दुर्योधन हा महाभारतातील हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी सर्वांत मोठा होता. तो पांडवांचा राजकीय विरोधक होता. गदायुद्धात अतिशय प्रवीण होता. त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक उपाय योजले. लाक्षागृहात ठेऊन त्यांना जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. भीमाला विष पाजून जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याला कधीच यश आले नाही. शेवटी शकुनी मामाच्या सहाय्याने धर्मास द्युतात हरवून त्याचे राज्य हिरावून घेतले. भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करविले आणि पांडवांना १२ वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवासला पाठविले. ह्या काळातही गन्धर्वांकडून पांडवांना मारण्याचा बेत केला. दुर्वास मुनीना चाल करण्यास पाठवले आणि विराट राजाच्या गाई पळवून पांडवांच्या अज्ञातवासाचा भंग करण्याचा प्रयत्न केला. शेवटी १३ वर्षानंतर पांडवांतर्फे श्रीकृष्ण शिष्टाई साठी आले तेव्हा सुईच्या अग्राएवढी सुद्धा जमीन देणार नाही असे सांगून त्यांचा उपमर्द केला. महाभारत युद्धात पराभव झाल्यावर द स्वाती डोहामध्ये लपून बसला. तेथे भीमाने जाऊन त्याला गदायुद्धात हरविले. त्याच्या मांडीवर आघात करून त्याची मंदी फोडली आणि त्यातील रक्त भीमाने द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली.महाभारतीय युद्धात भीमाच्या हातून तो मारला गेला.
|
महाभारत |
|
| महाभारतातील पर्वे |
|
|
| कुरूवंश |
|
|
| इतर पात्र |
|
|
| संबंधित लेख |
|
|