुसरीकडे नीरा नदीवर देवघर येथे धरण व जवळच रायरेश्वराचे पठार आहे. .त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नावे : गणेशदरा, गायदरा, या सोप्या वाटा; आणि कागदरा, लोह्दरा, वाघदरा, सांबरदरा, सुणदरा ह्या अवघड वाटा. केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे. सध्या तेथे शिडी लावली आहे. ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते. 'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे. पाठीमागच्या टेकडीचा माथा समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंच, [ संदर्भ हवा ] म्हणजे रायगडापेक्षा एक मीटर[ संदर्भ हवा ] जास्त. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.

त्या उंचीवरून कमळगड, केंजळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात, तर नाकिंदा ह्या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात. केंजळगडाचे दुसरे नाव केलंजा आणि तिसरे मनमोहनगड. हे तिसरे नाव खास शिवाजी महाराजांनी दिले आहे. केंजळगडची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची शिवकालीन ते शाहू कालखंड पर्यंत नोंद मिळते, हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली,एकनिष्ठ गोळे घराणे ने भरपूर योगदान या गड साठी दिले आहे,पुढे १६८९ मध्ये पायदळ प्रमुख त्यांना करण्यात आले त्यावेळेसच्या पत्र नुसार पिलाजी गोळे कडे केंजळगड, पांडवगड, कमळगड, वैराटगड ,चंदन वंदन, मंगळगड अशी यादी मिळते (शाहू दप्तर) भोरहून कोरले, वडतुंबीला जाऊन तेथून पायी केंजळमाचीपर्यंत चालत जाता येते. इथे देवळात मुक्कामाला जागा आहे, .गडावर रहाण्यास जागा नाही. माचीहून उजव्या हाताने वर चढून गेल्यावर एक सपाटी लागते. इथूनच दगडात चोपन्न प्रशस्त पायरया खोदून काढल्या आहेत. हा एक अतिशय उत्तम जिना कोरला आहे. डाव्या बाजूला आधार असलेली भिंतही छिन्‍नी लावून व्यवस्थित केली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र दरी आहे. या अशा रानात पायऱ्या कश्या खोदल्या असतील याचे फार आश्चर्य वाटते. त्या कारागिरांकडे उत्तम हत्यारे असावीत; पण हा जिना कोरण्याची दृष्टी कोणाला होती आणि कोणी केला तो खर्च ? ह्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ नसल्याने देता येत नाहीत. पण केंजळगड केवळ ह्या पायऱ्यासाठी पाहायला जायला हवा .या अशा दुर्गानीच तर औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली.

ह्यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, 'जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर तो जिंकणे फार अवघड आहे.'

छायाचित्रे[संपादन]


केंजळगडला कसे पोहचाल

मुंबई वरून सातारा -कोल्हापूर हायवे मार्गे वाई तालूकयास   पोहचावे तेथून तासाला महाराष्ट्र परिवहन खात्याची ST बस्स अथवा स्थानिक झीपगाडी ने सुमारे १८-२० किलोमीटर वर खावली या सूंदर गावातून केंजळगडास जाण्याचा रस्ता आहे. महाराष्ट्र सरकारने गडाच्या पायथ्या पर्यन्त गाडी जाईल असा रस्ता बनवला आहे.  खावली गावात असलेल्या श्री. नवलाई देवी आणि श्री.रामवरदायिनी देवीचे दर्शन घेऊनच पुढे निघावे.