"शुंग साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६: ओळ ४६:
== शेवट ==
== शेवट ==
देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. [[कण्व घराणे|कण्व घराण्यातील]] या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.
देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. [[कण्व घराणे|कण्व घराण्यातील]] या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.
== हे ही पहा ==

*[[भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी]]
*[[मौर्य साम्राज्य]]
*[[मुघल साम्राज्य]]
{{साचा:भारतीय राजवंश}}
{{साचा:भारतीय राजवंश}}


[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग: भारतीय साम्राज्य]]

१४:१४, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

शुंग साम्राज्य
px

इ.स.पू. १८५ - इ.स.पू. ७३
राजधानी पाटलीपुत्र
राजे पुष्यमित्र शुंग
अग्निमित्र
भागभद्र
भाषा संस्कृत
पाली
क्षेत्रफळ १२ लक्ष वर्ग किमी
शुंग कालखंडातील यक्षमूर्ती
शुंग कालखंडातील ब्राँझचे नाणे

शुंग घराणे (इ.स.पू. १८५ ते इ.स.पू. ७३) याची स्थापना पुष्यमित्र याने इ.स.पू. १८५ मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे मगधावर सत्ता गाजवली.

इतिहास

शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झाले होते. या साम्राज्यातून कलिंग देश स्वतंत्र झाला होता. तशातच पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले व शुंग घराण्याची स्थापना केली.

राज्यकर्ते

कामगिरी

पुष्यमित्राने छत्तीस वर्षे मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. इ.स.पू. १७५ च्या सुमारास मिनँडर या ग्रीक राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली होती. सिंध, काठेवाड व पश्चिम किनार्यावरील काही भाग त्याने जिंकला. मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून तो प्रांत शुंग घराण्याच्या अमलाखाली आणला. अग्निमित्रानंतर शुंग घराण्यातील महत्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही काही फारसी चांगली कामगिरी केली नाही.

शेवट

देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. कण्व घराण्यातील या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.

हे ही पहा