भगवद्‌गीता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतार  ·नारायण
वेदांग
शिक्षा · चंड
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
इतिहास
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. गीतोपनिषद म्हणूनही प्रसिध्द.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश.

१८ अध्याय, ७०० श्लोक.

हिन्दू लोकांचा धर्मग्रंथ.

गीताई हे गीतेचे मराठीत केलेले ओवीबध्द भाषांतर आहे (विनोबा भावे).


भगवद गीता हा हींदू धर्मातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय महत्त्वाचा तत्त्वज्ञावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहीलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. हींदू (वैदीक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.

सामान्यजनांमधे भगवद-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.

कुरूक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरूवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांत यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हींदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशातले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

हींदू धर्मामधे असे मानले गेले आहे की गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत:चे विश्वरूप दर्शन दिले आणि त्याकरता अर्जुनाला दिव्यदृष्टी प्रदान केली.

भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' कींवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तीला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तीला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.

गीतेचा कालावधी

महाभारतातल्या 'भीष्म पर्वा' मधे गीतेचा उल्लेख आढळतो. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमधे लिहीलेल्या गीतेचे एकूण ७०० श्लोक आहेत. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहीली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.

उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहीली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहीली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हींदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहीती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहीली असे मानले जाते.

छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.

गीतेच्या सुरूवातीलाच श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले आहे की गीतेमधले तत्त्वज्ञान माणसाला त्याच्या व्युत्पत्तीच्या वेळेसच सांगण्यात आले आहे.

हींदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कीत्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहीली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.


[संपादन] विकिपुस्तक

  1. गीताई


वैयक्‍तिक साधने