"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रताधिकारीत मजकूर वगळण्यासाठी कॉपीपेस्ट साचा लावला.
(चर्चा | योगदान)
ओळ ८८: ओळ ८८:
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41855:2010-01-21-15-00-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10}}
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41855:2010-01-21-15-00-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10}}
=== जलाशयामुळे भूकंप ===
=== जलाशयामुळे भूकंप ===
'''सूचना : खाली मजकूर लोकसत्तेच्या पानावरून Copy to copy and माशी to माशी या तंत्राने नकल-डकव करून छापलेला आहे. आंतरजालावरील मूळ लेखात असलेले अवाचनीय शब्द इथे जसेच्या तसे उमटले आहेत.)'''

१७ व १८ डिसेंबर २००९च्या दोन लेखांमध्ये ‘लोकसत्ता’ने खरे तर दोन वेगळे विषय मांडले होते. प्रतिक्रिया देताना भूगर्भतज्ज्ञ रत्नाकर पटवर्धन यांनी (१८ जानेवारी २०१०) दोन्ही लेखांमधील हा अंत:प्रवाह ओळखलेला दिसत नाही. भूकंप हे अटळ वास्तव आहे. जेथे धरण बांधले आहे, तेथे भूकंप होतात. तसेच जेथे धरणच नाही तेथेही भूकंप होतात. समुद्राच्या तळाशीही भूकंप होतात. उत्तुंग पर्वताच्या खालीही भूकंप होतात. १७ डिसेंबरच्या लेखात कोयना-वारणा क्षेत्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात सरकल्याची माहिती दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या परिसरातील भूकंपाच्या नोंदींचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते. या क्षेत्रातील सध्याचे ९० टक्केपेक्षा जास्त भूकंपांचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आढळून येतात. तर १८ डिसेंबर २००९च्या संपादकीय लेखात सर्वसामान्य जनतेचा भूकंपाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा; भूकंपपीडित जनतेने मदत याचना करताना शासनाकडूनच सर्व अपेक्षा करण्याची मनस्थिती कशी बदलावी; भूकंपाची वास्तविकता स्वीकारून त्याला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्याकडे मनोबल कसे वळवावे याबाबतचे मत अत्यंत डोळसपणे मांडले आहे.
१७ व १८ डिसेंबर २००९च्या दोन लेखांमध्ये ‘लोकसत्ता’ने खरे तर दोन वेगळे विषय मांडले होते. प्रतिक्रिया देताना भूगर्भतज्ज्ञ रत्नाकर पटवर्धन यांनी (१८ जानेवारी २०१०) दोन्ही लेखांमधील हा अंत:प्रवाह ओळखलेला दिसत नाही. भूकंप हे अटळ वास्तव आहे. जेथे धरण बांधले आहे, तेथे भूकंप होतात. तसेच जेथे धरणच नाही तेथेही भूकंप होतात. समुद्राच्या तळाशीही भूकंप होतात. उत्तुंग पर्वताच्या खालीही भूकंप होतात. १७ डिसेंबरच्या लेखात कोयना-वारणा क्षेत्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात सरकल्याची माहिती दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या परिसरातील भूकंपाच्या नोंदींचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते. या क्षेत्रातील सध्याचे ९० टक्केपेक्षा जास्त भूकंपांचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आढळून येतात. तर १८ डिसेंबर २००९च्या संपादकीय लेखात सर्वसामान्य जनतेचा भूकंपाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा; भूकंपपीडित जनतेने मदत याचना करताना शासनाकडूनच सर्व अपेक्षा करण्याची मनस्थिती कशी बदलावी; भूकंपाची वास्तविकता स्वीकारून त्याला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्याकडे मनोबल कसे वळवावे याबाबतचे मत अत्यंत डोळसपणे मांडले आहे.
समाजाने वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. त्यात शासन-प्रशासनही आलेच. धरणासह सर्व बांधकामे ही भूकंपात टिकतील अशी बांधायला हवीत. भूकंपापूर्वी, भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही वाद असण्याचे कारण नाही.
समाजाने वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. त्यात शासन-प्रशासनही आलेच. धरणासह सर्व बांधकामे ही भूकंपात टिकतील अशी बांधायला हवीत. भूकंपापूर्वी, भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही वाद असण्याचे कारण नाही.

