गुप्त साम्राज्य
| गुप्त साम्राज्य | |
![]() |
|
| २४० - ५५० | |
|---|---|
| राजधानी | पाटलीपुत्र |
| राजे | २९० ते ३०५: चंद्रगुप्त पहिला ३३५ ते ३७०: समुद्रगुप्त ३१५ ते ४१५: चंद्रगुप्त विक्रमादित्य ४१५ ते ४५५: कुमार गुप्त पहिला |
| भाषा | संस्कृत |
| क्षेत्रफळ | वर्ग किमी |
गुप्त साम्राज्य हे उत्तर भारतातील मोठ्या भूभागावर तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यातच चंद्र गुप्त पहिला याच्या काळात गुप्त साम्राज्य उदयास आले. इतिहासकार मानतात कि गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सर्वात सुवर्णकाळ होता. या काळात भारताने कला, साहित्य, विज्ञानात खूप मोठी मजल मारली. गुप्त साम्राज्याचा कार्यकाल इस २४० ते ५५० पर्यंत मानला जातो.
अनुक्रमणिका |
[संपादन] गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते
- श्री गुप्त पहिला (सा. २४० ते २९०)
- घटत्कोच (२९० ते ३०५)
- चंद्रगुप्त पहिला (३०५ ते ३३५), गुप्त साम्राज्याचा संस्थापक, याचा कार्यकाल भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाल समजला जातो
- समुद्रगुप्त (३३५ ते ३७०) भारताच्या इतिहासातील एक महान सेनानी
- राम गुप्त (३७० ते ३७५)
- चंद्रगुप्त दुसरा (चंद्रगुप्त विक्रमादित्य) (३१५ ते ४१५), समुद्रगुप्तचा मुलगा, भारतीय इतिहासातील महान सम्राट
- कुमार गुप्त पहिला (४१५ ते ४५५)
- स्कंदगुप्त (४५५ ते ४६७)
- कुमारगुप्त दुसरा(४६७ ते ४७७)
- बुद्धगुप्त (४७७ ते ४९६)
- चंद्रगुप्त तिसरा(४९६ ते ५००)
- विनयगुप्त (५०० ते ५१५)
- नरसिंहगुप्त(५१५ ते ३००)
- कुमारगुप्त तिसरा (५३० ते ५४०)
- विष्णुगुप्त (c. ५४० ते ५५०)
[संपादन] सैन्य रचना
गुप्त साम्राज्याने विस्तार वाढवला तो सशक्त सैन्यबळावर. गुप्तांची लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे तर चीनी व पाश्चिमात्य स्त्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्य रचना पारंपारिक भारतीय सैन्य रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्द्ल माहिती दर्शावली आहे. गुप्तांची मुख्य फळी ही धर्नुर्धरांची होती व धनुष्य बाण हे मुख्य अस्त्र होते. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिठ्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच उपायकारक होते असे दिसते. हूण शक हे तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधरांना तोडीस भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. परंतु तत्कालीन भारतीय सैन्य दल या आक्रमकांविरुद्ध सक्षम होते असे दिसते. भारतीयांनी लोखंडी अतिशय ताकदवान धनुश्य देखील बनवले होते जे जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी इतरही लोखंडाची शस्त्रे बनवण्यात महारथ मिळवली होती. धर्नुधारी दलाला नेहेमी ढाली तलवारी व भाल्यांनी युक्त अश्या पायदळाचे संरक्षक कवच असे.
उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळ व पायदळाचा आक्रमण मागून धनुर्धारी दलाचा मारा यांचे सम्नवयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. ज्याचा प्रभावी वापर भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकिय आक्रमकांविरुद्ध करत्. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता.
हूणांच्या सातत्याच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असा वाद इतिहासकारांना फोल वाटतो. कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तनेही हूणांना हुसकाउन लावले होते. गुप्त साम्राज्य प्रामुख्याने अंतर्गत कलह व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडल्याचे वाटते.
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
|
|||||
|
|||||
