"परशुराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''परशुराम''' हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. [[जमदग्नी]] व [[रेणुका|रेणुकामाता]] यांच्या पोटी यांचा जन्म झाला. धारिणीशी विवाह केला.
'''परशुराम''' हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. [[जमदग्नी]] व [[रेणुका|रेणुकामाता]] यांच्या पोटी यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. तयांनी धारिणीशी विवाह केला.
[[ब्राह्मण]] असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी [[परशू]] हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या.
[[ब्राह्मण]] असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी [[परशू]] हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या.
त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.
ओळ ३३: ओळ ३३:
या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनावे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.
या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनावे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.


परशुराम हे विष्णूंच्या दशावतारामधील एक अवतार आहेत। यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला आहे. यांच्या दानशिलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने यांचा द्वारपाल होणे पसंत केले.
परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला आहे. त्यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले.

परशुरामाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे चिरंजीव (अमर) समजले जातात.


पहा :[[जयंत्या]]
पहा :[[जयंत्या]]



१६:२६, १६ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

परशुराम

कार्तवीर्याशी लढणार्‍या परशुरामाचे चित्र (मूळ: जयपूर, इ.स. एकोणिसावे शतक)
निवासस्थान कन्नोज
शस्त्र परशु
वडील जमदग्नी
अन्य नावे/ नामांतरे भार्गव, भार्गवराम, जामदग्न्य
या अवताराची मुख्य देवता विष्णू

परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नीरेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. तयांनी धारिणीशी विवाह केला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.

त्यानंतर त्यांचा उल्लेख सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर आपल्याकडील धनुष्य त्यांनी रामाला भेट दिले. पुढे त्यांनी भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.

राम व परशुरामाची भेट

कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढ्याच रंजक आहेत. असे म्हणतात की कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणांचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.

केरळची भूमी परशुरामाने निर्माण केली असे सांगतात.. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. तसेच ते कोकणातही आहे. परशुराम हा अमर्त्य किंवा चिरंजीव मानला गेला आहे. त्यामुळे त्याचा कायम निवास असतो असा समज आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून ४ कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर एक हजार फूट उंचीचा डोंगर आहे. ह्याला महेंद्रगिरी असे नाव आहे. परशुरामाच्या मंदिरामुळे लगतच्या गावालाही परशुराम किंवा लोटे परशुराम असेच म्हणतात.

परशुरामाच्या त्या मंदिराच्या रचनेमध्ये मोगल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचे घुमट बघतांना ते प्रकर्षाने जाणवते. या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात. उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते ही अशी---

एकदा या बेगमेची तारवे समुद्रात बुडाली होती. या बेगमेला समुद्राचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला की, तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिची तारवे खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली. परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला.

या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्त्यांपेक्षा उंच आहे. मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे, मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा, त्यामुळे अक्षयतृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो. यावेळेस मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात येतो. परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनावे व भजनाचे कार्यक्रम आखले जातात. या मंदिरात महाशिवरात्रीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय परिसरातल्या वारकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की, मार्गशीर्ष एकादशीला प्रत्यक्ष विठ्ठल पंढरपूरहून महेंद्रगडवर येतो. त्यामुळे मार्गशीर्ष एकादशीला इथे मोठी यात्रा भरते. परिसरातले वारकरी त्यादिवशी इथे दर्शनाला येतात. कोकणचा सर्वांग सुंदर निसर्ग, दूरवर दिसणाऱ्या कौलारू घरांची चित्रमय रचना असलेली गावे, या सुंदर देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानाची आणि निर्मोही वृत्तीची चिरंतर प्रेरणा देणाऱ्या परशुरामाचे हे मंदिर भेट देण्यासारखे आहे.

परशुराम हे विष्णूच्या दशावतारामधील एक अवतार आहेत. त्यांनी पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा संहार केला आहे. त्यांच्या दानशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूने त्यांचा द्वारपाल होणे पसंत केले.

परशुरामाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे चिरंजीव (अमर) समजले जातात.


पहा :जयंत्या