"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dr. Ambedkar being administered 'Dhamma Deeksha' by Bhante Chandramani (from Kushinara) at Nagpur on 14 October 1956.jpg|thumb|कुशीनाराचे भन्ते चंद्रमणीकडून दीक्षा ग्रहण करताना डॉ. आंबेडकर]]
[[चित्र:Dikshabhumi.jpg|left|thumb|[[नागपूर]] येथील दीक्षाभूमीवरील [[स्तूप]]]]
भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून [[बौद्ध धर्म|बौद्ध धम्माची]] दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. [[नवबौद्ध चळवळ]]ीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून [[बौद्ध धर्म|बौद्ध धम्माची]] दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. [[नवबौद्ध चळवळ]]ीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

==आंबेडकर व धर्मांतर==
==आंबेडकर व धर्मांतर==
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar addressing his followers during 'Dhamma Deeksha' at Deekshabhoomi, Nagpur 14 October 1956.jpg|thumb|१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूरमधील धम्म दीक्षा सोहळ्यादरम्यान आपल्या अनुयायांना उद्देशून बोलताना आंबेडकर]]
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar addressing his followers during 'Dhamma Deeksha' at Deekshabhoomi, Nagpur 14 October 1956.jpg|thumb|१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूरमधील धम्म दीक्षा सोहळ्यादरम्यान आपल्या अनुयायांना उद्देशून बोलताना आंबेडकर]]

१३:५१, २२ जून २०१८ ची आवृत्ती

कुशीनाराचे भन्ते चंद्रमणीकडून दीक्षा ग्रहण करताना डॉ. आंबेडकर
नागपूर येथील दीक्षाभूमीवरील स्तूप

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

आंबेडकर व धर्मांतर

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूरमधील धम्म दीक्षा सोहळ्यादरम्यान आपल्या अनुयायांना उद्देशून बोलताना आंबेडकर

बाबासाहेबांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीच कमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.[१]

१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात फक्त २४८७, पंजाबात १५५०, उत्तर प्रदेशाात ३२२१, मध्य प्रदेशात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती.[२][३] ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती. म्हणजेच भारतात १९५९ मध्ये ४.५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीयांची होती आता हीच बौद्ध लोकसंख्या २०११ मध्ये ५.५% झाली असून भारतीतील १२१ कोटी जनतेत ६.७ कोटी बौद्ध आहेत.[१][४] मात्र सरकारी आकडेवारीनुसार, इ.स. २०११ मध्ये भारतातील बौद्धांची लोकसंख्या अवघी ८५ लाख (०.७%) आहे.

इ.स. १९५० ते १९५९

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[५]

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[६]
  • १६ ऑक्टोबर, १९५६ (चंद्रपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[७]
  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता.[८].

  • डिसेंबर, १९५६ – दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. आणि तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
  • डिसेंबर, १९५६ – आग्रा येथे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थींचा एक भाग आग्रा येथील आंबेडकरानुयायांस देण्यात आला. त्यावेळी तेथेसुद्धा धर्मांतराचा कार्यक्रम होऊन २०,००० लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली गेली.
  • १३ एप्रिल, १९५७ – अलीगड येथे २,००,००० लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

इ.स. १९६० ते १९६९

इ.स. १९७० ते १९७९

इ.स. १९८० ते १९८९

  • १९८५ मध्ये जुनागढमध्ये ५,००० अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[९]

इ.स. १९९० ते १९९९

इ.स. २००० ते २००९

  • २००७ उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी सामूहिक धर्मांतर केले.

इ.स. २०१० ते २०१९

सामूहिक बौद्ध धर्मांतरे
दिनांक धर्मांतर स्थळ धर्मांतरित व्यक्ती संदर्भ
ऑक्टोबर २०१६ गुजरातची अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) व सुरेंद्रनगर शहरे २,००० अनुसूचित जातीचे हिंदू व्यक्ती [१०][११][१२]
  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हातील १८० कुटुंबांनी म्हणजेच सुमारे ८५० व्यक्तींनी बौद्ध धर्मात प्रवेश केला.[१३]
  • १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर ता शहरांमध्ये २११ अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१४]
  • १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा शहरांतील ३०० पेक्षा जास्त अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१५]
  • २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसी व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[१६][१७]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० हिंदू ओबीसी, ख्रिश्चन व मुस्लिमांनी बौद्ध धम्म स्वीकारला.[१८][१९]
  • २९ एप्रिल २०१८ रोजी गुजरातच्या उना येथे जवळपास ३०० ते ३५० अनुसूचित जातीच्या लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यांत गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[२०][२१]
  • २ जून २०१८ रोजी हरियाणाच्या १२० अनुसूचित जातीच्या लोकांनी दिल्लीच्या लद्दाख बौद्ध भवनात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.[२२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :2 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ भारतीय जनगणना, १९५१ व १९६१
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; :0 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ [१]
  5. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Times, Metro (ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम". मेट्रो टाइम्स: ३२. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  10. ^ https://www.bbc.com/hindi/india-37619084
  11. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  12. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  13. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  15. ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
  16. ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  17. ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  18. ^ http://www.archakmanews.com/over-5000-hindus-and-christians-embrace-buddhism-in-maharastras-nagpur/amp/
  19. ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
  20. ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
  21. ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  22. ^ "120 dalits from the jind haryana converted to Buddhism as state government did not fulfill their demands हरियाणा: सरकार से निराश 120 दलितों ने अपनाया बौद्ध धर्म" (हिंदी भाषेत). 2018-06-19 रोजी पाहिले.