"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७: ओळ ३७:
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे (तारीख/अध्यक्ष माहीत नाहीत).
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे (तारीख/अध्यक्ष माहीत नाहीत).
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मुंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]].
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मुंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]].
* १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ ला झाले. प्रा. [[राम पुनियानी]] अध्यक्षस्थानी होते.
* १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ ला झाले. प्रा. [[राम पुनियानी]] अध्यक्षस्थानी होते.
* २८ नोव्हेंबर २०१७ रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुणयात एका दिवसाचे राज्यस्तरीय (पहिले) युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन भरले होते. मंचरचे साहित्यिक संतोष पाकर पवार संमेलनाध्यक्ष होते.




==हे ही पहा==
==हे ही पहा==

२२:५५, ११ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी चौफेर समाचारच्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीची लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.

तथाकथित धर्मांध-फॅसिस्ट शक्तींचा हल्ला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी यांचा निषेध करणे हा सर्व विद्रोही साहित्य संमेलनांचा एक ठरावीक मेनू असतो. :

या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संमेलन भरवते.

विद्रोही साहित्य संमेलनांचे तथाकथित प्रयोजन

प्रस्थापित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे भटा-ब्राह्मणांचे, प्रतिगाम्यांचे, प्रस्थापितांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उदात्तीकरण करणारे व शोषित, दुबळ्या, वंचित वर्गांना बेदखल करणारे आहे, अशी घणाघाती टीका करून दीड दशकापूर्वी कथित मराठी सारस्वतांची साहित्य क्षेत्रातील तथाकथित दादागिरी, चमकोगिरी व बडेजावपणा मोडीत काढून उपेक्षितांच्या परिवर्तनवादी साहित्याचा जागर मांडण्यासाठी काही पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते व साहित्यिकांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्थापन केली व त्या माध्यमातून स्वतंत्र विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दरवर्षी भरविण्याचा प्रघात पडला.

परंतु अहंकार, आत्मस्तुती, आत्मप्रौढी, परस्परांचा छुपा आकस व स्वत:ची स्वतंत्र साहित्यिक सुभेदारी करण्याची हौस या अवगुणांनी ग्रासलेल्या तथाकथित पुरोगामी विद्रोही साहित्यिकांत व विचारवंतांत फूट पडली. विद्रोही साहित्य संमेलनाच्या नावावर दरवर्षी विविध ठिकाणी जत्रा भरू लागल्या. स्थानिक प्रतिष्ठित मान्यवरांना पुढे करून संमेलन घ्यायचे आणि स्वतःचे व स्वतःच्या गटाचे उदात्तीकरण कसे प्रभावीपणे करता येईल याचे आडाखे बांधायचे असे प्रकार विद्रोही सांस्कृतिक संमेलनाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतात.

आज तथाकथित प्रतिगामी शक्ती अत्यंत संघटित, आक्रमक व वर्चस्ववादी होत असताना पुरोगामित्वाचा विचार घोकणारे बोलघेवडे विद्रोही साहित्यिक व विचारवंत मात्र आपापल्या वेगळ्या राहुट्या करून असंघटितपणाचा व गटबाजीचा साक्षात्कार घडवीत आहेत. विचार व आचारात सांगड घातली नाही तर विचार वांझोटे ठरतात. फुले-शाहू-आंबेडकर-साठे यांचे विचार संमेलनात मंचावर बेंबीच्या देठापासून घोकायचे; प्रत्यक्ष आचरणात मात्र या महापुरुषांच्या विचाराला बगल देण्याचा प्रकार विद्रोही संमेलनांतून दिसून येतो.

राजीव काळे यांचा लोकसत्तेतील १४ जानेवारी २०१७च्या अंकातील लेख

पुढे काय? [१]

ज्ञात विद्रोही साहित्य संमेलने

  • १ले विद्रोही साहित्य संमेलन  : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबुराव बागूल. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले होते.
  • ?वे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबादला २०-२१ जानेवारी २००१ या कालात झाले.डॉ. यशवंत मनोहर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • ४थे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
  • ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : सावंतवाडी(सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष  : राजन खान
  • ५वे(?) विद्रोही साहित्य संमेलन  : नंदुरबार, २००३, संमेलनाध्यक्ष : आत्माराम राठोड
  • ७वे विद्रोही साहित्य संमेलन : २००५, संमेलनाध्यक्ष : तुळसी परब
  • ९ वे विद्रोही साहित्य संमेलन  : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
  • १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष  : संजय पवार
  • १०वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष  : राजाभाऊ शिरगुप्पे
  • ?वे विद्रोही साहित्य संमेलन : आटपाडी (सांगली जिल्हा), नोव्हेंबर २०१०
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष  : नागनाथअण्णा नायकवडी
  • ११वे (?) : बीडमध्ये २२ व २३ डिसेंबर २०१२
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : राहुरी (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष  : प्रा. डॉ. बाबुराव गुरव
  • ११वे(?) विद्रोही साहित्य संमेलन : धुळे, १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : ऊर्मिला पवार , स्वागताध्यक्ष  : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी
  • १२वे विद्रोही साहित्य संमेलन : परभणी, ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीराम गुंदेकर, उद्‌घाटक : डॉ. फरिदा शेख.[१]
  • १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलढाणा येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.
  • सांस्कृतिक चळवळीच्या वतीने लातूर येथे ६ व ७ डिसेंबर २०१४ या काळात १३ वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन पार पडले तर नंतर लगेच बीड येथे १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन १३ व १४ डिसेंबर रोजी पार पडले. लातूरच्या संमेलनाचे उद्घाटन प्रा. राम पुनियानी यांनी केले. अध्यक्षस्थानी लखनौ विद्यापीठाचे प्रा. डॉ. कालीचरण स्नेही होते.
  • १३वे विद्रोही साहित्य संमेलन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे (तारीख/अध्यक्ष माहीत नाहीत).
  • ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मुंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष प्रतिमा जोशी.
  • १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ ला झाले. प्रा. राम पुनियानी अध्यक्षस्थानी होते.
  • २८ नोव्हेंबर २०१७ रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुणयात एका दिवसाचे राज्यस्तरीय (पहिले) युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन भरले होते. मंचरचे साहित्यिक संतोष पाकर पवार संमेलनाध्यक्ष होते.

हे ही पहा

संदर्भ

  1. ^ http://www.loksatta.com/vruthanta-news/vidrohi-marathi-sahitya-sammelan-literature-parbhani-344082/lite/. Missing or empty |title= (सहाय्य)