"पांडुरंग वामन काणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==पूर्वेतिहास==
==पूर्वेतिहास==
कोकणातील वेदशास्त्रपारंगत अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून त्यांनी खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाला वेदान्त पारितोषिकासह एम.ए. आणि ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. त्यामध्ये व्ही.एन.मंडलिक सुवर्ण पदक.हे त्यांचे शिक्षण.
कोकणातील वेदशास्त्रपारंगत अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून त्यांनी खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाला वेदान्त पारितोषिकासह एम.ए. आणि ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. त्यामध्ये व्ही.एन.मंडलिक सुवर्ण पदक. हे त्यांचे शिक्षण.


१९०४ साली [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास काणेंनी सुरूवात केली. नंतर ते एल्फिंस्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. पुढे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
१९०४ साली [[रत्नागिरी]] जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास काणेंनी सुरुवात केली. नंतर ते एल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.


==ग्रंथलेखन==
==ग्रंथलेखन==
प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हा सुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ.भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत.त्यांचे प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.
प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. त्यांचे प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.

==समजसुधारणा==
समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंची वैशिष्ट्ये म्होती.

भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.

विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते.

आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां.वा. काण्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.


==पां.वा. काण्यांच्या पुढील पिढ्या==
==पां.वा. काण्यांच्या पुढील पिढ्या==
ओळ २८: ओळ ३७:
* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले.
* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले.
* 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
* 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
* 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.
* 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अॅन्ड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.


{{भारतरत्न}}
{{भारतरत्न}}

२२:१३, ७ मे २०१८ ची आवृत्ती

चित्र:PV Kane.jpg
पांडुरंग वामन काणे

विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे ( जन्म: ०७-मे-१८८०,पेढे परशुराम, रत्नागिरी जिल्हा, मृत्यू : १८-एप्रिल-१९७२) हे विल्सन कॉलेज, मुंबई येथून एम. ए. झाले. त्यांना मराठी, हिंदी,इंग्रजी खेरीज संस्कृत, जर्मन, फ्रेंच इ. भाषा अवगत होत्या.

पूर्वेतिहास

कोकणातील वेदशास्त्रपारंगत अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. अतिशय मेहनतीने स्कॉलरशिप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून त्यांनी खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी.ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. मग एल्‌‍एल.बी. झाला वेदान्त पारितोषिकासह एम.ए. आणि ’हिंदू-मुसलमान कायदा’ घेऊन एल्‌एल.एम. त्यामध्ये व्ही.एन.मंडलिक सुवर्ण पदक. हे त्यांचे शिक्षण.

१९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास काणेंनी सुरुवात केली. नंतर ते एल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते सन १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.

ग्रंथलेखन

प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. त्यांचे प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.

समजसुधारणा

समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे ही डॉ. काणेंची वैशिष्ट्ये म्होती.

भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता.

विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते.

आंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां.वा. काण्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

पां.वा. काण्यांच्या पुढील पिढ्या

  • त्यांचे चिरंजीव डॉ. प्रभाकर पांडुरंग काणे हे रॉचेस्टर विद्यापीठाचे पीएच.डी. आहेत. ते आ्य‍आय‍टी मध्ये प्राध्यापक होते.
  • दुसरे चिरंजीव डॉ. गोविंद पांडुरंग हे रसायनशास्त्र घेऊन एम.एस्‌सी झाले. मग केमिकल टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनिअरींगकडे वळले. त्यांना लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून इंधन वायूंच्या ज्वलनाच्या अभ्यासासाठी पीएच.डी मिळाली आहे.डॉ.गोविंद पांडुरंग काणे हे मुंबई विद्यापीठात प्रपाठक, प्राध्यापक होते आणि नंतर माटुंग्याच्या यू.डी.सी.टी.मधे डायरेक्टर झाले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गोविंद पांडुरंग काणे हे दिल्लीच्या उद्योग मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांना पद्मश्री देण्यात आली होती.
  • नातू डॉ. शांताराम यांना मुंबईच्या आय‍आयटीकडून डॉक्टरेट मिळाली आहे. ते अमेरिकेत रेनसेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. जगातील १०० प्रभावशाली वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय

  • पां.वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.
  • तसेच १९६० साली पुणे विद्यापीठाने सुद्धा सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.
  • काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना १९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला.
  • ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले.
  • काणे यांना १९६३ साली भारतरत्‍न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 'हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र'च्या पाच खंडांपैकी चौथ्या खंडाला १९६५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

संस्थांमध्ये कार्य

  • डॉ.काणे मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे फेलो होते.
  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले.
  • 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले.
  • 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल अॅन्ड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.