२३:१९, २६ एप्रिल २०१२ ची आवृत्ती


भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.

भूगर्भात अकस्मात घडलेल्या भू-हालचालींमुळे भूकवचास जे हादरे बसतात त्यालाच भूकंप म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.

नैसर्गिक रीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्याठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.

दुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये मौनालोओ ज्वालामुखीतून उद्रेक होण्यापूर्वी सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप घडून येत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.


चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.

भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची महत्ता मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची तीव्रता मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.

३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.

समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.

भूकंपाचे मुख्य कारण जरी भूगर्भ-चकत्यांमधील घर्षण हे असले तरी खालील पैकी कोणत्याही कारणाने भूगर्भात हालचाल होऊ शकते आणि भूकंपसदृश धक्के बसू शकतात.


भूकंपमापनाचे रिश्टर नावाचे परिमाण

वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपूर्वक अभ्यास करावयास हवा. एखाद्या गावी जाणवणारी भूकंपाची तीव्रता व तदनुषंगाने होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात.(काही प्रदेश भूभुकंपाच्या संकेतांची(सिग्नलस्प्रतिदिन) तीव्रता वाढवतात.)[१]

’रिश्टर महत्ता’ वर्णन भूकंपाचे परिणाम होण्याची वारंवारता
२.० पेक्षा कमी सूक्ष्म सूक्ष्म, लक्षात येत नाही. जवळपास प्रतिदिन ८,०००.
२.० ते २.९ किरकोळ सामान्यतः लक्षात येत नाही.

.

जवळपास प्रतिदिन १,०००.
३.० ते ३.९ कधीकधीच लक्षात येतो, पण नुकसानकारक. ४९,००० दरवर्षी(अंदाजे)
४.० ते ४.९ हलका घरातील वस्तूंचे लक्षात येण्याजोगे हलणे, पण दिसण्यासारखे नुकसान नाही. ६,२०० दरवर्षी(अंदाजे)
५.० ते ५.९ मध्यम थोड्या क्षेत्रात अयोग्यरीत्या बांधलेल्या इमारतीस जास्त नुकसान; योग्यरीत्या डिझाईन केलेल्या इमारतीस अत्यल्प नुकसान. ८०० दरवर्षी(अंदाजे)
६.० ते ६.९ जोरदार रहिवासी क्षेत्रात नुकसान दरवर्षी(अंदाजे) १२०
७.०ते ७.९ बराच मोठा मोठ्या क्षेत्रात अत्याधिक नुकसान १८ दरवर्षी(अंदाजे)
८.० ते ८.९ मोठ्ठा सभोवतालच्या कितीतरी क्षेत्राच्या परिसरात अत्याधिक नुकसान दरवर्षी १
९.० ते ९.९ सभोवतालचे १६०० किलोमीटरातले क्षेत्र धराशायी २० वर्षातून एखादा
१०.०आणि + पूर्ण पृथ्वी अद्याप नोंद नाही.
फारच दुर्लभ(माहीत नसलेला)


या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41855:2010-01-21-15-00-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



जलाशयामुळे भूकंप

सूचना : खाली मजकूर लोकसत्तेच्या पानावरून Copy to copy and माशी to माशी या तंत्राने नकल-डकव करून छापलेला आहे. आंतरजालावरील मूळ लेखात असलेले अवाचनीय शब्द इथे जसेच्या तसे उमटले आहेत.)

