मराठे-दुराणी युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठे-दुराणी युद्ध डिसेंबर इ.स. १७५९ ते जानेवारी १५, इ.स. १७६१ दरम्यान उत्तर भारताच्या स्वामित्वासाठी झालेले युद्ध होते.

डिसेंबर १७५९मध्ये १,००,००० च्या मराठा सैन्याने दिल्लीतील अफगाण शिबंदीला हरवून दिल्ली काबीज केले. तेथपासून १७६१ च्या संक्रांतीच्या दिवशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईपर्यंत अनेक लढाया झाल्या. यात शेवटी मराठ्यांचा दारुण पराभव झाला व दुराणीनेही भारतातून पाय काढता घेतला.