धोंडोपंत बाजीराव पेशवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दूसरे नानासाहेब पेशवे

धांडोपंत बाजीराव पेशवे उर्फनाना साहेब पेशवे (19 मे 1826 - 24 सप्टेंबर 1859) हे हिंदुस्थान चे अंतिम पेशवा होते. तसेच१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचे आर्किटेक्ट होते. त्याचे मूळ नाव 'धोंडुपंत' होते. स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेबांनी कानपूर मध्ये इंग्रजांविरूद्ध बंडखोरांचे नेतृत्व केले.

पार्श्वभूमी[संपादन]

दुसऱ्या बाजीरावांची (रावबाजींची) पुण्यातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर त्यांचे राज्य इंग्रजांनी बळकावले. पेशवे मांडलिक बनले व बिठूर येथे जाऊन राज्य क‍रू लागले. या बाजीरावांना तीन मुली झाल्या आणि नंतर मुलगा होण्याची आशा न वाटल्याने त्यांनी नानासाहेब, दादासाहेब व बाळासाहेब असे तीन मुलगे दत्तक घेतले.

रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यांत कर्जतपासून ३-४ मैलावर वेणगाव येथे माधवराव नारायण भट रहात होते; त्यांच्या पत्नीचे नांव गंगाबाई. यांचाच मुलगा धोंडोपंत उर्फ नानासाहेब. नानासाहेबांचा जन्म ८ डिसेंबर १८२४ रोजी झाला. रावबाजीबरोबर जी मडळी ब्रह्मावर्तास गेली होती, तींत माधवराव भटहि होता. तेथेच धोंडोपंतावर रावबाजींची मर्जी बसून त्यानी त्यास ७ जून १८२७ रोजी दत्तक घेतले.,

पुढे काही काळानंतर बाजीरावांनी झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वंतत्र घोषित केले. मात्र अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले व त्यांचे दत्तक पुत्र धोंडोपंत बाजीराव ऊर्फ नानासाहेब बाजीराव पेशवे झाले.

पेशवेपदासाठीचा संग्राम[संपादन]

नानासाहेब दत्तक पुत्र असल्याने ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा स्वीकार केला नाही. बिठूर जरी स्वंतत्र असले तरी जो पर्यत ईस्ट इंडिया कंपनीची परवानगी मिळत नाही तोपर्यत हिंदुस्थानातल्या कुठल्याही राजाला राजा म्हणून मान्यता मिळत नसे. तोच विरोध नानासाहेबांना झाला. पेशवेपद मिळविण्यासाठी त्यांना इंग्रज सेनापती मेन्सन ह्याच्याशी युद्ध करावे लागले. ह्या युद्धात नानासाहेबांचा पराजय झाला.

बिठूरचे विलीनीकरण[संपादन]

नानासाहेबांचा बिठूरचा क्रांतिदलात सक्रिय सहभाग होता. पण इंग्रजांच्या सैन्यानेही बंड मोडायचा निश्चय केला होता. त्यांनी बिठूरवर अचानक हल्ला करून नानासाहेबांना झुकायला भाग पाडले. स्वतःचा जीव वाचावा म्हणून नानासाहेबांनी बिठूर फिरंगी सत्तेत विलीन केले ते कायमचेच.

ग्रंथसंग्रह[संपादन]

पहा : पहिले नानासाहेब पेशवे