१७ व १८ डिसेंबर २००९च्या दोन लेखांमध्ये ‘लोकसत्ता’ने खरे तर दोन वेगळे विषय मांडले होते. प्रतिक्रिया देताना भूगर्भतज्ज्ञ रत्नाकर पटवर्धन यांनी (१८ जानेवारी २०१०) दोन्ही लेखांमधील हा अंत:प्रवाह ओळखलेला दिसत नाही. भूकंप हे अटळ वास्तव आहे. जेथे धरण बांधले आहे, तेथे भूकंप होतात. तसेच जेथे धरणच नाही तेथेही भूकंप होतात. समुद्राच्या तळाशीही भूकंप होतात. उत्तुंग पर्वताच्या खालीही भूकंप होतात. १७ डिसेंबरच्या लेखात कोयना-वारणा क्षेत्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वारणा खोऱ्यात सरकल्याची माहिती दिलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. या परिसरातील भूकंपाच्या नोंदींचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते. या क्षेत्रातील सध्याचे ९० टक्केपेक्षा जास्त भूकंपांचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात आढळून येतात. तर १८ डिसेंबर २००९च्या संपादकीय लेखात सर्वसामान्य जनतेचा भूकंपाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा; भूकंपपीडित जनतेने मदत याचना करताना शासनाकडूनच सर्व अपेक्षा करण्याची मनस्थिती कशी बदलावी; भूकंपाची वास्तविकता स्वीकारून त्याला सामोरे जाण्याची सज्जता ठेवण्याकडे मनोबल कसे वळवावे याबाबतचे मत अत्यंत डोळसपणे मांडले आहे. समाजाने वास्तव स्वीकारून जगले पाहिजे. त्यात शासन-प्रशासनही आलेच. धरणासह सर्व बांधकामे ही भूकंपात टिकतील अशी बांधायला हवीत. भूकंपापूर्वी, भूकंपादरम्यान व भूकंपानंतर काय करावे, काय करू नये याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे, याबाबत कोणाचेही वाद असण्याचे कारण नाही. आता थोडे ‘जलाशयामुळे होणारे भूकंप’ फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ या पटवर्धन यांच्या लेखनातील वादग्रस्त मुद्याविषयी. वास्तविक त्यांनी केलेला शब्दप्रयोगदेखील आता कालबाहय़ झालेला आहे. हे खरे आहे, की हूवर धरण बांधल्यानंतर १९४०च्या दशकापासून काही मोजके भूगर्भतज्ज्ञ हे ‘धरणामुळे भूकंप होतात’ या दृष्टिकोनाचे प्रवर्तक होते. परंतु हळूहळू यांचा उत्साह मावळला. जगामध्ये सुमारे ४० हजार धरणांपैकी डझनभर धरणेदेखील यांच्या मताला दुजोरा देणारी ठरली नाहीत. तेव्हा त्यांनी फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (या संकल्पनेचा त्याग करून फी२ी१५्र१ कल्ल४िूी िरी्र२्रे्रू३८ (फकर) जलाशय उद्युक्त भूकंप असा शब्दप्रयोग सुरू केला. पटवर्धन यांनी हे कोयना, भातसा, किल्लारी याबरोबरच चणकापूर येथील धरणाचाही उल्लेख करून या सर्व ठिकाणी धरणे बांधून त्यात पाणी साठविल्यानंतर भूकंप झाल्याचे लिहितात. तसेच हे भूकंप ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर असे पावसानंतर आणि धरणे भरलेली असताना होतात, याकडे लक्ष वेधले आहे. बहुधा त्यांनी हे विधान ऐकीव गोष्टीच्या आधारे केले असावे असे वाटते. उत्कृष्टपणे गोळा व जतन होत असलेल्या कोयनेच्या भूकंपाच्या नोंदी पाहिल्या असता असे दिसून येते, की मार्च, एप्रिल व मे या महिन्यांतही तेवढेच किंवा काही वेळा इतर महिन्यांपेक्षा जास्त भूकंप झाले आहेत. ते म्हणतात तसे जलाशय भरणे व रिकामे होण्याच्या प्रक्रियेशी किंवा काही जण म्हणतात त्याप्रमाणे ज्या गतीने जलाशय भरतो किंवा रिकामा होतो त्या गतीशी भूकंपाचा काहीही संबंध नाही, हे भूकंपप्रवण क्षेत्रातील कोणत्याही धरणाच्या आकडेवारीवरून सिद्ध करता येऊ शकते व तसे यापूर्वी केलेही आहे.

