मेघनाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेघनाद हा रावणाचा पुत्र होता. याने एके काळी इंद्राला जिंकले होते म्हणून याला इंद्रजित असेही म्हणत.हा हिंदू पौराणिक इतिहासात झालेला असा एकमेव योद्धा होता ज्याच्याकडे त्रिमूर्ती(ब्रम्हा विष्णू आणि शिव) यांचे सर्वोच्च अस्त्र (ब्रम्हाचे ब्रम्हास्त्र, विष्णूचे वैष्णवास्त्र आणि शिवाचे पाशुपतास्त्र) होते.

त्याने आपल्या पराक्रमाने देवराज इंद्राला सुद्धा जिंकले म्हणून तो इंद्रजित या नावाने प्रसिद्ध झाला.मेघनादाच्या पत्नीचे नाव सुलोचना होते. मेघनादाने आपल्या तपश्र्चर्येने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रम्हदेवाने वर मागण्यास सांगितल्यावर त्याने अमरत्व मागितले पण ब्रम्हदेवाने हे स्रृष्टीच्या विरोधात आहे असे कारण देऊन वर देण्यास नकार दिला.पण वारंवार तेच वर मेघनाद मागत होता तेव्हा ब्रम्हदेवाने त्रास वर दिले की प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा जेव्हा तो आपल्या कुलदेवतेला एका गुप्त ठिकाणी यज्ञ अर्पित करेल तेव्हा तेव्हा त्या युद्धात तो अजेय राहिल,पण ज्या व्यक्ती द्वारे त्याच्या यज्ञाचा भंग होईल तोच त्याचा वध करेल व तो व्यक्ती असा असेल जो सलग १४ वर्षे झोपला नसेल.म्हणून त्याचा वध लक्ष्मणाने केला कारण प्रभू रामचंद्र व माता सीतेच्या सेवाकार्यात लक्ष्मण १४ वर्षे झोपला नव्हता.

मेघनाद अत्यंत पराक्रमी होता.त्याने राम-रावण युद्धात राम व लक्ष्मणाला २ वेळा पराभूत केले व प्रत्येक वेळी हनुमंताने राम व लक्ष्मणाला वाचविले.मेघनादाला हे ठाऊक होते की शेवटी विजय श्रीरामचंद्रांचाच होणार.जेव्हा त्याची माता मंदोदरी हिने त्याला समजावले तेव्हा त्याने पित्याच्या विरोधात जर देव सुद्धा समोर उभा राहिला तरी मी त्यांच्याविरोधात लढणार असे सांगितले.