"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ असे आहे. हे संमेलन ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे. याव्यतिरिक्त ’[[बाल साहित्य संमेलन]]’ या नावाची बालकांचा सहभाग असलेली काही अन्य संमेलनेही आहेत.
बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ असे आहे. हे संमेलन ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे. याव्यतिरिक्त ’[[बाल साहित्य संमेलन]]’ या नावाची बालकांचा सहभाग असलेली काही अन्य संमेलनेही आहेत.

२६वे मराठी बालकुमार साहित्य संंमेलन पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार आहे. कवयित्री डॉ. [[संगीता बर्वे]] अध्यक्षस्थानी असतील.


पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
ओळ २९: ओळ ३१:
# मदन हजेरी, २०१२, ओणी ([[राजापूर]])
# मदन हजेरी, २०१२, ओणी ([[राजापूर]])
# राजीव तांबे, २०१३, [[पुणे]]
# राजीव तांबे, २०१३, [[पुणे]]
# कवयित्री डॉ. [[संगीता बर्वे]], २०१५ (मारुंजी ([[मावळ]] तालुका)


==अन्य बालकुमार साहित्य संमेलने==
==अन्य बालकुमार साहित्य संमेलने==

११:२४, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन’ असे आहे. हे संमेलन ’अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’ भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे. याव्यतिरिक्त ’बाल साहित्य संमेलन’ या नावाची बालकांचा सहभाग असलेली काही अन्य संमेलनेही आहेत.

२६वे मराठी बालकुमार साहित्य संंमेलन पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार आहे. कवयित्री डॉ. संगीता बर्वे अध्यक्षस्थानी असतील.

पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

आजपर्यंतची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष

  1. भा.रा. भागवत, १९७५, पुणे
  2. सुमती पायगावकर, १९७७, सोलापूर
  3. मालती दांडेकर, १९७८, जळगाव
  4. अमरेंद्र गाडगीळ, १९८१, इचलकरंजी
  5. यदुनाथ थत्ते, १९८३, वेंगुर्ले
  6. राजा मंगळवेढेकर, १९८५, पुणे
  7. लीलावती भागवत, १९८७, कराड
  8. अनंत पै, १९८९ पुणे
  9. सुधाकर प्रभू, १९९०, कोल्हापूर
  10. महावीर जोंधळे, १९९२, सेलू
  11. दिनकर देशपांडे, १९९३, ठाणे
  12. शंकर सारडा, १९९४, सावंतवाडी
  13. प्रभाकर पुराणिक, १९९९, नागपूर
  14. दत्ता टोळ, २०००, अहमदनगर
  15. रत्नाकर मतकरी, २००१, पुणे
  16. पु.ग. वैद्य, २००२, सातारा
  17. डॉ. न.म. जोशी, २००३, निगडी, पुणे
  18. गिरिजा कीर, २००४, कराड
  19. लीला दीक्षित, २००५, परभणी
  20. विजया जहागिरदार, २००६, सोलापूर
  21. डॉ. विजया वाड, २००७, सांगली
  22. मंगेश पाडगांवकर, २०१०, संगमनेर
  23. गोविंद गोडबोले, २०१२, आजरा
  24. मदन हजेरी, २०१२, ओणी (राजापूर)
  25. राजीव तांबे, २०१३, पुणे
  26. कवयित्री डॉ. संगीता बर्वे, २०१५ (मारुंजी (मावळ तालुका)

अन्य बालकुमार साहित्य संमेलने

  • उचगाव येथील मळेकरणी सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन दि.१९-१२-२०१३ रोजी झाले. संमेलनापूर्वी मळेकरणी देवीची पूजा करून तिच्या आमराईत इंजिनियर आर. एम. चौगुले आणि माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले होते.

संमेलनाध्यक्ष मळेकरणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष जवाहर देसाई होते.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने पिकुळे (ता. दोडामार्ग) येथे ७ जानेवारी २०१४ला एक बालकुमार साहित्य संमेलन झाले. हे जिल्हास्तरीय संमेलन होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यकार सुभाष कवडे होते. एक हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, कोकणातील बालसाहित्यिक आदींचा या बालकुमार साहित्य संमेलनात सहभाग होता. संमेलनात काव्यवाचन, बालकुमार कथाकथन, परिसंवाद, सत्कार सोहळा, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आदी उपक्रम झाले. हे संमेलन दर वर्षी होते.
  • वसई माणिकपूर येथील सहकार शिक्षण संस्था व वसई-विरार शहर पालिकेच्या वतीने सहावे एकदिवसीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन २० डिसेंबर २०१३ रोजी वसई रोड (पश्चिम) येथील वर्तक विद्यालयात झाले. नगरपालिकेने या संमेलनास एक लाखाचे अनुदान दिले होते.

संमेलनात ,तालुक्यातील मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील, तसेच जिल्हापरिषद शाळांमधील पालक, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.


बाह्य दुवे


पहा :

  1. मराठी साहित्य संमेलने
  2. बाल साहित्य संमेलन