पटवर्धन यांनी, महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा खडक, त्याची रचना आणि गुणधर्म लक्षात घेता धरणामुळे, त्यातील पाणीसाठय़ामुळेच भूकंप होतात, असे वाटू लागते तसेच ५० वर्षांत झालेले भूकंप नवीन निर्माण केलेल्या धरणांमुळेच घडले असल्याचे धाडसी विधान केले आहे. वास्तविक महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकाच्याच रचना व गुणधर्मामुळे धरणाचा किंवा पाणीसाठय़ाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही असे ठामपणे म्हणता येईल! विशेषत: भूकंप जमिनीखाली ज्या खोलीवर निर्माण होतात, तेथपर्यंत या धरणाचा किंवा जलाशयाच्या पाण्याचा यत्किंचितही परिणाम पोहोचू शकणार नाही, असे दिसून आले आहे. जलाशय उद्युक्त भूकंप या तत्त्वाचे प्रणेते ज्या वैज्ञानिक तत्त्वाचा आधार घेण्याचे प्रयत्न करतात त्याबद्दलची

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले


या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41855:2010-01-21-15-00-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



वस्तुस्थिती खालीलप्रमाणे

दिसली ना पाण्याचा झिरपा१. धरणामुळे होणाऱ्या पृथ्वीवरील वजनवाढीमुळे खडकातील स्ट्रेन एनर्जी बाहेर पडून भूकंपनिर्मिती होते, असे सांगितले जाते. वास्तविक कोणत्याही धरणामुळे पडणारा जमिनीवरील दाब हा ३-४ मजली इमारतीच्या पायाच्या दाबापेक्षा कित्येक पटीने कमी असतो हे सिद्ध करता येऊ शकेल. २. जलाशयातील पाण्याचा खोलवर झिरपा होऊन खडकामधील घर्षण कमी झाल्याने भूकंप होतात असेही म्हटले जाते. भूकंपाची निर्मिती जमिनीखाली काही किलोमीटर खोलवर होते. तेथपर्यंत पाण्याचा झिरपा पोहोचणे केवळ अशक्य आहे. कोयना जलाशयाच्या खाली बोगद्यांचे जाळे खणण्यात आले आहे. ते जलाशयाखाली ५० मीटरपेक्षा कमी खोलीवर आहे. त्या ठिकाणी काम सुरू असताना तेथील खडकांमध्ये ना स्ट्रेसलेव्हलमध्ये वाढ आढळला हैदराबाद येथील एका संस्थेच्या वैज्ञानिकांनी असेच सिद्धान्त मांडून पाण्याची पातळी जेव्हा जेव्हा उच्चांक गाठेल त्या त्या वेळेस पूर्वी मोठे भूकंप झाल्याचे लिहून कोयना परिसरात डिसेंबर २००५ पूर्वी असा मोठा भूकंप होणार असल्याचे भाकित सप्टेंबर २००५ मध्ये वर्तविले होते. तसेच १५ दिवसांच्या अंतराने दोन मध्यम स्वरूपाचे भूकंप (चार रिश्टर स्केल) झाल्यास पुढील तीन महिन्यांत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होतो आणि त्यामुळेच डिसेंबर २००५ पर्यंत पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप होईल, अशी बातमी माध्यमापर्यंत सप्टेंबर महिन्यात पोहोचल्याने घबराटीचे वातावरण होते; तेव्हा जलसंपदा विभागाने व कोयना प्रकल्पाने या वृत्ताचे खंडन करून अभिलेखावरील भूकंप नोंदी, जलाशयाच्या पाण्याची पातळी, जलाशय भरण्याचा व रिक्त होण्याचा दर या कोणत्याच निकषावर हे सिद्धान्त खरे ठरत नसल्याचे ऑक्टोबर व नोव्हेंबर २००५मध्ये दाखविले होते. संबंधित शास्त्रज्ञांना हैदराबाद येथे भेटून कोयना येथे बोलावून त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली होती.


  • [http://www.earthquakeinfo.org/marathi.html -- डॉ. किशोर जयस्वाल USGS, यांच्या द्वारा भूकंपा विषयी शिक्षा सम्बन्धीत माहिती.

=== भूकंपाची कारणेतिरपी मुद्राक्षरे=== : १. भूकवचातील खडकांमध्ये काही वेळा विभंग निर्माण होतात. विभंगानंतर भूपृष्ठाचे तुटलेले भाग वर-खाली किंवा बाजूला सरकतात व त्यांच्या घर्षणामुळे भूपृष्ठ कंप पावते. २. ज्वालामुखीची प्रक्रिया होत असताना पृथ्वीच्या अंतर्भागातील हालचालींमुळे भूपृष्ठाला धक्के बसतात. अशा भूकंपाचे क्षेत्र मर्यादित व तीव्रता बहुधा कमी असते. ३. भूकवच हे लहान-मोठया विस्ताराच्या भूविभागांनी बनले आहे. या विभागांना भूपट्ट म्हणतात. भूकवचाचे असे सात मोठे व अनेक लहान भूपट्टे आहेत. हे भूपट्टे प्रावरणातील वरच्या अर्धप्रवाही भागात आहेत. हे भूपट्ट हालतात, सरकतात, परस्परांना घासतात त्यामुळे तेथे भूकंप होतात. जगात होणारे बहुसंख्य भूकंप भूपट्ट हालचालींमुळे घडून येतात.


या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://encyclopedia.balaee.com/Admin/content.aspx?title=%u092d%u0942%u0915%u0902%u092a%20&lang=mr येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



भूकंपतरंग : भूपृष्ठाखाली ज्या भागात भूकंपतरंग निर्माण होतात त्या भागाला भूकंपनाभी असे म्हणतात. भूकंपनाभीपासून भूकंपतरंग सर्व दिशांना पसरतात. या नाभीच्या सरळ वर भूपृष्ठावरील भागास अपिकेंद्र असे म्हणतात. भूकंप नाभीपासून अपिकेंद्रापर्यंतचे अंतर कमीत कमी असते, म्हणून अपिकेंद्रावर भूकंपतरंग सर्वांत आधी पोहोचतात. या केंद्राच्या परिसरातील हादरा तीव्र स्वरूपाचा असतो. अपिकेंद्रापासून दूर भूकंपतरंगांची तीव्रता कमी कमी होत जाते. भूकंपतरंगांची नोंद भूकंपालेखा यंत्राद्वारे केली जाते. भूकंपतरंग प्रामुख्याने तीन प्रकारचे आहेत. .

प्राथमिक तरंग : जे तरंग भूपृष्ठावर प्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक तरंग म्हणतात. या तरंगांतील कणांची हालचाल तरंगांच्या दिशेने मागे-पुढे होते. .

द्वितीयक तरंग : हे तरंग भूपृष्ठावर प्राथमिक तरंगांनंतर पोहोचतात. हे तरंग प्राथमिक तरंगांपेक्षा अधिक विध्वंसक असतात. या तरंगांतील कणांची हालचाल तरंग दिशेच्या काटकोनात होते. .

पृष्ठतरंग : पाण्याच्या पृष्ठभागावर वार्‍याने जसे तरंग निर्माण होतात तसे तरंग भूपृष्ठावर भूकंपामूळे निर्माण होतात. त्यांना पृष्ठतरंग म्हणतात. भूपृष्ठावरील अपिकेंद्रापासून त्यांची निर्मिती होते व ते भूपृष्ठावर पसरतात. हे तरंग सर्वात जास्त विध्वंसक असतात. भूकंपलहरींचे मापन भूकंपमापन यंत्रावर केले जाते. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर परिणाम वापरतात. यात १ पासून १२ पर्यंत एक्के (ून्त्स्)ि असतात. प्रत्येक पुढचे एकक आधीच्या एकापेक्षा ३० पट तीव्रता दर्शविते. .


या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://envis.maharashtra.gov.in/envis_data/?q=mccgwartcl_nov10 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.




हिंदुस्थानातील भूकंप आपण हिंदुस्थानातील मागील पाच भूकंपांचे दिवस पाहूया. १) दि. २० ऑक्टोबर १९९१ या दिवशी उत्तराखंड, उत्तरकाशी येथे ६.६ रिश्टरच्या भूकंप झाला. या दिवशी आश्‍विन शुक्ल द्वादशी होती. तसेच २७ ऑक्टोबर रोजी चंद्र पृथ्वीच्या जवळ (३ लक्ष ६८ हजार कि.मी.) आला होता. २) दि. २९ सप्टेंबर १९९३ या दिवशी लातूर-किल्लारी येथे ६.२ रिश्टरचा भूकंप झाला होता. त्या दिवशी निजभाद्रपद शुक्ल चतुर्दशी होती. त्यावेळी ३० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून दूर (४ लक्ष ६ हजार कि.मी.) होता. ३) दि. २६ जानेवारी २००१ रोजी गुजरातमध्ये कच्छ-भूज येथे ६.९ रिश्टरचा भूकंप झाला होता. त्या दिवशी माघ शुक्ल द्वादशी होती. त्यावेळी चंद्र २४ जानेवारी रोजी पृथ्वीपासून दूर (४ लक्ष ६ हजार कि.मी.) होता. ४) दि. २६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशिया, सुमात्रा, मद्रास, श्रीलंका येथे ९.१ रिश्टरचा भूकंप झाला. त्यावेळी सुनामीच्या लाटाही आल्या होत्या. त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती. त्यावेळी २७ डिसेंबर रोजी चंद्र पृथ्वीपासून दूर (४ लक्ष ६ हजार मि.मी.) होता. ५) दि. ८ ऑक्टोबर २००५ रोजी कश्मीरमध्येही ७.६ रिश्टरचा भूकंप झाला होता. त्यादिवशी अश्‍विन शुक्ल पंचमी होती. त्यावेळी १४ ऑक्टोबर रोजी चंद्र पृथ्वीजवळ (३ लक्ष ६५ हजार कि.मी.) होता. यावरून अधिक संशोधनाची गरज असल्याचे दिसून येते. निसर्गाचे हे कोडे अधिक रहस्यमय असल्याचे दिसून येते. .

सर्वात मोठे भूकंप जगातील सर्वात मोठ्या दहा भूकंपांच्या नोंदी याप्रमाणे आहेत. २२ मे १९६० रोजी चिली येथे ९.६ रिश्टरचा भूकंप सर्वात मोठा असल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर २७ मार्च १९६४ रोजी अमेरिकेत झालेला भूकंप ९.२ रिश्टरचा होता. २६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशिया सुमात्रा येथे झालेला भूकंप ९.१ रिश्टरचा होता. ४ नोव्हेंबर १९५२ रोजी रशियात झालेला भूकंप ९ रिश्टरचा होता. १३ ऑगस्ट १८६८ रोजी पेरू येथे झालेला भूकंप ९ रिश्टरचा होता. २६ जानेवारी १७०० रोजी कॅनडा येथे झालेला भूकंप ९ रिश्टरचा होता. २७ फेब्रुवारी २०१० रोजी चिली येथे झालेला भूकंप ८.८ रिश्टरचा होता. ३१ जानेवारी १९०६ रोजी कोलंबिया येथे झालेला भूकंप ८.८ रिश्टरचा होता. २५ नोव्हेंबर १८३३ रोजी सुमात्रा इंडोनेशिया येथे झालेला भूकंप ८.८ रिश्टरचा होता. ४ फेब्रुवारी १९६५ रोजी आलास्का येथे झालेला भूकंप ८.७ रिश्टरचा होता. ‘भूकंप कधी होणार?’ या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी अजूनही संशोधनाची जरुरी आहे. हिंदुस्थानी शास्त्रज्ज्ञ डॉ. विनायक कोळवणकर हे त्यासाठी आवश्यक असणारे संशोधन करीत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. कधी ना कधी ‘भूकंप कधी, कुठे आणि किती रिश्टर स्केलचा होणार’ या प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील असा विश्‍वास वाटतो. भूकंपाचे भाकीत जर अगोदर कळले तर त्यामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी टाळता येऊ शकेल. निदान त्यासाठी अगोदर काळजी घेता येईल.मोठी वादळे, भूकंप, सुनामी यामुळे मोठा विध्वंस होतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्ती आपण मानतो. यांनाच आपलं ‘ईश्‍वर’ म्हणतो. शास्त्रज्ञ या शक्तींचे कोडे उलगडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. माणसाचे जीवन अधिक सुरक्षित आणि सुखी होण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. भूकंपाच्या नव्या हादर्‍याने नवनव्या चर्चेच्या लाटा मात्र उसळत आहेत.

साचा:Link FA

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले